भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’च्या माध्यमातून पाकिस्तानात घुसून केलेल्या कारवाईनंतर आज भारतीय सेनेकडून
आणि परराष्ट्र मंत्रालयाकडून महत्वाची पत्रकार परिषद घेण्यात आली. या पत्रकार परिषदेत
भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर माहिती दिली.
Related News
शिवसेना (उबाठा) मध्ये नेतृत्वबदलामुळे पक्षातील अंतर्गत कलह आणखी गडद होणार
दोन कोटी विस लाखां च्या नावाखाली रुग्णसेवकाला सायबर गुंड्याकडून गंडवण्याचा प्रयत्न
शाळांचे परिसर एका महिन्यात तंबाखूमुक्त करण्याचे आदेश
अतिक्रमण हटाव मोहीम का फक्त दुर्बळांवरच? अपंगाचे दुकान तोडले –
जुन्या वादातून दोन गटात झालेल्या शस्त्रास्त्र हाणामारी
अकोल्यात विविध मागण्यांसाठी आज धरणे आंदोलन करणाऱ्यात आले
नवी दिल्लीतील भारत मंडपममध्ये पार पडलेल्या राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पीयूष गोयल
अखेर कातखेड,पिंपळखुटा गावात रस्त्याच्या कामाला सुरुवात
शेलुबाजार आरोग्य केंद्रात क्षयरुग्ण तपासणी शिबिर; डिजिटल एक्स-रेद्वारे ८७ संशयितांची तपासणी
पार्डी ताड–पिंपळखुटा रस्ता सहा महिन्यांतच खड्ड्यात! मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेवर प्रश्नचिन्ह
अखेर लेखी आश्वासनाने उपोषणाची मांघार!
दहीहंडा रोडवर मोठमोठे खड्डे; नागरिकांच्या सहकार्यातून काही खड्ड्यांची भर घाल
“२२ एप्रिल रोजी लष्कर-ए-तोयबाशी संबंधित टीआरएफ (द रेझिस्टन्स फ्रंट) या पाकप्रशिक्षित दहशतवादी संघटनेने
जम्मू-काश्मीरमधील पहलगाममध्ये पर्यटकांवर क्रूर हल्ला केला. या हल्ल्यात २५ भारतीय आणि १ नेपाळी नागरिकाचा मृत्यू झाला.
मुंबई २६/११ नंतरचा हा सर्वात गंभीर हल्ला होता,” असे त्यांनी सांगितले.
विक्रम मिस्री यांनी स्पष्ट केलं की पहलगाम हल्ल्याची जबाबदारी ‘टीआरएफ’ या गटाने घेतली असून,
या गटाचा थेट संबंध लष्कर-ए-तोयबाशी आहे. “हल्ल्याच्या तपासात दहशतवाद्यांशी पाकिस्तानचे थेट संबंध उघड झाले आहेत,” असेही त्यांनी नमूद केले.
त्यांनी सांगितले की भारताच्या गुप्तचर यंत्रणांना पाकिस्तानमधून पुन्हा भारतावर हल्ला होण्याची माहिती आधीच मिळाली होती.
त्यामुळे अशा हल्ल्यांना वेळेत रोखणे गरजेचे होते. “काश्मीरमधील विकास थांबवण्यासाठी आणि अस्थिरता निर्माण करण्यासाठी हे कट कारस्थान रचले गेले होते,” असेही ते म्हणाले.
‘ऑपरेशन सिंदूर’द्वारे भारताने केवळ दहशतवाद्यांना प्रत्युत्तर दिले नसून, दहशतवाद पोसणाऱ्या पाकिस्तानी यंत्रणांना देखील स्पष्ट संदेश दिला आहे.