चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेच्या अंतिम फेरीत टीम इंडियाने धडक मारली आहे.
भारताचा अंतिम फेरीत सामना दक्षिण अफ्रिका आणि न्यूझीलंड यांच्यातील विजयी संघाशी होणार आहे.
दुसरीकडे, हा सामना कर्णधार रोहित शर्माच्या कारकिर्दीचा शेवट असेल, अशी चर्चा क्रीडावर्तुळात रंगली आहे.
यावर मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर याने आपलं मत मांडलं आहे.
टीम इंडियाने उपांत्य फेरीच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा ४ गडी राखून पराभव केला.
Related News
वॉशिंग्टन: अमेरिकेचे माजी अध्यक्ष आणि पुन्हा अध्यक्षपदाचे प्रमुख दावेदार डोनाल्ड ट्रम्प
यांनी अत्याधुनिक हवाई संरक्षण यंत्रणेची (Air Defence System) घोषणा केली आहे.
या यंत्रणेचं ...
Continue reading
नाशिक-मुंबई महामार्गालगत असलेल्या जिंदाल कंपनीत लागलेली आग आज सलग तिसऱ्या दिवशी सुद्धा धुमसत आहे.
तब्बल 72 तास उलटल्यानंतरही ही आग पूर्णतः आटोक्यात आलेली नसून,
संपूर्ण परिसरात प...
Continue reading
पुणे (प्रतिनिधी): लग्नात अपेक्षित हुंडा व मानपान न मिळाल्याने विवाहितेचा सासरच्या
मंडळींकडून मानसिक व शारीरिक छळ सुरू होता. या छळाला कंटाळून हडपसर
येथील 22 वर्षीय दीपा उर्फ देवकी...
Continue reading
बच्चन सिंग यांची नागपूर कमांडर म्हणून बदली; आगामी स्थानिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बदल
अकोला (प्रतिनिधी): महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाकडून राज्यभरातील पोलीस अधीक्षकांच्या
...
Continue reading
अकोला (प्रतिनिधी): काल झालेल्या जोरदार पावसामुळे डाबकी रोड परिसरात
वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण झाला आहे. पावसाच्या तीव्रतेमुळे रस्ते जलमय झाले असून,
सुरू असलेल्या रस्ते रुंदीकरण...
Continue reading
अकोला (प्रतिनिधी): इयत्ता दहावीचा निकाल १३ मे रोजी जाहीर झाल्यानंतर जिल्ह्यातील
कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये अकरावीच्या प्रवेशाची प्रक्रिया जोमात सुरू झाली आहे.
१९ मेपासून सुरू झाले...
Continue reading
अकोला (प्रतिनिधी): गेल्या काही दिवसांपासून अकोल्यातील पातुर, बाळापूर तालुक्यांसह इतर
भागांमध्ये सतत घिरट्या घालणाऱ्या विमानामुळे नागरिकांमध्ये संभ्रमाची स्थिती निर्माण झाली होती.
...
Continue reading
अकोला (प्रतिनिधी): अकोला शहरात गेल्या एक तासापासून प्री-मान्सून पावसाने जोर धरला
असून शहरातील अनेक भागांमध्ये पाणी साचल्याचे चित्र आहे.
काही ठिकाणी रस्त्यांवर जलजमाव झाल्याने वाह...
Continue reading
अकोला (प्रतिनिधी): अकोल्याच्या अकोट फाईल परिसरातील पूरपीडित इंदिरानगरमध्ये
भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात
आल्याची धक्कादायक घटना समोर आली...
Continue reading
अकोल्यात गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पावसाचा धुमाकूळ सुरूच असून अनेक ठिकाणी
आलेल्या पावसामुळे पिकांना फटका बसला आहे. तर आगामी खरीप हंगामाची तयारीही खोळंबली आहे.
अकोल्यातील गोर...
Continue reading
नवी दिल्ली (प्रतिनिधी) – पाकिस्तानसाठी जासूसी केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात
आलेल्या यूट्यूबर ज्योती मल्होत्रा उर्फ ‘ज्योती राणी’ या प्रकरणात एक नवा खुलासा समो...
