अमरावती: आज (29 मार्च) दुपारी अडीचच्या सुमारास अशोक वाटिका चौक
परिसरातील उड्डाणपुलावर कालीपिली महिंद्रा मॅक्स वाहनाने (MH 30 P 5686)
समोरून येणाऱ्या किया चारचाकी (MH 27 DE 4651) गाडीला जोरदार धडक दिल्याची घटना घडली.
Related News
हसीन मस्तान मिर्झा: अंडरवर्ल्डच्या वारसाची सोशल मीडिया वर न्यायाची विनवणी
मोठी बातमी! Australiaत ज्यू धर्मीयांच्या कार्यक्रमात अंदाधुंद गोळीबार, दहा जणांचा मृत्यू
अक्षय खन्ना व विनोद खन्ना: बाप-मुलगा डान्सने सोशल मीडियावर गाजवले धुमाकूळ
किती महाग आहे अक्षय खन्ना याने ‘धुरंधर’ मध्ये घातलेला गॉगल ? कोणती कंपनी बनवते ?
अक्षय खन्नाचा ‘धुरंधर’ एण्ट्री व्हायरल; एक्स-गर्लफ्रेंड तारा शर्माची खास पोस्ट चर्चेत
5201314 : भारतात 2025 मध्ये लोकप्रिय झालेल्या संख्येचा अर्थ आणि ट्रेंड
सोशल मीडियावर फॅन पेजवरील फोटोवर प्राजक्ता चिडली; एआयच्या गैरवापराविरुद्ध स्पष्ट भूमिका
Rupal Tyagi Marriage 2025: आनंददायक लग्नाचे फोटो व्हायरल – चाहत्यांच्या उत्साहाला भरभराट
200% टॅरिफची धमकी! डोनाल्ड ट्रम्प यांच्या बैठकीनंतर भारत-अमेरिका व्यापारात खळबळ
जपान भूकंप: 10 फुटांच्या त्सुनामीचा इशारा, उत्तर भागात भीषण दहशत
Bigg Boss 19 Grand Finale: 5 टॉप स्पर्धकांमध्ये जबरदस्त टक्कर, आज कोण जिंकेल चमकदार ट्रॉफी?
या अपघातात दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले असले तरी कोणतीही जीवितहानी झाली नाही.
अपघात कसा घडला?
टॉवरच्या दिशेने निघालेल्या कालीपिली वाहनाचा चालक गाडीवरील नियंत्रण गमावून
उड्डाणपुलावरील डिव्हायडरला धडकला आणि समोरून येणाऱ्या किया कारवर जाऊन आदळला.
अपघाताची माहिती मिळताच खदान पोलीस स्टेशनचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.
त्यांनी पंचनामा करून दोन्ही चालकांना वाहनांसह पुढील तपासासाठी नेले आहे.
उड्डाणपुलावरील वाढते अपघात – नागरिकांमध्ये संताप
सदर उड्डाणपूल शहरातील वाहतूक सुरळीत करण्यासाठी बांधण्यात आला असला तरी,
पुलाच्या उद्घाटनापासून अनेक अपघात घडले आहेत. काही वाहतूक चालक नो
एन्ट्री झोनमधून सर्रास वाहतूक करत असल्याने धोकादायक परिस्थिती निर्माण होते.
वाहतूक पोलिसांकडून याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
सेल्फी आणि रीलमुळे वाहतुकीला अडथळा
या उड्डाणपुलावर अनेक नागरिक सेल्फी काढणे आणि सोशल मीडियासाठी रील बनवणे
याकडे आकर्षित होत असल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे.
यामुळेच या ठिकाणी अपघातांचे प्रमाण वाढले आहे.
नागरिकांची मागणी – कायमस्वरूपी पोलिस बंदोबस्त ठेवावा
या पुलावर आतापर्यंत अनेकांनी आपले प्राण गमावले आहेत. त्यामुळे आणखी किती बळी
गेल्यावर प्रशासन उपाययोजना करणार? असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षकांनी या पुलावर कायमस्वरूपी पोलिस बंदोबस्त ठेवावा, अशी जोरदार मागणी होत आहे.
