बाळापूर तालुक्यात खरीप पेरणीला वेग आला असून २७००४.४० हेक्टरवर पेरणी पूर्ण झाली आहे. सोयाबीनचे सर्वाधिक १८३३८ हेक्टर क्षेत्र असून कृषी विभागाने शेतकऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या आहेत.
बाळापूर : मान्सूनने समाधानकारक हजेरी लावल्यानंतर बाळापूर तालुक्यात खरीप पेरणीला चांगलाच वेग आला आहे. तालुका कृषी अधिकारी कार्यालयाने ६ जुलै २०२६ अखेर जाहीर केलेल्या अहवालानुसार तालुक्यात एकूण २७००४.४० हेक्टर क्षेत्रावर विविध खरीप पिकांची पेरणी पूर्ण झाली आहे. यामध्ये सोयाबीनचे सर्वाधिक १८३३८ हेक्टर क्षेत्र असून ज्वारी ५५६८ हेक्टर कापूस ११३ हेक्टर तूर ६९ हेक्टर इतर कडधान्ये ६०.४ हेक्टर तीळ ७ हेक्टर इतर तृणधान्ये २९ हेक्टर तर इतर तेलबिया २९३२ हेक्टरवर पेरणी झाली आहे. ऊस नवीन लागवड नायजर शेंगदाणे मूग उडीद आणि काही इतर पिकांची पेरणी अद्याप झालेली नाही.
कृषी विभागाने शेतकऱ्यांना हवामानाचा अंदाज लक्षात घेऊन तणनियंत्रण संतुलित खत व्यवस्थापन आणि कीड रोग नियंत्रणासाठी कृषी अधिकाऱ्यांच्या सल्ल्यानुसार उपाययोजना करण्याचे आवाहन केले आहे. पावसाने दिलेल्या साथीनंतर तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून पुढील काही दिवसांत खरीप पेरणीचे क्षेत्र आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
