शेलुबाजार वार्ता दि.११
वैशाख पौर्णिमेच्या चांदण्यात जंगल शांत आणि सुंदर दिसत असते. याच शांत वातावरणात वन्य
प्राण्यांना अगदी जवळून पाहण्याचा अनुभव खूप खास असतो. काटेपूर्णा अभयारण्यात आज १२ मे,
Related News
शिवसेना (उबाठा) मध्ये नेतृत्वबदलामुळे पक्षातील अंतर्गत कलह आणखी गडद होणार
दोन कोटी विस लाखां च्या नावाखाली रुग्णसेवकाला सायबर गुंड्याकडून गंडवण्याचा प्रयत्न
शाळांचे परिसर एका महिन्यात तंबाखूमुक्त करण्याचे आदेश
अतिक्रमण हटाव मोहीम का फक्त दुर्बळांवरच? अपंगाचे दुकान तोडले –
जुन्या वादातून दोन गटात झालेल्या शस्त्रास्त्र हाणामारी
अकोल्यात विविध मागण्यांसाठी आज धरणे आंदोलन करणाऱ्यात आले
नवी दिल्लीतील भारत मंडपममध्ये पार पडलेल्या राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पीयूष गोयल
अखेर कातखेड,पिंपळखुटा गावात रस्त्याच्या कामाला सुरुवात
शेलुबाजार आरोग्य केंद्रात क्षयरुग्ण तपासणी शिबिर; डिजिटल एक्स-रेद्वारे ८७ संशयितांची तपासणी
पार्डी ताड–पिंपळखुटा रस्ता सहा महिन्यांतच खड्ड्यात! मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेवर प्रश्नचिन्ह
अखेर लेखी आश्वासनाने उपोषणाची मांघार!
दहीहंडा रोडवर मोठमोठे खड्डे; नागरिकांच्या सहकार्यातून काही खड्ड्यांची भर घाल
सोमवार रोजी पौर्णिमेच्या रात्री प्राणी गणना होणार आहे. यामुळे निसर्गप्रेमी
आणि वन्यजीव प्रेमींना वन्यप्राण्यांना जवळून पाहण्याची संधी मिळणार आहे.
अकोला वन्यजीव विभागाच्या अंतर्गत असलेल्या वाशिम आणि अकोला जिल्ह्यांमध्ये पसरलेल्या काटेपूर्णा
अभयारण्यात प्राणीप्रेमींसाठी मचाणांची व्यवस्था करण्यात आली आहे.
या मचाणांवर बसून निसर्ग आणि प्राणी प्रेमींना वैशाख पौर्णिमेच्या शुभ्र चांदण्यात विविध प्राणी पाहता येणार आहेत.
त्याच वेळी, वन्यप्रेमी वन्यप्राणी आणि पक्ष्यांची नोंद घेणार आहेत.
त्यामुळे, दरवर्षी वैशाख पौर्णिमेला वन विभागाकडून ‘निसर्ग अनुभव मचान गणना’ हा उपक्रम आयोजित केला जातो.
सुमारे ६५०० हेक्टर क्षेत्रात पसरलेल्या काटेपूर्णा अभयारण्याच्या उत्तरेकडील भागात नैसर्गिक जलाशय आहे,
तर दक्षिणेकडील आणि पूर्वेकडील वनपरिक्षेत्रात नैसर्गिक जलस्त्रोतांची कमतरता आहे.
त्यामुळे वन विभागाने विविध ठिकाणी कृत्रिम पाणवठे तयार केले आहेत.
याच पाणवठ्यांच्या आसपास विशिष्ट उंचीवर लाकडी मचाण तयार करण्यात आले आहेत.
या मचाणांवर बसून वन्यप्रेमी आणि निसर्गप्रेमींना आज या रात्रीच्या निसर्गाचा अनुभव घेता येणार आहे.
बॉक्स
अभयारण्यात आल्यावर एका मचनावर एक किंवा दोन निसर्गप्रेमींची व्यवस्था करण्यात आली आहे
या मचनावर निसर्गप्रेमींन बरोबर वन विभागाचे कर्मचारी किंवा स्वयंसेवी संस्थांची मार्गदर्शक असणार आहेत
नोंदणी झालेल्या निसर्ग व वन्यप्रेमींना सकाळी दहा वाजता अभयारण्यात प्रवेश देण्यात येणार आहे
त्यानंतर दुपारी दोन वाजता त्यांना मचाणावर नेण्यात येईल बातमी संकलन – श्याम अपूर्वा शेलुबाजार.
पवन जाधव वनपरिक्षेत्र अधिकारी काटेपूर्णा-सोहळ अभयारण्य
Read Also : https://ajinkyabharat.com/akot-talukyathi-vadi-vyasah-pavasamue-moth-disadvantage/