नवी दिल्ली : ‘पाकव्याप्त काश्मीरवरील दावा भारत कधीही सोडणार नाही. मात्र, सैन्याच्या बळावर पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेण्याचीही गरज नाही. तेथील नागरिक काश्मीरमधील विकास पाहून स्वत:च भारतात सामील होण्याची इच्छा व्यक्त करतील’, असे प्रतिपादन संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी रविवारी केले. राजनाथ यांनी ‘पीटीआय’ला दिलेल्या मुलाखतीत जम्मू-काश्मीरमधील स्थिती, पाकिस्तान, चीनशी संबंध, घटनाबदलाची काँग्रेसकडून व्यक्त होणारी भीती आदी विषयांवर भाष्य केले.
‘जम्मू-काश्मीरमधील परिस्थिती झपाट्याने बदलत आहे. तिथे आर्थिक विकास वेगाने होत असून, शांतताही नांदू लागली आहे. त्यामुळे पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेण्यासाठी भारताला बळाचा वापरच करावा लागणार नाही. पाकव्याप्त काश्मीरमधील जनता स्वत:च भारतात सामील होण्याची मागणी करतील. अशी मागणी आता होऊ लागली आहे’, असे राजनाथ सिंह म्हणाले. पाकव्याप्त काश्मीर आमचे होते, आहे आणि राहील, याचा पुनरुच्चारही त्यांनी केला.
सशस्त्र दल विशेषाधिकार कायदा काश्मीरमध्ये लागू करण्याची आवश्यकताच उरणार नाही, अशी स्थिती काश्मीरमध्ये निर्माण होईल, असा विश्वास व्यक्त करतानाच याबाबतचा निर्णय केंद्रीय गृहमंत्रालयाच्या अखत्यारित असल्याचे राजनाथ सिंह यांनी सांगितले. जम्मू-काश्मीरमध्ये लवकरच निवडणुका होतील, असे त्यांनी स्पष्ट केले. मात्र, त्याबाबत निश्चित कालमर्यादा सांगण्यास त्यांनी नकार दिला.
Related News
Parliament Monsoon Session 2026 : पावसाळी अधिवेशनाला सुरुवात; ‘गेल्या महिन्यात भारताने अभिमानास्पद कामगिरी केली’, पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मोठे विधान
संसदे...
Continue reading
सिंधू जल करारावर भारताची ठाम भूमिका; आंतरराष्ट्रीय लवादात पाकिस्तानवर वाढला आर्थिक भार, वादाला नवे वळण
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सिंधू जल करार (
Continue reading
India-China : चीनच्या J-20 स्टेल्थ फायटर जेटमुळे भारताची चिंता वाढली? संरक्षण तज्ज्ञांचा दावा; भारताने कोणती पावले उचलण्याची गरज?
भारत आणि चीन यांच्यातील सीमावाद, वाढती लष्करी स्प...
Continue reading
पाकिस्तानच्या सुरक्षा दलावर मोठा हल्ला? बलुचिस्तानमध्ये बस बॉम्बने उडवल्याचा दावा, 45 हून अधिक मृत्यूची माहिती
पाकिस्तानमधील सुरक्षेच्या परिस्थितीवर...
Continue reading
Hormuz संकट आणखी भीषण! 20% टोलच्या निर्णयामुळे भारताला मोठा फटका, चीनची मोठी खेळी
पश्चिम आशियातील होर्मुझ सामुद्रधुनीवरून सुरू असलेला अमेरिका आणि इराण...
Continue reading
चलो दिल्ली : 20 जुलैपासून दिल्लीतील जंतरमंतरवर जम्मू-काश्मीरच्या राज्याच्या दर्जासाठी ओमर अब्दुल्लांचा मोठा एल्गार. केंद्र सरकारवर निशाणा, भाजपचा पल...
Continue reading
चीनमध्ये ४.३ कोटी रुपयांच्या फेरारी कारवर मुलांनी खेळताना नुकसान केल्याचा CCTV व्हिडीओ व्हायरल झाला आहे. दुरुस्तीसाठी ४.६ लाखांचा खर्च असून नुकसानभरपाईव...
Continue reading
अभिमानास्पद कामगिरी! भारत 6व्या क्रमांकावर, चीनला टाकलं मागे; पाकिस्तान 18व्या स्थानावर
भारतीय हवाई दलाने (Indian Air Force-IAF) आणखी एक अभिमानास्पद ट...
Continue reading
पाकिस्तान हादरला! बलुचिस्तानमध्ये भीषण दहशतवादी हल्ला; 9 पोलिसांचा मृत्यू, 5 जवानांचे अपहरण, 15 दहशतवादी ठार असल्याचा दावा
दहशतवादाला आश्रय देणारा देश म्हणून अनेकदा आंतरराष्ट्रीय ...
Continue reading
5 मुस्लिम देश, 2 मोठी उद्दिष्ट्ये; मोदी-जयशंकरांच्या दौऱ्यामागे भारताची दमदार रणनीती
भारतीय परराष्ट्र धोरणात गेल्या काही वर्षांत मोठे बदल पाहायला मिळत आहेत. पूर्वी काही निवडक देशा...
Continue reading
PM Narendra Modi Indonesia Visit : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या इंडोनेशिया दौऱ्यामुळे भारत-इंडोनेशिया संबंधांना नवे बळ मिळण्याची चिन्हे दिसत आहेत. 'ॲक्ट...
Continue reading
POK Update: पीओकेमध्ये जनआंदोलन तीव्र; 8 जुलैच्या डेडलाइनपूर्वी पाकिस्तानवर वाढला दबाव, पुढील 24 तास महत्त्वाचे
पाकिस्तान व्याप्त काश्मीर ( पीओके ) मध्य...
Continue reading
सीमेपलीकडून होणाऱ्या दहशतवादी कारवाया कोणत्याही स्थितीत थांबायला हव्यात, असे राजनाथ सिंह यांनी पाकिस्तानला बजावले. या दहशतवादी कारवायांवर भारताची करडी नजर असेल, असे सांगताना राजनाथ यांनी दहशतवादाबाबत सहनशून्य भूमिकेचा पुनरुच्चार केला.
समुद्री चाच्यांविरोधात भारतीय नौदलाच्या कारवाईचे राजनाथ सिंह यांनी कौतुक केले. एडनचे आखात, तांबड्या समुद्रात चाच्यांविरोधात कारवाई करीत नौदलाने व्यापारी जहाजांना संरक्षण देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली, असे राजनाथ म्हणाले.