नवी दिल्ली: ऑपरेशन सिंदूरच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशात पाकिस्तानविरोधी संताप उसळला असताना,
AIMIM प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी पाकिस्तानवर थेट आणि परखड हल्लाबोल केला आहे.
भारतातील २३ कोटी मुस्लिमांनी जिन्नांच्या ‘टू नेशन थिअरी’ला नाकारलं आणि भारतातच राहणं पसंत केलं, हे पाकिस्तानने विसरू नये, असा इशारा त्यांनी दिला.
Related News
लोणार - प्रतिनिधी
दिनांक - १८ जुलै २०२५
लोणार तालुक्यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) मध्ये अलीकडेच झालेल्या नेतृत्वबदलामुळे पक्षातील अंतर्गत कलह आणखी गडद होत असल्याचे स्पष्...
Continue reading
प्रतिनिधी |
विवरा
देशात सायबर गुन्हेगारीचे जाळे दिवसेंदिवस अधिकच विस्तारित होत आहे. नागरिकांना सरकारी अधिकाऱ्यांच्या नावे खोट्या हुलकावण्या देत, त्यांच्यावर गंभीर गुन्ह्यांचे...
Continue reading
शाळांचे परिसर एका महिन्यात तंबाखूमुक्त करण्याचे आदेश अकोला जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी दिले आहेय..केवळ कागदावर नको तर प्रत्यक्षात कार्यवाही करा अशा सूचना यावेळी जिल्हाधिकारी अजि...
Continue reading
मूर्तिजापूर,
शहरात सुरू असलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेचा फटका आता अधिक गंभीर पातळीवर पोहोचला आहे. या कारवाईत एका अपंग व्यक्तीचे छोटं दुकान तोडून टाकण्यात आल्याने त्याच्यासमोर उपासम...
Continue reading
जुन्या वादातून दोन गटात झालेल्या शस्त्रास्त्र हाणामारीत आठ जण जखमी झाल्याची धक्कादायक घटना अकोल्यातील कृषी नगर भागात घडली आहे. दोन गटात झालेल्या या वादात गोळीबार झाल्याची माहिती आह...
Continue reading
राज्यातील शासकीय रुग्णालयातील परिचारिकांच्या विविध मागण्यांबाबत कोणताही अंतिम निर्णय न झाल्याने त्यांनी आज गुरूवारी काम बंद आंदोलन केलेये. या आंदोलनात अकोला येथील शासकीय वैद्यकीय म...
Continue reading
‘एक जिल्हा, एक उत्पादन - 2024’ मध्ये महाराष्ट्राला ‘अ’ श्रेणीत सुवर्णपदक मिळालाय..तर अकोल्याच्या कापूस उत्पादनांना राष्ट्रीय ओळख मिळाली आहेय..कापूस प्रक्रिया उद्योगासाठी
अकोल्या...
Continue reading
अकोट : अजिंक्य भारत ने 10 जुलै रोजी पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या अडगाव खुर्द गट ग्रामपंचायत मधील कातखेडा,
पिंपळखुटा गावामध्ये नागरिकांना मूलभूत सुविधांचा अभाव असल्याने सर्व...
Continue reading
शेलुबाजार वार्ता :-
बुधवार दि16/07/25 रोजी ता मंगरूळपिर मधून प्राथमिक आरोग्य केंद्र शेलुबाजार येथे संशयित क्षयरुग्नाचे तपासणी शिबिर
घेण्यात आले यामध्ये डिजिटल मशीनद्वारे संश...
Continue reading
शेलुबाजार वार्ता :-
मंगरूळपीर तालुक्यातील पार्डी ताड ते पिंपळखुटा या मुख्यमंत्री ग्राम सडक यो जनेंतर्गत काही महिन्यांपूर्वीच पूर्ण झालेल्या रस्त्याची अवघ्या
सहा महिने ते एक...
Continue reading
वाडेगाव:- ग्राम पंचायत समोर गेल्या दोन दिवसा पासून आमरण उपोषण करत असलेले
शे दस्तगीर शे महेमुद देगाव येथील यानी लेखी तक्रारारी मधे काशीराम तुळशीराम गव्हाळे यांचे शेत
गट क्र २७...
Continue reading
दहीहंडा परिसरातील मुख्य रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले असून यामुळे
नागरिकांना वाहतुकीदरम्यान अडथळ्यांचा सामना करावा लागत आहे.
रस्त्याची दुरवस्था पाहता सामाजिक कार्यकर्ते प...
Continue reading
पाकिस्तानने भारताला अस्थिर करण्याचा डाव टाकला असून, धर्माच्या नावावर देशाचे तुकडे करण्याचा प्रयत्न केला जात आहे,
असा आरोप ओवैसी यांनी केला. ते म्हणाले की, “आम्ही भारतात राहूनच लढू, देशाच्या सुरक्षेसाठी उभं राहू.
पाकिस्तानने अफगाणिस्तान आणि इराण सीमेवर केलेली कारवाई त्यांचा खरा चेहरा उघड करते.”
पाकिस्तानच्या परमाणु शस्त्रास्त्रांवर ओवैसींची चिंता
“पाकिस्तानकडून श्रीनगरमध्ये ड्रोन पाठवले जात आहेत, नागरिकांवर हल्ले होत आहेत.
या देशाच्या अण्वस्त्रांचा धोका संपूर्ण जगासाठी आहे. त्यामुळे त्यांचे शस्त्र निःशस्त्रीकरण आवश्यक आहे,”
असं मत ओवैसी यांनी व्यक्त केलं. ते पुढे म्हणाले, “आम्ही युद्ध नको म्हणतो, पण कोणी लढाई लादलीच, तर आम्ही मागे हटणार नाही.”
आर्थिक डबघाईवरूनही टीका
पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेची खिल्ली उडवत ओवैसी म्हणाले, “पाकिस्तान IMF कडून १ अब्ज डॉलरचं कर्ज मागतो आणि ते
अधिकृत भीक मागण्यासारखं आहे. IMF म्हणजे आंतरराष्ट्रीय नाणेनिधी नव्हे, तर आंतरराष्ट्रीय दहशतवादी निधी वाटतो.”
भारतावरील हल्ल्यांवर कठोर शब्दात निषेध
“पाकिस्तानने नागरिक भागांवर हल्ले करून अनेक निष्पापांचा जीव घेतला. जम्मूतील रुग्णालयांवर बॉम्बहल्ला,
गुरुद्वाऱ्याचं नुकसान, मस्जिदीतील इमामाची हत्या – हे सर्व त्यांचे नियोजित कृत्य आहेत.
ते कायमच धार्मिक मुखवटा घालून भारतात गोंधळ घालतात,” असं ओवैसी म्हणाले.
‘बुनियान-अल-मरसूस’च्या चुकीच्या वापरावर टीका
पाकिस्तानच्या ‘बुनियान-अल-मरसूस’ या मोहिमेच्या नावावर टीका करताना ओवैसी म्हणाले,
“कुराणातील ही आयत एकतेचा संदेश देते, पण पाकिस्तानने तिचा चुकीचा वापर करून धर्माचा अपमानच केला आहे.
जेव्हा त्यांनी पूर्व पाकिस्तानात बंगाली मुसलमानांवर गोळीबार केला, तेव्हा कुठे होती त्यांची ‘ठोस भिंतीसारखी उभी’ भूमिका?”
Read Also : https://ajinkyabharat.com/bharatacha-pahila-hydrogen-fuel-cell-truck-adani-interprayjeskadun-launch/