मुर्तीजापुर | प्रतिनिधी
काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या अमानुष दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण भारताचे मन सुन्न झाले आहे.
निष्पाप पर्यटकांच्या हत्येने देश हादरला असून, या रक्तरंजित घटनेनंतर मुर्तीजापुरात संतापाचा ज्वालामुखी फुटला.
Related News
गुरुग्राम हत्याकांड नवा खुलासा: वडिलांनी राधिकावर झाडल्या ५ गोळ्या; किचनमध्येच केला क्रूर अंत
शेतरस्त्यांसाठी समग्र योजना; मुख्यमंत्री फडणवीसांची मोठी घोषणा
जयंत पाटील यांचा राजीनामा; शशिकांत शिंदे नवे प्रदेशाध्यक्ष होण्याची शक्यता
ज्वारी खरेदीत घोटाळ्याचा आरोप; प्रहार पक्षाच्या जिल्हाध्यक्षांवर एसआयटी चौकशी
बुलढाणा जिल्हा रुग्णालयात नातेवाईकांमध्ये तुफान हाणामारी; सुरक्षेवर उठले प्रश्न
खदान परिसरात युवकावर चार जणांचा प्राणघातक हल्ला;
अकोल्यात आकाशात सूर्याभोवती इंद्रधनुष्य! नागरिकांनी घेतला अनोख्या दृश्याचा आनंद
जन सुरक्षा की भाजप सुरक्षा विधेयक उद्धव ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल
वारी हनुमान येथील डोहात युवकाचा बुडून मृत्यू
डाबकी रोड पोलिसांची गोवंश रक्षण कारवाई
आमदार संजय गायकवाड अडचणीत; कॅन्टीन कर्मचाऱ्याला मारहाणीप्रकरणी गुन्हा दाखल,
पिंपरी-चिंचवडचे नामकरण ‘राजमाता जिजाऊनगर’ करावे – विधानसभेत आमदार उमा खापरे यांची ठाम मागणी
शिवछत्रपती शिवाजी महाराज चौक येथे शेकडो नागरिक, व्यापारी आणि विविध सामाजिक घटकांनी एकत्र येत
पाकिस्तानच्या आणि दहशतवाद्यांच्या विरोधात जोरदार घोषणा दिल्या.
“पाकिस्तान मुर्दाबाद!”, “दहशतवादाचा नाश झाला पाहिजे!”, “भारत माता की जय!” – अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला.
उपस्थितांनी हातात फलक, छातीवर देशभक्ती आणि डोळ्यांत अश्रू घेऊन हल्ल्यात बळी गेलेल्या हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहिली.
“आता निषेध पुरे – आता कृती हवी!”
मुर्तीजापुरातून उठलेला हा आवाज फक्त निषेधाचा नाही,
तर निर्णायक कारवाईची जोरदार मागणी करणारा आहे.
व्यापारी संघाचे अध्यक्ष अशोक भावनांनी म्हणाले,
“देशाच्या सीमांना शब्दांनी नव्हे, तर निर्णायक कृतीने सुरक्षित ठेवलं पाहिजे.”
प्रा. दीपक जोशी आणि ज्ञानेश्वर देशपांडे यांचे मत –
“हे हल्ले आता असह्य झाले आहेत. सरकारने आता केवळ खंडन न करता, कठोर भूमिका घेतली पाहिजे. देश एकवटला आहे!”
तरुण नेते हर्षल साबळे यांनी ठाम शब्दांत सांगितले –
“आम्ही सहन करणार नाही. शत्रूला प्रत्युत्तर दिल्याशिवाय मागे हटणार नाही!”
एकजूट, ज्वाला आणि जबाबदारी
आजचा दिवस मुर्तीजापुरासाठी केवळ संताप व्यक्त करण्याचा नव्हता –
तर तो शांततेच्या नावाने उद्भवलेल्या अश्रूंचा आणि लढ्याच्या निर्धाराचा साक्षीदार ठरला.
देश आज एकच प्रश्न विचारतोय –
“आता बस्स! दहशतवाद संपवाच!”
Read Also : https://ajinkyabharat.com/death-must-be-done-by-us/