अकोला, दि. ५ – महाराष्ट्रातील घरगुती वीज ग्राहकांसाठी मोठी दिलासादायक बातमी आहे. येत्या पाच वर्षांत वीज दरात २३ टक्के कपात केली जाणार असून,
याची अंमलबजावणी १ एप्रिलपासून टप्प्याटप्प्याने सुरू होणार आहे. हा निर्णय महाराष्ट्राच्या कुशल नेतृत्वाखालील अचूक नियोजनाचे फलित आहे.
विशेषतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली घेतलेले हे पाऊल १३ कोटी महाराष्ट्रवासीयांसाठी कल्याणकारी ठरणार आहे.
Related News
कांवड यात्रेमुळे दिल्ली-देहरादून राष्ट्रीय महामार्ग वाहतुकीसाठी बंद; ११ जुलैपासून नियमन लागू
अकोला जिल्ह्यात आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची संख्या ८० वर; २५ वर्षांत ३१९७ शेतकरी मृत्यूचे भीषण वास्तव
“आम्ही आतंकवादी की दहशतवादी?” – अविनाश जाधव यांचा पोलिसांवर संताप
उरळ पोलिसांची जुगार अड्यावर धाड!
ब्रिक्सवर ट्रम्प यांचे टॅरिफ बॉम्ब; भारतालाही फटका बसणार का?
“वारीच्या वाटेवर शाळेचा उत्सव; भक्तिरसात न्हाल्या चिमुकल्या भावना”
आलेगाव बाभुळगाव रस्ता बनला अपघाताचा
रेल्वे स्थानकावर निंबाच्या झाडाची फांदी तुटली, वन्यजीव सेवेमुळे वाचले साठ बगळे!
महामार्गावर डाळंबी जवळ कार पलटी एक जखमी
मुर्तिजापूर बसस्थानकावर अनोळखी व्यक्तीचा मृतदेह! परिसरात एकच खळबळ, ओळख अद्यापही गूढ!
अकोलखेड येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा
अकोल्यातील १३५ वर्षांची ‘कच्छी मशीद’ आता डिजिटल; ‘अजान’ थेट मोबाईलवर ऐकता येणार!
यासोबतच मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेच्या विस्तारामुळे शेतकऱ्यांना दिवसा वीज उपलब्ध होणार आहे.
यामुळे केवळ शेतीसाठी आवश्यक वीजपुरवठा सुनिश्चित होणार नाही तर अपारंपरिक ऊर्जेच्या वापरामुळे पर्यावरण रक्षणालाही चालना मिळेल.
यामुळे महाराष्ट्र अधिक ऊर्जावान आणि तेजस्वी होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.
भाजपा प्रदेश सरचिटणीस आमदार रणधीर सावरकर, खासदार अनुप धोत्रे, किशोर पाटील,
जयंत मसणे, विजय अग्रवाल यांनी या निर्णयाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले आहेत.
दहावी-बारावीच्या परीक्षा कडेकोट बंदोबस्तात; ड्रोन कॅमेऱ्यांद्वारे निगराणी
राज्यात लवकरच दहावी व बारावीच्या परीक्षा सुरू होत आहेत.
यासाठी शिक्षण विभागाला विशेष निर्देश देण्यात आले असून,
परीक्षेचे आयोजन कॉपीमुक्त व निकोप वातावरणात होईल, याची काळजी घेतली जात आहे.
संवेदनशील परीक्षा केंद्रांवर दोन ड्रोन कॅमेऱ्यांद्वारे २४ तास निगराणी ठेवली जाणार आहे.
परीक्षेच्या काळात ५० मीटरच्या परिसरातील झेरॉक्स दुकाने बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत
. प्रशासकीय पातळीवर व्हिडिओ चित्रीकरण, भरारी पथके, आणि फेशियल रेकग्निशन सिस्टीमद्वारे परीक्षार्थींची तपासणी केली जाणार आहे.
या निर्णयामुळे विद्यार्थी आणि पालकांवरील परीक्षा तणाव कमी होईल, असे शिक्षण विभागाने सांगितले आहे.
याबाबत अकोला भाजपाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले आहेत.
READ MORE : https://ajinkyabharat.com/shetak-yancha-jeevanman-achavanyasathi-teaching-tantra-gyan-amending/