श्रीनगर | प्रतिनिधी
जम्मू-कश्मीरच्या पहलगाममध्ये नुकत्याच झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यानंतर सुरक्षाबळांनी
जोरदार प्रतिकार करत निर्णायक कारवाई केली आहे. हल्ल्यात सहभागी असलेल्या लष्कर-ए-तैयबाच्या दोन
Related News
सात महिने जुनी तक्रार दुर्लक्षित! मयुरीच्या आईने महिला आयोगाला लिहिलं होतं पत्र
“फायदा करून देणार 100 टक्के…”
EPFO चा 7 कोटी सदस्यांना गिफ्ट;
कान 2025 : आलिया भट्टच्या ड्रेसची मल्लिका शेरावतच्या गाऊनशी तुलना;
पुण्यातील बनावट कॉल सेंटरवर मोठी कारवाई;
“केंद्र आणि राज्यांनी टीम इंडियासारखे एकत्र काम केल्यास कोणतंही उद्दिष्ट कठीण नाही”
अकोट तालुक्यात परवानाधारक दुकानदारांना जून ते ऑगस्ट 2025 पर्यंतचे अन्नधान्य उपलब्ध;
किरीट सोमय्या हेच एक भोंगा – हर्षवर्धन सपकाळ….
हवामान खात्याकडून मान्सूनचा – डबल अटैक जारी !
21 वर्षीय तरुणाचा मृत्यू, पुन्हा एकदा सतर्कतेची गरज!
15 वर्षांनंतर सर्वात लवकर आगमन
‘महाबीज’तर्फे बीटी कापूस व तूर बियाण्याच्या नव्या वाणांचे लोकार्पण;
दहशतवाद्यांपैकी एका – आसिफ शेख – याचे घर स्फोटाच्या सहाय्याने उद्ध्वस्त करण्यात आले असून,
दुसऱ्या दहशतवादी आदिलच्या घरावर बुलडोजर चालवण्यात आला आहे.
दहशतवाद्यांचे घर उद्ध्वस्त; सुरक्षा यंत्रणांचा मोठा मोर्चा
२२ एप्रिल रोजी बैसरन व्हॅली (पहलगाम) येथे झालेल्या हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र
मोदी यांनी कठोर कारवाईचा इशारा दिला होता. त्या पार्श्वभूमीवर त्रालमध्ये सुरक्षा यंत्रणांनी मोठा मोर्चा उघडला.
स्थानिक पोलिसांच्या माहितीनुसार, दहशतवादी आसिफ शेखच्या घरात मोठ्या प्रमाणात स्फोटकं होती,
ज्यात मोठा स्फोट झाला. त्याचा संपूर्ण घर उद्ध्वस्त झालं आहे. दुसरीकडे,
आदिल या दुसऱ्या दहशतवाद्याच्या घरावर बुलडोजर चालवून कारवाई करण्यात आली.
व्हायरल व्हिडिओतून ओळख; दोघेही लष्करशी संबंधित
हल्ल्यानंतर लष्कर-ए-तैयबाशी संबंधित दहशतवाद्यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता,
ज्यात आसिफ व आदिल यांची ओळख पटली.
ते हल्ल्यात सहभागी असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर सुरक्षाबळांनी त्यांच्यावर कारवाई सुरू केली.
या हल्ल्यात २६ जणांचा मृत्यू झाला होता. त्यापैकी अनंतनागचा
आदिल शहा वगळता उर्वरित सर्वजण हिंदू धर्मीय होते.
गुरुवारी बहुतांश मृतांना अखेरचा निरोप देण्यात आला.
NIA चौकशीत व्यस्त, लष्कर-CRPFचा शोधमोहीम सुरू
दहशतवादी धर्म विचारून गोळ्या झाडत होते, असा आरोप आहे. त्यामुळे या घटनेची चौकशी NIA
(राष्ट्रीय तपास संस्था) करत असून, भारतीय लष्कर, जम्मू काश्मीर
पोलिस आणि इतर सुरक्षा यंत्रणा संयुक्तपणे मोहिम राबवत आहेत.
सुरक्षाबळांनी आतापर्यंत २००० लोकांची चौकशी केली असून, अनेकांना ताब्यात घेतलं आहे.
हल्ल्यात सहभागी अन्य दहशतवाद्यांचा शोध युद्धपातळीवर सुरू आहे.
गुप्तचर यंत्रणांचं मत आहे की हे दहशतवादी अजूनही पहलगाम परिसरातच लपलेले असण्याची शक्यता आहे.
Read Also :https://ajinkyabharat.com/comes-come-terrorism/