मुर्तीजापूर तालुक्यातील हिरपूर गावात आज एक अत्यंत क्लेषदायक चित्र समोर आलं –
नाल्याच्या घाण पाण्यातून अंत्ययात्रा. उन्हाळ्याच्या कडक उन्हातही गावकऱ्यांच्या संतापाचा पारा
अधिकच उंचावला. कारण मृताच्या सन्मानासाठीच नव्हे, तर माणुसकीच्या नावानेही प्रशासनाने कानाडोळा केला आहे.
Related News
सततच्या पावसामुळे तीन वेळा पेरणी वाया; शेतकऱ्यांचा आक्रोश, नुकसानभरपाईची मागणी
देवरीफाटा परिसरात दोन मोटरसायकलींची समोरासमोर धडक;
कोकणात मुसळधार पावसाचा हाहाकार;
प्रवीण गायकवाड यांच्यावरील भ्याड हल्ल्याचा संभाजी ब्रिगेडने नोंदविला अकोल्यात निषेध.
मध्यप्रदेशातून पोटाची खडगी भरण्यासाठी आलेल्या युवकाचा अपघाती मृत्यू; कुरणखेडमध्ये हळहळ
विदर्भ स्तरीय अभया परिषद उत्साहात संपन्न, कार्यकर्ता तुषार हांडे सन्मानित.
पिकविमा मंजूर तरीही थकलेली रक्कम; शेतकऱ्यांचा संताप, कृषी अधिक्षकांना निवेदन
अकोट रोटरी क्लब चा शपथग्रहण सोहळा संपन्न
“ऑपरेशन प्रहार”ची मोठी कारवाई: अकोल्यात जुगार अड्ड्यावर धाड; १३ जणांवर कारवाई, ४.०६ लाखांचा मुद्देमाल जप्त
राज ठाकरे अडचणीत? वरळीतील वक्तव्यावरून DGPकडे तक्रार दाखल
श्रीराजराजेश्वर मंदिरात श्रावणातील पहिल्या सोमवारी भाविकांची अलोट गर्दी; कावडयात्रेने महादेवाला जलाभिषेक
श्रावणातील पहिल्या संकष्टीला गायगाव गणपती दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी!
गावातील स्मशानभूमीकडे जाणारा रस्ता म्हणजे अपमानाचं जिवंत उदाहरण आहे.
ना पायवाट, ना सांडपाण्याचा बंदोबस्त. त्यामुळे अंत्ययात्रा काढताना गावकऱ्यांना घाण पाण्यातून वाट काढावी लागते.
मृताच्या कुटुंबासाठी ही एक दुहेरी शिक्षा ठरते – एकीकडे आप्तजनाच्या निधनाचं दु:ख आणि दुसरीकडे त्या अंतिम संस्कारासाठी होणारी अवहेलना.
एक ज्येष्ठ ग्रामस्थ म्हणाले –
“एवढे वर्ष झाले, प्रशासन बदलले, पदाधिकारी बदलले… पण स्मशानभूमीचा प्रश्न मात्र तसाच आहे.
आम्हाला ना रस्ता, ना पाणी, ना वीज. फक्त आश्वासनं मिळतात.”
महिलांनीही आपला आवाज ठामपणे उठवला –
“जेव्हा पुरुषही या रस्त्यावरून जायला घाबरतात, तेव्हा आम्हा महिलांची काय अवस्था होत असेल?”
आज सकाळी गजानन पंदेकर यांचे हृदयविकाराने निधन झाले.
अंत्यसंस्कारासाठी त्यांची अंत्ययात्रा जेव्हा नाल्यातून जावी लागली,
तेव्हा गावातील प्रत्येक डोळा पाणावला… पण हे अश्रू केवळ शोकाचे नव्हते – ते अपमानाचे होते.
प्रश्न एवढाच आहे – गावकऱ्यांच्या मृत्यूनंतरही जर सन्मान नसेल,
तर लोकशाहीत ‘जनतेचा राजा’ असलेल्या माणसाला न्याय कधी मिळणार?
हिरपूरच्या या दुःखाला आणि संतापाला उत्तर फक्त विकासात नाही – तर जबाबदारी स्वीकारण्यात आहे.
Read Also : https://ajinkyabharat.com/passo-badhel-kasamapurat-chorratyancha-admission/