पहलगाममधील निर्दोष पर्यटकांवर झालेल्या अमानुष दहशतवादी हल्ल्याचा बदला भारताने ठामपणे घेतला आहे.
मंगळवारी मध्यरात्री भारतीय हवाई दलाने ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत पाकिस्तान आणि पाकव्याप्त
काश्मीर (PoK) मधील नऊ दहशतवादी तळांवर हवाई हल्ले करून ते उद्ध्वस्त केले.
Related News
जय बजरंग व्यायाम शाळेचा ग्रामीण क्रांतीचा यशस्वी प्रवास!
नुकसान ग्रस्त ठिकाणी आमदार नितीन देशमुख यांची सदिच्छा भेट
बच्चू कडूंचे आंदोलन स्थगित; २ ऑक्टोबरपर्यंत मागण्या मान्य झाल्या नाहीत तर मंत्रालयात घुसणार
पावसाळ्यामुळे तीन महिन्यांचे रेशन मिळणार….
अहमदाबाद एअर इंडिया विमान अपघात: टेकऑफनंतर 650 फूटवरच ‘मेडे कॉल’, ATC शी संपर्क अपयशी; ब्लॅक बॉक्स हस्तगत
PM किसान योजनेची २०वी हप्ताची प्रतीक्षा संपणार! २० जूनला येऊ शकतो २००० रुपयांचा हप्ता
प्रवाशी वाहनात माल वाहतूक
मुंडगाव येथील अण्णाभाऊ साठे आठवडी बाजार मार्केट मध्ये घाणीच साम्राज्य!
अकोल्यात ‘रोड सेफ्टी व्हिजन’ मोहिमेच्या माध्यमातून वाहतूक जनजागृतीला जोर
बोर्डी,रामापूर,शिवपूर,परीसरात गारपिटमुळे हजारो क्षेत्र बाधित
आयाची तत्परता आणि देवाची कृपा,विमान अपघातातून चिमुकली बचावली
हेरिटेज हॉटेलमधील लग्नसोहळ्यात चोरी! – 2 लाख 43 हजारांचा ऐवज लंपास; चोरटा सीसीटीव्हीत कैद
या कारवाईत अवघ्या २३ मिनिटांत दहशतवादी गट लश्कर-ए-तैयबा आणि जैश-ए-मोहम्मदच्या बस्तानांवर कडाडून हल्ला करण्यात आला.
भारताच्या या निर्णायक कारवाईमुळे पाकिस्तानमध्ये खळबळ उडाली आहे.
या धक्कादायक घडामोडीनंतर पाकिस्तानमधील नागरिक सैरभैर झाले असून, गुगलवर
“ऑपरेशन सिंदूर म्हणजे काय?”, “सिंदूर म्हणजे काय?”, “सिंदूर अटैक काय आहे?” यांसारख्या कीवर्डसचा शोध घेत आहेत.
गुगल ट्रेंड्सनुसार, पाकिस्तानमध्ये “India Attack Bahawalpur”, “India Attack on Pakistan Today”,
“India Strikes Pakistan” असे अनेक कीवर्ड ट्रेंडिंगमध्ये आहेत. तसेच, “Indian Army vs Pakistani Army”,
“Most Powerful Army” यांसारख्या शोधवाक्यांतून भारतीय लष्कराविषयी माहिती मिळवण्याचा प्रयत्न होत आहे.
‘ऑपरेशन सिंदूर’ हे नाव खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुचवले असल्याचे समोर आले आहे.
पहलगाम हल्ल्यात नवविवाहित महिलांचे ‘सिंदूर’ पुसले गेले, त्या वेदनेचा आणि अपमानाचा बदला घेण्यासाठी हे नाव देण्यात आले.
Read Also : https://ajinkyabharat.com/pahalgam-halliyala-sadetod-reply/