अकोला : आयपीएल 2025 च्या प्लेऑफ शर्यतीत निर्णायक वळण आले असतानाच,
आज मुंबईत वानखेडे स्टेडियमवर मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात अत्यंत
महत्त्वाचा सामना रंगणार आहे. मात्र, हवामान खात्याच्या अंदाजानुसार,
Related News
जय बजरंग व्यायाम शाळेचा ग्रामीण क्रांतीचा यशस्वी प्रवास!
नुकसान ग्रस्त ठिकाणी आमदार नितीन देशमुख यांची सदिच्छा भेट
बच्चू कडूंचे आंदोलन स्थगित; २ ऑक्टोबरपर्यंत मागण्या मान्य झाल्या नाहीत तर मंत्रालयात घुसणार
पावसाळ्यामुळे तीन महिन्यांचे रेशन मिळणार….
अहमदाबाद एअर इंडिया विमान अपघात: टेकऑफनंतर 650 फूटवरच ‘मेडे कॉल’, ATC शी संपर्क अपयशी; ब्लॅक बॉक्स हस्तगत
PM किसान योजनेची २०वी हप्ताची प्रतीक्षा संपणार! २० जूनला येऊ शकतो २००० रुपयांचा हप्ता
प्रवाशी वाहनात माल वाहतूक
मुंडगाव येथील अण्णाभाऊ साठे आठवडी बाजार मार्केट मध्ये घाणीच साम्राज्य!
अकोल्यात ‘रोड सेफ्टी व्हिजन’ मोहिमेच्या माध्यमातून वाहतूक जनजागृतीला जोर
बोर्डी,रामापूर,शिवपूर,परीसरात गारपिटमुळे हजारो क्षेत्र बाधित
आयाची तत्परता आणि देवाची कृपा,विमान अपघातातून चिमुकली बचावली
हेरिटेज हॉटेलमधील लग्नसोहळ्यात चोरी! – 2 लाख 43 हजारांचा ऐवज लंपास; चोरटा सीसीटीव्हीत कैद
मुंबईत वादळी वाऱ्यांसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे,
ज्यामुळे हा सामना धुतला जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
या सामन्याचे महत्त्व लक्षात घेता, हा सामना जर पावसामुळे रद्द झाला, तर दोन्ही संघांना एकेक गुण दिला जाईल.
अशा परिस्थितीत प्लेऑफचे गणित अधिकच गुंतागुंतीचे होणार असून मुंबई इंडियन्सला अखेरचा
सामना पंजाब किंग्जविरुद्ध जिंकणं अत्यावश्यक ठरेल.
अन्यथा रोहित शर्मा आणि कंपनीला प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडावं लागू शकतं.
दरम्यान, BCCI ने सामन्यांसाठी अतिरिक्त वेळ एक तासावरून दोन तासांपर्यंत वाढवला आहे,
जेणेकरून पावसाच्या व्यत्ययानंतरही सामना खेळवता येईल. मात्र,
हवामानातील सुधारणा झाली नाही, तर आयपीएलच्या या हाय-वोल्टेज लढतीवर पावसाचा फटका बसेल हे निश्चित.
Read Also : https://ajinkyabharat.com/uddanpulachaya-badar-savar-shiva/