नवी दिल्ली: भारत आणि पाकिस्तानमधील तणाव ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर अधिकच तीव्र झालेला असताना,
केंद्र सरकारने दहशतवादाविरुद्ध एक कठोर आणि ऐतिहासिक निर्णय घेतला आहे.
केंद्र सरकारशी संबंधित सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, यापुढे भारताविरुद्ध करण्यात
Related News
शिवसेना (उबाठा) मध्ये नेतृत्वबदलामुळे पक्षातील अंतर्गत कलह आणखी गडद होणार
दोन कोटी विस लाखां च्या नावाखाली रुग्णसेवकाला सायबर गुंड्याकडून गंडवण्याचा प्रयत्न
शाळांचे परिसर एका महिन्यात तंबाखूमुक्त करण्याचे आदेश
अतिक्रमण हटाव मोहीम का फक्त दुर्बळांवरच? अपंगाचे दुकान तोडले –
जुन्या वादातून दोन गटात झालेल्या शस्त्रास्त्र हाणामारी
अकोल्यात विविध मागण्यांसाठी आज धरणे आंदोलन करणाऱ्यात आले
नवी दिल्लीतील भारत मंडपममध्ये पार पडलेल्या राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पीयूष गोयल
अखेर कातखेड,पिंपळखुटा गावात रस्त्याच्या कामाला सुरुवात
शेलुबाजार आरोग्य केंद्रात क्षयरुग्ण तपासणी शिबिर; डिजिटल एक्स-रेद्वारे ८७ संशयितांची तपासणी
पार्डी ताड–पिंपळखुटा रस्ता सहा महिन्यांतच खड्ड्यात! मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेवर प्रश्नचिन्ह
अखेर लेखी आश्वासनाने उपोषणाची मांघार!
दहीहंडा रोडवर मोठमोठे खड्डे; नागरिकांच्या सहकार्यातून काही खड्ड्यांची भर घाल
येणारी कोणतीही दहशतवादी कारवाई ‘युद्ध’ म्हणून मानली जाईल.
‘ऑपरेशन सिंदूर’च्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानकडून भारतात २६ ठिकाणी दहशतवादी
कारवाया करण्याचा प्रयत्न झाल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयाने दिली.
त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने ही ठोस भूमिका घेतली आहे.
दहशतवाद म्हणजेच युद्ध
सरकारच्या नव्या भूमिकेनुसार, पाकिस्तानकडून प्रायोजित कोणतीही दहशतवादी घटना थेट युद्ध मानली जाईल
आणि त्याला सैनिकी उत्तर दिलं जाईल. यामुळे भारताची सुरक्षा नीती अधिक आक्रमक आणि परिणामकारक होणार असल्याचं मानलं जात आहे.
या निर्णयामुळे, पाकिस्तानला ‘नॉन-स्टेट अॅक्टर्स’च्या आड लपता येणार नाही,
आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताला बळकटी मिळण्याची शक्यता आहे.
केंद्र सरकारचा हा निर्णय भारताच्या ‘झीरो टॉलरन्स टू टेररिझम’ धोरणाला अधिक ठोसपणे अधोरेखित करणारा आहे.
Read Also : https://ajinkyabharat.com/undergrained-bahujan-young-man-aghadichya-vati-donation-shibir/