उद्धव ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन सरकारवर जोरदार हल्लाबोल केला होता.
त्यावर आता मंत्री उदय सामंत यांनी खोचक प्रत्युत्तर दिलं आहे.
शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन
Related News
IND vs ENG, T20 वर्ल्डकप 2026: संजू सॅमसनचा झंझावाती अर्धशतक, भारताची उपांत्य फेरीत विजयानुभवाची तयारी
टी20 वर्ल्डकप 2026 च्या उपांत्य फेरी...
Continue reading
अर्जुन तेंडुलकर आणि सानिया चंदोकचं विवाहसंस्कार: पारंपरिक लाल रंगातील समन्वित देखणे असेतं जोडीचं शैली विधान
क्रिकेटचे लीजेंड साचि...
Continue reading
९८वे ऑस्कर पुरस्कार 2026: भारतात कधी आणि कुठे पाहता येईल?
हॉलिवूडमधील सर्वात मोठा सिनेमा उत्सव पुन्हा एकदा आपल्या दारात आला आहे. 2026 मध्ये होणारे ९८वे
Continue reading
मोठी बातमी! इराणकडून भारताला सर्वात मोठी मदत — युद्धाच्या दरम्यान झाली निर्णायक घोषणा, भारतास मोठा दिलासा
मध्य पूर्वेतील परिस्थिती सध्या अतिशय तणावपूर्ण आणि अस्थिर आहे.
Continue reading
साराचा परंपरागत आकर्षक लूक: अर्जुन टेंडुलकरच्या लग्नात पिंक मनीष मल्होत्रा साडीमध्ये कमाल
भारतीय क्रिकेटचे दिग्गज सचिन तेंडु...
Continue reading
मद्यपान करताना चखणा कसा असावा? आरोग्यासाठी योग्य पर्याय कोणता?
मद्यपान हा आजच्या काळात अनेकांचा सामाजिक आणि वैयक्तिक जीवनाचा भाग बनला आहे. तरीही, आरोग...
Continue reading
रायगडमध्ये इस्रायल-इराण युद्धाच्या पार्श्वभूमीवर पेट्रोल पंपावर गर्दी; अफवांना प्रशासनाचा स्पष्टीकरण
रायगड, मुरुड तालुका – इस्रायल आणि इराणमध...
Continue reading
धारावीतील 436 झोपडपट्टीधारकांसाठी फडणवीस सरकारचा मोठा दिलासा, देवनार येथे हक्काचे घरकुल
धारावी : मुंबईतील धारावी येथे नुकतीच घडलेली आग या परिसरातील रह...
Continue reading
सोनं-चांदीच्या भावात घसरण; 10 ग्रॅम सोन्यासाठी आता किती रुपये लागणार?
जगभरातील राजकारण आणि युद्ध परिस्थितींचा परिणाम सोनं आणि चांदीच्या बाजारात...
Continue reading
पार्थ पवार राज्यसभेत पदार्पण: सुप्रिया सुळे यांचा मोलाचा सल्ला
महाराष्ट्र राजकारणात एक महत्त्वाची घडामोड घडत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि बारामतीचे माजी खासद...
Continue reading
इराण-इस्त्रायल युद्ध: रशियाने इराणच्या बाजूने केलेलं मोठं विधान, अमेरिका-इस्त्रायलवर आंतरराष्ट्रीय दबाव
इराण आणि इस्त्रायलमध्ये सुरू असलेल्...
Continue reading
मोठा धक्कादायक समाचार: इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांचे निधन; भारताने व्यक्त केले दु:ख
इराणमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे संपूर्ण जागतिक ...
Continue reading
राज्यातील महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
नुकतंच राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन पार पडलं या अधिवेशनावरून त्यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.
अर्थसंकल्पीय अधिवेशन निरर्थक होतं. अपयश लपवणारं अधिवेशन होतं, असा हल्लाबोल उद्धव ठाकरे यांनी केला आहे.
दरम्यान त्यानंतर आता मंत्री उदय सामंत यांनी उद्धव ठाकरे यांच्या आरोपांना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.
नेमकं काय म्हणाले उदय सामंत?
उद्धव ठाकरे यांनी एक पत्रकार परिषद घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली, त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे
यांच्यामध्ये विस्तव टाकण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांची दोस्ती पक्की आहे.
उद्धव ठाकरे बालिशपणा करत आहेत, शिवसेना खरी कोणाची? हे न्यायालयाने आधीच सिद्ध केलं आहे.
आम्ही 80 जागा लढलो 60 जागा जिंकलो, ते फक्त 20 जागाच जिंकले, त्यांच्या हातात आता काही राहिलं नाही,
ते काँग्रेसच्या तालावर नाचत आहेत, असा हल्लाबोल सामंत यांनी यावेळी केला आहे.
दरम्यान पुढे बोलताना ते म्हणाले की, काँग्रेसबरोबर जाऊन त्यांनी बाळासाहेब यांच्यासोबत गद्दारी केली.
सौगात हा मोदींचा उपक्रम आहे. यांनी फेक नरेटीव्ही सेट केला आहे.
आम्ही पाकिस्तानचं समर्थन करत नाही, यांनी कंगनाच्या घरावर कारवाईसाठी बुलडोझर पाठवला.
राणे साहेबांना अटक करण्यासाठी पोलीस पाठवले. यांनी जे कृत्य केले ते पुसले जाणार नाहीत असं सामंत यांनी म्हटलं आहे.
अधिवेशनामध्ये प्रत्येक घोषणेवर चर्चा झाली आहे.
आम्ही आमचा अजेंडा पाच वर्षांमध्ये पूर्ण करणार आहोत.
यांना जे जमले नाही ते आम्ही केले आहे. गिरीश महाजन यांना एका प्रकरणात यांनी अटकवण्याचा प्रयत्न केला.
नुसती विधान भवनात येऊन पत्रकार परिषद घेतात.
यांनी आधी काम पूर्णपणे समजून घेणं गरजेचं आहे, असंही यावेळी उदय सामंत यांनी म्हटलं आहे.