अमरावती: आज (29 मार्च) दुपारी अडीचच्या सुमारास अशोक वाटिका चौक
परिसरातील उड्डाणपुलावर कालीपिली महिंद्रा मॅक्स वाहनाने (MH 30 P 5686)
समोरून येणाऱ्या किया चारचाकी (MH 27 DE 4651) गाडीला जोरदार धडक दिल्याची घटना घडली.
Related News
5 मोठे धक्के! मालमत्ता जप्तीच्या इशाऱ्यानंतर शिवसेना नगरसेवक रमेश म्हात्रे पोलिसांना शरण, डॉक्टर हल्ला प्रकरणात मोठे अपडेट
ट्रम्प सरकारचा मोठा निर्णय! 18 हजार बेकायदा भारतीयांच्या डिपोर्टेशनची चर्चा
पावसाळ्यात सर्दी-खोकल्याने त्रस्त? खेकड्याच्या रसाचे जाणून घ्या संभाव्य फायदे
भारताची पहिली भू-औष्णिक क्रांती! 14,000 फूट उंचीवर 1,000 मीटर खोल विहिरींचे उद्घाटन; लडाखमध्ये उभारला जाणार पहिला Geothermal वीज प्रकल्प
फ्लॅटमध्ये हिरवाई हवीय? कमी देखभालीत वाढणारी ‘ही’ इनडोअर रोपं ठरतील बेस्ट
Monsoon Update : इस्रोच्या सॅटेलाइट फोटोंनी वाढवली चिंता; महाराष्ट्रासह देशभरात मुसळधार पावसाचा इशारा
तामिळनाडूची प्रसिद्ध मसाला बेबी बटाटा रेसिपी; एकदा खाल तर वारंवार बनवाल
‘रामायण : पार्ट 1’च्या प्रमोशनमध्ये साई पल्लवीचा दिव्य अवतार; सीतेच्या लूकने जिंकली मनं
‘रामायण’चा ट्रेलर 24 जुलैला; दिल्लीतील ग्रँड इव्हेंटमध्ये रणबीर-साई पल्लवींचा जलवा
“मला वडिलांचा तिरस्कार वाटतो, कारण ते पुरुष आहेत…” ‘ Indias Got Talent 2 ’मधील साक्षी झाच्या वक्तव्याने खळबळ
मोठा धक्का! पुणे मेट्रो ३ची १२ स्थानके तयार, तरी उद्घाटन रखडले; जाणून घ्या ५ मोठी कारणे
जेनिफर विंगेटने वयाच्या 41 व्या वर्षी केलं दुसरं लग्न; कोण आहे तिचा परदेशी पती विलियम इश्माइल?
या अपघातात दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले असले तरी कोणतीही जीवितहानी झाली नाही.
अपघात कसा घडला?
टॉवरच्या दिशेने निघालेल्या कालीपिली वाहनाचा चालक गाडीवरील नियंत्रण गमावून
उड्डाणपुलावरील डिव्हायडरला धडकला आणि समोरून येणाऱ्या किया कारवर जाऊन आदळला.
अपघाताची माहिती मिळताच खदान पोलीस स्टेशनचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.
त्यांनी पंचनामा करून दोन्ही चालकांना वाहनांसह पुढील तपासासाठी नेले आहे.
उड्डाणपुलावरील वाढते अपघात – नागरिकांमध्ये संताप
सदर उड्डाणपूल शहरातील वाहतूक सुरळीत करण्यासाठी बांधण्यात आला असला तरी,
पुलाच्या उद्घाटनापासून अनेक अपघात घडले आहेत. काही वाहतूक चालक नो
एन्ट्री झोनमधून सर्रास वाहतूक करत असल्याने धोकादायक परिस्थिती निर्माण होते.
वाहतूक पोलिसांकडून याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
सेल्फी आणि रीलमुळे वाहतुकीला अडथळा
या उड्डाणपुलावर अनेक नागरिक सेल्फी काढणे आणि सोशल मीडियासाठी रील बनवणे
याकडे आकर्षित होत असल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे.
यामुळेच या ठिकाणी अपघातांचे प्रमाण वाढले आहे.
नागरिकांची मागणी – कायमस्वरूपी पोलिस बंदोबस्त ठेवावा
या पुलावर आतापर्यंत अनेकांनी आपले प्राण गमावले आहेत. त्यामुळे आणखी किती बळी
गेल्यावर प्रशासन उपाययोजना करणार? असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षकांनी या पुलावर कायमस्वरूपी पोलिस बंदोबस्त ठेवावा, अशी जोरदार मागणी होत आहे.

