देशात कोरोनाचा संसर्ग पुन्हा वाढत असल्याचं चित्र दिसत असून, आज (२१ मे) दुपारी १
वाजेपर्यंत समोर आलेल्या आकडेवारीनुसार भारतात एकूण २५७ कोरोना रुग्ण आढळले आहेत.
मुंबई, चेन्नई आणि अहमदाबाद या प्रमुख शहरांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे.
Related News
जय बजरंग व्यायाम शाळेचा ग्रामीण क्रांतीचा यशस्वी प्रवास!
नुकसान ग्रस्त ठिकाणी आमदार नितीन देशमुख यांची सदिच्छा भेट
बच्चू कडूंचे आंदोलन स्थगित; २ ऑक्टोबरपर्यंत मागण्या मान्य झाल्या नाहीत तर मंत्रालयात घुसणार
पावसाळ्यामुळे तीन महिन्यांचे रेशन मिळणार….
अहमदाबाद एअर इंडिया विमान अपघात: टेकऑफनंतर 650 फूटवरच ‘मेडे कॉल’, ATC शी संपर्क अपयशी; ब्लॅक बॉक्स हस्तगत
PM किसान योजनेची २०वी हप्ताची प्रतीक्षा संपणार! २० जूनला येऊ शकतो २००० रुपयांचा हप्ता
प्रवाशी वाहनात माल वाहतूक
मुंडगाव येथील अण्णाभाऊ साठे आठवडी बाजार मार्केट मध्ये घाणीच साम्राज्य!
अकोल्यात ‘रोड सेफ्टी व्हिजन’ मोहिमेच्या माध्यमातून वाहतूक जनजागृतीला जोर
बोर्डी,रामापूर,शिवपूर,परीसरात गारपिटमुळे हजारो क्षेत्र बाधित
आयाची तत्परता आणि देवाची कृपा,विमान अपघातातून चिमुकली बचावली
हेरिटेज हॉटेलमधील लग्नसोहळ्यात चोरी! – 2 लाख 43 हजारांचा ऐवज लंपास; चोरटा सीसीटीव्हीत कैद
विशेष म्हणजे, एकट्या मुंबईत ५६ रुग्ण आढळल्याने स्थानिक प्रशासन आणि आरोग्य विभाग सतर्क झाले आहेत.
कोरोना संसर्गावर पुन्हा अलर्ट
हाँगकाँग आणि सिंगापूरमध्ये कोरोना संसर्गाची वाढ पाहता, भारतातही केंद्र सरकारने कोरोना अलर्ट जारी केला आहे.
आरोग्य मंत्रालयाने राज्यांना RT-PCR टेस्टिंग वाढवण्याचे, हॉस्पिटल्समध्ये तयारी
ठेवण्याचे आणि लसीकरणाचा आढावा घेण्याचे आदेश दिले आहेत.
प्रशासन सज्ज, खबरदारीचे उपाय सुरू
आरोग्य यंत्रणांनी खबरदारी म्हणून सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरण्याचा सल्ला दिला असून,
नागरिकांनी लक्षणे आढळल्यास त्वरित चाचणी करून घ्यावी, असं आवाहन करण्यात आलं आहे.
➡️ मुंबईत पुन्हा रुग्णसंख्या वाढत असल्यानं प्रशासन सतर्क
➡️ देशभरात प्रतिबंधात्मक उपाय सुरू, टेस्टिंग वाढवण्याचे आदेश
➡️ सामान्य नागरिकांनी गर्दी टाळावी, मास्क वापरावा आणि आरोग्य तपासणीसाठी पुढे यावं
कोरोनाचा संभाव्य धोका ओळखून प्रशासनाने सावधगिरीचा इशारा दिला असून,
नागरिकांनीही जबाबदारीने वागणं गरजेचं असल्याचं तज्ज्ञांचं मत आहे.
Read Also : https://ajinkyabharat.com/sonyachaya-darat-punha-vadha/