अकोला | प्रतिनिधी
काश्मीरमधील पहलगाम येथे नुकत्याच झालेल्या भयंकर दहशतवादी हल्ल्यात
२७ निष्पाप पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. या घटनेने संपूर्ण देश हादरला असून,
Related News
निवासी वसतिगृहात रॅगिंगचा धक्कादायक प्रकार अधिकाऱ्यांकडून प्रकरण दडपण्याचा आरोप….
🇮🇳 पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतात संतापाची लाट; पाकिस्तानात शिक्षण घेणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांबाबत चर्चेला उधाण
मलेरियाचा धोका कायम! महाराष्ट्रात पुन्हा वाढले रुग्ण; लक्षणं, कारणं आणि खबरदारी जाणून घ्या
अतिरेक्यांची बंदूक हिसकावण्याचा प्रयत्न करताना दिला जीव
हृदयद्रावक घटना! ७ वर्षांनी झालेलं बाळ
कारवाईचे संकेत! भारत 7 दिवसांत पाकिस्तानवर मोठा वार करू शकतो….
उष्णतेचा चटका!
श्रीनगरमध्ये अडकलेल्या अकोल्याच्या सहा नागरिकांना परत
पहलगाम हल्ल्याचा मोठा परिणाम:
“आता बस्स! आतंकवाद संपवाच – मुर्तीजापुरातून संतप्त आवाज”
मरणातही जर सन्मान नसेल, तर जिवंतपणी न्यायाची अपेक्षा कशी करायची?”
पळसो बढेतील कासमपुरात चोरट्यांचा प्रवेश;
संतापाची लाट देशभर उसळली आहे. विविध शहरांमध्ये पाकिस्तानविरोधी आंदोलनं तीव्र होत
असताना अकोल्यातही आज शिवसेना (ठाकरे गट) यांच्या वतीने तीव्र निषेध करण्यात आला.
अकोला मुख्य बस स्थानक चौकात शिवसैनिकांनी पाकिस्तानच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन केले
आणि जोरदार घोषणाबाजी करत “पाकिस्तान मुर्दाबाद”, “आतंकवादाचा नाश झाला पाहिजे” अशा घोषणा दिल्या.
शिवसैनिकांनी यावेळी संतप्त प्रतिक्रिया देत म्हटले की, “गोळीबार करणाऱ्या आतंकवाद्यांना दिसताक्षणी गोळ्या घालाव्यात.
आता केवळ निषेध नव्हे, तर निर्णायक कारवाईची वेळ आली आहे.”
यावेळी शहरप्रमुख, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
देशातील अशा प्रकारच्या हल्ल्यांविरोधात कठोर भूमिका घेण्याची मागणी त्यांनी केंद्र सरकारकडे केली.
Read Also : https://ajinkyabharat.com/srinagarmadhye-adkalelya-akolyachaya-saha-citizen-layer/