चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेच्या अंतिम फेरीत टीम इंडियाने धडक मारली आहे.
भारताचा अंतिम फेरीत सामना दक्षिण अफ्रिका आणि न्यूझीलंड यांच्यातील विजयी संघाशी होणार आहे.
दुसरीकडे, हा सामना कर्णधार रोहित शर्माच्या कारकिर्दीचा शेवट असेल, अशी चर्चा क्रीडावर्तुळात रंगली आहे.
यावर मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर याने आपलं मत मांडलं आहे.
टीम इंडियाने उपांत्य फेरीच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा ४ गडी राखून पराभव केला.
Related News
Bigg Boss 19 Grand Finale : बिग बॉस 19 चा भव्य ग्रँड फिनाले आज! कोण होणार विनर? कुठे आणि किती वाजता पाहाल शो?
Bigg Boss 19 Grand Finale : देशातील...
Continue reading
‘कुबूल है’ ते ‘सात फेरे’पर्यंत! बिग बॉस फेम सारा खानचा कृष्ण पाठकसोबत दोन्ही परंपरांत विवाहसोहळा
टेलिव्हिजन आणि रिअॅलिटी शो बिग बॉसमधून प्रेक्षकांच्या परिचयाला आलेली लोकप्रिय अभिन...
Continue reading
माधुरी दीक्षित आणि डॉ. शिरीराम नने : अमेरिकेतील शांत जीवनानंतर भारतात परतण्यामागील कथा
बॉलिवूडची ‘नृत्याची राणी’ माधुरी दीक्षित हे 1990 च्या दश...
Continue reading
लहान मुलांना सर्दी-खोकला झाल्यास वाफ देणे योग्य की अयोग्य? डॉक्टर हिमांशू भदानी यांचा सल्ला
हिवाळ्याचा हंगाम सुरू झाला की लहान मुलांमध्ये सर्दी-खोकला
Continue reading
सावधान! प्लास्टिकच्या बाटलीतून पाणी पिणे होऊ शकते गंभीर आजाराचे कारण
आजकाल आपण सर्वच प्लास्टिकच्या बाटल्यांचा वापर करतो, विशेषतः पाणी, रस, सॉफ्ट ड्र...
Continue reading
जेष्ठ पत्रकार स्व. सुधीर पाठक यांचे लिखाण आजही प्रेरणादायी – अकोट तालुक्यात स्मृतिदिन कार्यक्रम
अकोट: जेष्ठ पत्रकार स्व. सुधीर पाठक
Continue reading
जागतिक स्तरावर चमकलेले 4 भारतीय पदार्थ : अमृतसरी कुलचा, बटर चिकन, ह्यदराबादी बिर्याणी आणि शाही पनीर ‘टेस्ट अॅटलस’च्या टॉप १०० पदार्थांच्या यादीत स्थान मिळवले
भारतीय खाद्यसंस्कृती ...
Continue reading
चाणक्य नीती: असे लोक जर तुमच्या घरात असतील, तर सावधान! तुमच्या जीवाला धोका असू शकतो
चाणक्य नीती: आयुष्यात प्रत्येकाला सुख, समृद्धी आणि सुरक्षिततेची इच्छा असते, पण कधी कधी आपल्या घ...
Continue reading
मोत्याची अंगठी घालण्याचे फायदे आणि योग्य पद्धत – ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने मार्गदर्शन
आजकाल फॅशन आणि सौंदर्याच्या दृष्टीने अंगठी, हार किंवा इतर दागिन...
Continue reading
महिलां नी रोज किती प्रोटीन घ्यावे? निरोगी राहण्यासाठी जाणून घ्या
सध्याच्या काळात महिलां चे आरोग्य अधिक महत्त्वाचे झाले आहे. कामकाज, घरकाम, व्यायाम आणि ...
Continue reading
दुबईच्या आंतरराष्ट्रीय मैदानात खरं तर २६५ धावांचं खडतर आव्हान होतं.
पण हे आव्हान भारताने सहज गाठलं. आता भारत अंतिम फेरीत दक्षिण अफ्रिका आणि न्यूझीलंड यांच्यातील विजयी संघाशी लढा करणार आहे.
हा सामना ९ मार्चला होणार आहे. पण ९ मार्च रोहित शर्माच्या वनडे कारकिर्दीचा शेवटचा सामना असेल का?
अशी चर्चा आता सोशल मीडियावर रंगली आहे. रोहित शर्माचं वय आणि पुढील रणनिती पाहता बीसीसीआय काय निर्णय घेते याकडे लक्ष लागून आहे.
कारण भारतीय संघ २०२७ मध्ये वनडे वर्ल्डकप खेळणार आहे. तिथपर्यंत रोहित शर्माची वनडे जागा राहील की नाही?
याबाबतही शंका आहे. या सर्व प्रश्नांबाबत मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर याला प्रश्न विचारण्यात आला.
दुबईत पार पडलेल्या पत्रकार परिषदेत गौतम गंभीरला विचारलं गेलं की, चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर रोहित शर्माचा प्लान काय आहे? त्याच्यात अजून किती क्रिकेट बाकी आहे?
प्रश्नांचा भडिमार सुरु झाल्यानंतर मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरने सांगितलं की, ‘आता तर चॅम्पियन्स ट्रॉफीचा अंतिम सामना समोर आहे.
आता मी याबाबत काय बोलू?
पण एक गोष्ट सांगू इच्छितो की, जर कर्णधार याच पद्धतीने फलंदाजी करत असेल
तर तो ड्रेसिंग रुमसाठी मेसेज आहे. त्याच्यात अजून क्रिकेट बाकी आहे. रोहितने मोठी खेळी केली नाही पण चांगली खेळी केली आहे.
आम्ही त्याच प्रभावाने खेळाडूंचं मूल्यमापन करतो.’
गौतम गंभीरने पुढे सांगितलं की, तज्ज्ञ आणि पत्रकार धावा आणि सरासरी बघतात.
पण आम्ही त्या खेळाडूने सामन्यात कशी छाप सोडली हे पाहतो. जर सर्व काही व्यवस्थित आहे तर त्याने काही फरक पडत नाही.
आपण ज्या प्रकारचे क्रिकेट खेळू इच्छितो त्यासाठी जर कर्णधार पहिला हात वर करत असेल तर त्यापेक्षा चांगले काहीही असू शकत नाही.
दुसरीकडे, बीसीसीआय चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर वनडे फॉर्मेटसाठी वेगळा विचार करत आहे. २०२७ वनडे वर्ल्डकप स्पर्धेच्या तयारीसाठी नव्या कर्णधाराच्या शोधात आहे.
त्यामुळे चॅम्पियन्स
ट्रॉफी ही रोहित शर्माच्या वनडे कारकिर्दीचा शेवटचा सामना असू शकतो.
आता रोहित शर्मा चॅम्पियन्स ट्रॉफीच्या जेतेपदानंतर निवृत्ती घेतो की पुढे खेळतो हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
या स्पर्धेनंतर टीम इंडिया थेट इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिका खेळणार आहे. ही कसोटी मालिका जूनमध्ये होणार आहे.
या मालिकेपूर्वी संघात काय उलथापालथ होते याकडे लक्ष लागून आहे.