नवी दिल्ली : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा 20वा हप्ता जून अखेरीस शेतकऱ्यांच्या
खात्यात जमा होण्याची शक्यता आहे. मात्र, या योजनेचा लाभ वेळेत मिळवायचा असेल तर शेतकऱ्यांनी
30 मेपूर्वी ई-केवायसी आणि बँक खात्याशी आधार लिंक करण्याची प्रक्रिया पूर्ण करणे अत्यावश्यक आहे. अन्यथा, यावेळेसचा हप्ता थांबू शकतो.
Related News
वेबसिरीज पाहून पत्नीच्या हत्येचा धक्कादायक कट; 62 वर्षीय सॉफ्टवेअर कन्सल्टंटला अटक
अनुप धोत्रेंची 10 महत्त्वपूर्ण मागणी; अकोला-ढोण दुहरीकरणासह 4 नवीन सुपरफास्ट ट्रेनची मागणी
महिलांच्या खात्यात आधी 20 हजार, नंतर 30 हजार? योगी सरकारच्या ‘गेमचेंजर’ प्लॅनची जोरदार चर्चा
सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये धारदार शस्त्राने हल्ला;1 आरोपी ताब्यात, प्रकृती स्थिर
शिवसेना फुटीच्या खटल्याला मोठे वळण! कपिल सिब्बलांचा शिंदेंना महाप्रश्न; ‘कुठल्या आधारावर राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर केली?’
Wi-Fi च्या शोधात बाहेर पडली अन् समोर आला लांडगा! 5 वैशिष्ट्यांचा अनोखा वन्यजीव
‘महाखनिज-2’वरून राज्यभर 24 तास नजर; IAS रूबल अग्रवाल यांच्याकडे मोठी जबाबदारी
‘हर घर तिरंगा’साठी मोदींचं मोठं आवाहन; 3 खास संदेश देत म्हणाले, ‘हर मन में तिरंगा’!
Blinkit च्या गोदामावर FDAचा मोठा दणका; झुरळांचा प्रादुर्भाव, मुदतबाह्य अन्नपदार्थ आढळले
रेवती सुळे यांच्या रिसेप्शनमध्ये मोठी चर्चा; राहुल गांधी स्वतः भेटले स्मृती शिंदेंना
TET पेपरफुटीचा धक्कादायक सोलापूर कनेक्शन; 16वा आरोपी अटकेत, पोलीस प्रशिक्षण संस्था चालकावर कारवाई
गडचिरोलीत आश्रमशाळेत मण्यार सापाने 4 विद्यार्थिनींना दंश, 3 मुलींचा दुर्दैवी मृत्यू
या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी 6,000 रुपये आर्थिक सहाय्य दिलं जातं,
जे तीन समान हप्त्यांमध्ये थेट खात्यात जमा होतं. आतापर्यंत 19 हप्ते वितरित झाले असून आता 20व्या हप्त्याकडे लक्ष लागले आहे.
ई-केवायसीसाठी पर्याय :
pmkisan.gov.in या अधिकृत वेबसाईटवर लॉगिन करून स्वयं ई-केवायसी करा
PM-Kisan मोबाईल अॅपद्वारे फेस ऑथेंटिकेशनद्वारे ई-केवायसी
CSC सेंटरवर जाऊन ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करा
बँक खात्याशी आधार लिंक करणं अनिवार्य :
जर बँक खात्याशी आधार लिंक नसेल, तर फसवणूक टाळण्यासाठी तुमचं नाव लाभार्थी
यादीतून वगळलं जाऊ शकतं. त्यामुळे शेतकऱ्यांनी तातडीने बँकेत जाऊन आवश्यक कागदपत्रांसह लिंकिंग प्रक्रिया पूर्ण करावी.

