फडणवीस यांचा राष्ट्रीय अभ्यास कमी – संजय राऊत यांचा घणाघात
दिल्ली निवडणुकीच्या निकालावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.
“मुख्यमंत्री झालं म्हणजे शहाणा झालो असं नाही. काही भाग्य योग असतात आणि काही
फ्रॉड भाग्य योग असतात. हे सरकार फ्रॉड भाग्य योगाने आलेलं आहे,” अशी टीका त्यांनी केली.
Related News
आनंदाची बातमी! एलपीजीवरील अवलंबित्व कमी होणार? सरकारचा Ethanol कडे मोठा कल
भारतातील ऊर्जा क्षेत्रात मोठे बदल घडवून आणणारी एक महत्त्वाची घडामोड समोर येत आहे. स्वयंपाकासाठी वापरल्या...
Continue reading
आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून Gautam Adani पुन्हा अव्वल; मुकेश अंबानी दुसऱ्या क्रमांकावर
भारतातील दोन दिग्गज उद्योगपतींमधील संपत्तीची शर्यत पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.
Continue reading
आज अकोल्यात बुवाबाजीविरोधी परिषद; प्रा. श्याम मानव यांचे जाहीर व्याख्यान ठरणार आकर्षण
अकोला शहरात अंधश्रद्धेविरोधात जनजागृती करण्याच्या उद्देशाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले अस...
Continue reading
वर्षातील सर्वात मोठी घोषणा: ‘Love and War’ची दमदार एन्ट्री, 21 जानेवारी 2027 ला प्रेक्षकांच्या भेटीला
भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात चर्चेत असलेल्या आणि अत्यंत प्रतिक्षित प्रकल्पा...
Continue reading
फडणवीस यांनी राहुल गांधींवर केलेल्या टिकेला उत्तर देताना राऊत म्हणाले, “फडणवीस अजून राष्ट्रीय नेते नाहीत.
त्यांचा राष्ट्रीय प्रश्नांचा अभ्यास कमी आहे.
त्यांनी अभ्यास करावा. जोपर्यंत अमित शाह आहेत, तोपर्यंत त्यांना राष्ट्रीय स्तरावर संधी मिळेल की नाही, याबाबत शंका आहे.”
दिल्लीतील निकाल आधीच ठरलेला होता, असा दावा करत राऊत यांनी सांगितले की,
“फडणवीस प्रचाराला गेले नसते तरी निकाल तोच आला असता.” तसेच, एकनाथ शिंदे यांच्यावरही टीका करत,
“शिंदे यांची मातोश्री दिल्लीत आहे, त्यांना तिथे रात्रीच जावं लागतं, कारण दिवसा कुणी भेटत नाही,” असा टोला त्यांनी लगावला.