अकोल्याच्या बार्शीटाकळी मधील राजनखेड –
महागाव गावातील रस्ता गेल्या दोन महिन्यांपूर्वी साडेसात कोटी रुपयांचा बनण्यात आला.
काही दिवसातच रस्त्यांची मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाली असून रस्ता पूर्णता उघडून जात आहे.
Related News
यावर कोटी रुपये खर्च करून पाण्यात गेल्याचा आरोप गावकऱ्यांनी केलाय.
दरम्यान रस्त्याच्या मधोमध खड्डे पडत असून हाताने डांबर रस्त्याची निघत आहे.
तर चालू रोड मध्ये बऱ्याच गाड्या रस्त्याच्या कडेला, मधोमध फसू लागले आहेत.
तर दुसरीकडे रस्त्याच्या दुतर्फा बाजूला पाहिजे त्या प्रमाणात मुरुमही टाकला नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय.
मात्र आता महागाव ते राजनखेड पर्यंतचा रस्ता हा कोटी रुपये खर्च करून बनवला.
या रस्त्यावर चार ते पाच गावातील नागरिकांचे येणे जाणे केले जाते.. दरम्यान दोन महिन्यातच या रस्त्याची दुरवस्था झाल्याने नागरिकांकडून तीव्र शब्दात व्यक्त केला जातोय.
यावर महागाव आणि राजनखेड येथील गावच्या उपसरपंचांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे तक्रार दाखल केली आहे.
रस्ता परत करावा अन्यथा जनआंदोलन किंवा आमरण उपोषण करू असा इशाराही ग्रामस्थांनी प्रशासनाला दिलाय.
Read Also : https://ajinkyabharat.com/odishat-5th-and-4-vidya-vidyarthyananasathi-pass-fail-defense-pune-applied/