Continue reading
अकोला (प्रतिनिधी) – लग्नसमारंभ म्हटले की विविध आकर्षक कार्यक्रम,
आधुनिक ट्रेंड्स हे सामान्य झाले असताना अकोल्यात एका विवाहसोहळ्याने सामाजिक व धार्मिक
जाणीवेचा नवा आदर्श निर्माण क...
Continue reading
दुबईच्या आंतरराष्ट्रीय मैदानात खरं तर २६५ धावांचं खडतर आव्हान होतं.
पण हे आव्हान भारताने सहज गाठलं. आता भारत अंतिम फेरीत दक्षिण अफ्रिका आणि न्यूझीलंड यांच्यातील विजयी संघाशी लढा करणार आहे.
हा सामना ९ मार्चला होणार आहे. पण ९ मार्च रोहित शर्माच्या वनडे कारकिर्दीचा शेवटचा सामना असेल का?
अशी चर्चा आता सोशल मीडियावर रंगली आहे. रोहित शर्माचं वय आणि पुढील रणनिती पाहता बीसीसीआय काय निर्णय घेते याकडे लक्ष लागून आहे.
कारण भारतीय संघ २०२७ मध्ये वनडे वर्ल्डकप खेळणार आहे. तिथपर्यंत रोहित शर्माची वनडे जागा राहील की नाही?
याबाबतही शंका आहे. या सर्व प्रश्नांबाबत मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर याला प्रश्न विचारण्यात आला.
दुबईत पार पडलेल्या पत्रकार परिषदेत गौतम गंभीरला विचारलं गेलं की, चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर रोहित शर्माचा प्लान काय आहे? त्याच्यात अजून किती क्रिकेट बाकी आहे?
प्रश्नांचा भडिमार सुरु झाल्यानंतर मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरने सांगितलं की, ‘आता तर चॅम्पियन्स ट्रॉफीचा अंतिम सामना समोर आहे.
आता मी याबाबत काय बोलू?
पण एक गोष्ट सांगू इच्छितो की, जर कर्णधार याच पद्धतीने फलंदाजी करत असेल
तर तो ड्रेसिंग रुमसाठी मेसेज आहे. त्याच्यात अजून क्रिकेट बाकी आहे. रोहितने मोठी खेळी केली नाही पण चांगली खेळी केली आहे.
आम्ही त्याच प्रभावाने खेळाडूंचं मूल्यमापन करतो.’
गौतम गंभीरने पुढे सांगितलं की, तज्ज्ञ आणि पत्रकार धावा आणि सरासरी बघतात.
पण आम्ही त्या खेळाडूने सामन्यात कशी छाप सोडली हे पाहतो. जर सर्व काही व्यवस्थित आहे तर त्याने काही फरक पडत नाही.
आपण ज्या प्रकारचे क्रिकेट खेळू इच्छितो त्यासाठी जर कर्णधार पहिला हात वर करत असेल तर त्यापेक्षा चांगले काहीही असू शकत नाही.
दुसरीकडे, बीसीसीआय चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर वनडे फॉर्मेटसाठी वेगळा विचार करत आहे. २०२७ वनडे वर्ल्डकप स्पर्धेच्या तयारीसाठी नव्या कर्णधाराच्या शोधात आहे.
त्यामुळे चॅम्पियन्स
ट्रॉफी ही रोहित शर्माच्या वनडे कारकिर्दीचा शेवटचा सामना असू शकतो.
आता रोहित शर्मा चॅम्पियन्स ट्रॉफीच्या जेतेपदानंतर निवृत्ती घेतो की पुढे खेळतो हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
या स्पर्धेनंतर टीम इंडिया थेट इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिका खेळणार आहे. ही कसोटी मालिका जूनमध्ये होणार आहे.
या मालिकेपूर्वी संघात काय उलथापालथ होते याकडे लक्ष लागून आहे.