नवी दिल्ली : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा 20वा हप्ता जून अखेरीस शेतकऱ्यांच्या
खात्यात जमा होण्याची शक्यता आहे. मात्र, या योजनेचा लाभ वेळेत मिळवायचा असेल तर शेतकऱ्यांनी
30 मेपूर्वी ई-केवायसी आणि बँक खात्याशी आधार लिंक करण्याची प्रक्रिया पूर्ण करणे अत्यावश्यक आहे. अन्यथा, यावेळेसचा हप्ता थांबू शकतो.
Related News
शिवसेना (उबाठा) मध्ये नेतृत्वबदलामुळे पक्षातील अंतर्गत कलह आणखी गडद होणार
दोन कोटी विस लाखां च्या नावाखाली रुग्णसेवकाला सायबर गुंड्याकडून गंडवण्याचा प्रयत्न
शाळांचे परिसर एका महिन्यात तंबाखूमुक्त करण्याचे आदेश
अतिक्रमण हटाव मोहीम का फक्त दुर्बळांवरच? अपंगाचे दुकान तोडले –
जुन्या वादातून दोन गटात झालेल्या शस्त्रास्त्र हाणामारी
अकोल्यात विविध मागण्यांसाठी आज धरणे आंदोलन करणाऱ्यात आले
नवी दिल्लीतील भारत मंडपममध्ये पार पडलेल्या राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पीयूष गोयल
अखेर कातखेड,पिंपळखुटा गावात रस्त्याच्या कामाला सुरुवात
शेलुबाजार आरोग्य केंद्रात क्षयरुग्ण तपासणी शिबिर; डिजिटल एक्स-रेद्वारे ८७ संशयितांची तपासणी
पार्डी ताड–पिंपळखुटा रस्ता सहा महिन्यांतच खड्ड्यात! मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेवर प्रश्नचिन्ह
अखेर लेखी आश्वासनाने उपोषणाची मांघार!
दहीहंडा रोडवर मोठमोठे खड्डे; नागरिकांच्या सहकार्यातून काही खड्ड्यांची भर घाल
या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी 6,000 रुपये आर्थिक सहाय्य दिलं जातं,
जे तीन समान हप्त्यांमध्ये थेट खात्यात जमा होतं. आतापर्यंत 19 हप्ते वितरित झाले असून आता 20व्या हप्त्याकडे लक्ष लागले आहे.
ई-केवायसीसाठी पर्याय :
-
pmkisan.gov.in या अधिकृत वेबसाईटवर लॉगिन करून स्वयं ई-केवायसी करा
-
PM-Kisan मोबाईल अॅपद्वारे फेस ऑथेंटिकेशनद्वारे ई-केवायसी
-
CSC सेंटरवर जाऊन ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करा
बँक खात्याशी आधार लिंक करणं अनिवार्य :
जर बँक खात्याशी आधार लिंक नसेल, तर फसवणूक टाळण्यासाठी तुमचं नाव लाभार्थी
यादीतून वगळलं जाऊ शकतं. त्यामुळे शेतकऱ्यांनी तातडीने बँकेत जाऊन आवश्यक कागदपत्रांसह लिंकिंग प्रक्रिया पूर्ण करावी.