उद्धव ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन सरकारवर जोरदार हल्लाबोल केला होता.
त्यावर आता मंत्री उदय सामंत यांनी खोचक प्रत्युत्तर दिलं आहे.
शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन
Related News
भारतीय स्वयंपाकघरातील सुवासिक वारसा: जगभर राज्य करणारे 6 देशी मसाले
भारताला “Land of Spices” म्हणजेच मसाल्यांची भूमी म्हणून ओळखले जाते, आणि ही ...
Continue reading
‘Elder Daughter Syndrome’ म्हणजे नेमकं काय? मोठ्या मुलींच्या आयुष्यातील अदृश्य ताण आणि आयुष्यभराची चिंता
‘Elder Daughter Syndrome’ म्हणजे काय : घरातील मोठी मुलगी असणं अनेकदा अभिमा...
Continue reading
Kattalan Review : स्टाईल आणि अॅक्शनचा तडका, पण कथेत भावनिक खोलीचा अभाव
Kattalan Review : ‘मार्को’सारख्या प्रचंड चर्चेत राहिलेल्या आणि यशस्वी...
Continue reading
अबूधाबीमध्ये हिजाब परिधान केल्याने अंकिता लोखंडे ट्रोल; सोशल मीडियावर धर्मांतराच्या चर्चांना उधाण
अबूधाबीती...
Continue reading
iPhone 18 Pro लॉन्चपूर्वी मोठी लीक! ‘डार्क चेरी’ आणि ‘स्काय ब्लू’ रंगांची चर्चा; Apple पुन्हा बदलणार डिझाइन?
Appleच्या आगामी iPhone 18 Pro मालिक...
Continue reading
Twisha Sharma च्या मृत्यू प्रकरणात नवा ट्विस्ट! 20 लाखांचे शेअर्स, CCTV लॉग्स आणि शेवटच्या 40 मिनिटांचा तपास; CBIच्या रडारवर संपूर्ण कुटुंब
अभिनेत्री आणि मॉडेल
Continue reading
मानसशास्त्राचा दावा! ज्यांचे जवळचे मित्र नसतात, त्यांच्यात लपलेली असते ही एक सवय; तुम्हीही असे आहात का?
मानसशास्त्राचा दावा! जवळचे मित्र नसलेल्या लोकांमध्ये असते ही एक सवय : प्रत्...
Continue reading
मानसशास्त्राचा दावा! तुमचा आवडता ऋतू सांगू शकतो तुमचा स्वभाव; जाणून घ्या तुम्ही नेमके कसे आहात
प्रत्येक व्यक्तीचा एक आवडता ऋतू असतो. काहींना थंडीच्या दिवस...
Continue reading
‘Chunnari Chunnari’च्या नव्या व्हर्जनवरून सोशल मीडियात चर्चा; सलमान खान-सुष्मिता सेनची जोडी पुन्हा पाहण्याची चाहत्यांची मागणी
‘ Chunnari Chunnari’वरून चर्चा रंगली : बॉलिवूडमधील का...
Continue reading
‘Hai Jawani Toh Ishq Hona Hai’वरून मोठा वाद; वाशू भगनानींची 400 कोटींची याचिका, डेव्हिड धवन आणि टिप्स इंडस्ट्रीज अडचणीत?
‘Hai Jawani ...
Continue reading
राज्यातील महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
नुकतंच राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन पार पडलं या अधिवेशनावरून त्यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.
अर्थसंकल्पीय अधिवेशन निरर्थक होतं. अपयश लपवणारं अधिवेशन होतं, असा हल्लाबोल उद्धव ठाकरे यांनी केला आहे.
दरम्यान त्यानंतर आता मंत्री उदय सामंत यांनी उद्धव ठाकरे यांच्या आरोपांना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.
नेमकं काय म्हणाले उदय सामंत?
उद्धव ठाकरे यांनी एक पत्रकार परिषद घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली, त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे
यांच्यामध्ये विस्तव टाकण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांची दोस्ती पक्की आहे.
उद्धव ठाकरे बालिशपणा करत आहेत, शिवसेना खरी कोणाची? हे न्यायालयाने आधीच सिद्ध केलं आहे.
आम्ही 80 जागा लढलो 60 जागा जिंकलो, ते फक्त 20 जागाच जिंकले, त्यांच्या हातात आता काही राहिलं नाही,
ते काँग्रेसच्या तालावर नाचत आहेत, असा हल्लाबोल सामंत यांनी यावेळी केला आहे.
दरम्यान पुढे बोलताना ते म्हणाले की, काँग्रेसबरोबर जाऊन त्यांनी बाळासाहेब यांच्यासोबत गद्दारी केली.
सौगात हा मोदींचा उपक्रम आहे. यांनी फेक नरेटीव्ही सेट केला आहे.
आम्ही पाकिस्तानचं समर्थन करत नाही, यांनी कंगनाच्या घरावर कारवाईसाठी बुलडोझर पाठवला.
राणे साहेबांना अटक करण्यासाठी पोलीस पाठवले. यांनी जे कृत्य केले ते पुसले जाणार नाहीत असं सामंत यांनी म्हटलं आहे.
अधिवेशनामध्ये प्रत्येक घोषणेवर चर्चा झाली आहे.
आम्ही आमचा अजेंडा पाच वर्षांमध्ये पूर्ण करणार आहोत.
यांना जे जमले नाही ते आम्ही केले आहे. गिरीश महाजन यांना एका प्रकरणात यांनी अटकवण्याचा प्रयत्न केला.
नुसती विधान भवनात येऊन पत्रकार परिषद घेतात.
यांनी आधी काम पूर्णपणे समजून घेणं गरजेचं आहे, असंही यावेळी उदय सामंत यांनी म्हटलं आहे.