विधानसभा निवडणुकीनंतर राज्य सरकारने लाडकी बहीण योजनेच्या निकषांमध्ये मोठे बदल केले आहेत.
नवीन अटींनुसार, अडीच लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असलेल्या महिलांना तसेच
चारचाकी वाहन असलेल्या कुटुंबातील महिलांना योजनेचा लाभ मिळणार नाही.
Related News
कुणाल किशोर कमलाकर प्रकरणात काका वर खुनाचा गुन्हा दाखल.
बोरगाव मंजू येथे गोवंशाला जीवनदान.
उन्हाळी क्रिकेट शिबिराचा समारोप.
अकोट शहरात एकास ट्रकने चिरडले, घटनास्थळावरच दुर्दैवी मृत्यू
बांगलादेश यांची भारतातून रवानगी…
डीडीए रिक्वायरमेंट 2005 दिल्ली विकास प्राधिकरण मध्ये सरकारी नोकरी…
अकोल्यात ऑफ्रोह संघटनेचे धरणे आंदोलन;
बोर्डी येथील घोगा नाल्यावरील संरक्षण भिंतीचे काम अर्धवट
अकोट शहरात अकोला नाक्यावरील रेल्वे ब्रिजवर पथदिवे लागणार
अकोला जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक संदर्भात पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न
पावसाचा तब्ब्बल ३ हजार ७६ हेक्टरवरील पिकांना फटका बसला असून, २२ घराचे अंशतः नुकसान
अकोला शहरातील नऊ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश नुकतेच जारी करण्यात आले
मुख्य बदल:
- उत्पन्न मर्यादा – वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जास्त असल्यास लाभ बंद.
- वाहन निकष – कुटुंबात चारचाकी गाडी असल्यास योजनेस अपात्र.
- शासकीय नोकरीतील महिलांना लाभ नाही.
- परराज्यात विवाह झालेल्या महिलांना लाभ मिळणार नाही.
- दरवर्षी ई-केवायसी आणि हयातीचा दाखला आवश्यक.
- आधार लिंक नसलेल्या महिलांना लाभ नाकारला जाणार.
9 लाख महिला होणार अपात्र
याआधी 5 लाख महिलांचे अर्ज बाद झाले होते. आता आणखी 4 लाख महिलांचा
लाभ बंद होणार असून, सरकारला यामुळे 945 कोटी रुपयांची बचत होणार आहे.
1500 रुपये बंद होणार का?
ज्या महिलांचे आधार कार्ड लिंक नाही, ज्या एकावेळी इतर योजनांचा लाभ घेत आहेत
किंवा बँक खात्यावरील नाव अर्जातील नावाशी जुळत नाही, अशा महिलांचा लाभ थांबवला जाणार आहे.
तपासणी सुरू
नमो योजना किंवा दिव्यांग योजनांचा लाभ घेणाऱ्या महिलांना एकत्रित 1500 रुपयांपेक्षा
अधिक मिळणार नाही. यासाठी सर्व विभागांकडून माहिती संकलन सुरू आहे.
Click here for more updates : https://ajinkyabharat.com/satanavan-sajal-vihir-appeared-day/