अमरावती: आज (29 मार्च) दुपारी अडीचच्या सुमारास अशोक वाटिका चौक
परिसरातील उड्डाणपुलावर कालीपिली महिंद्रा मॅक्स वाहनाने (MH 30 P 5686)
समोरून येणाऱ्या किया चारचाकी (MH 27 DE 4651) गाडीला जोरदार धडक दिल्याची घटना घडली.
Related News
उन्हाळ्यात ऊसाचा रस पिताय? डॉक्टरांचा गंभीर इशारा समोर
Arti Singh ने 20 दिवसांत 5 किलो वजन कमी कसं केलं? जाणून घ्या तिचा डाएट
Natasha Poonawalla चा हटके लूक व्हायरल; कांथा साडीत दिला ग्लॅमरस टच
“5 महिन्यांचा स्फोटक किचन स्कॅम: युट्यूबरच्या घरात कूकचे भयंकर कृत्य CCTVमध्ये कैद!”
Vicky Kaushal and Katrina Kaif चे समुद्रकिनारी आलिशान घर; भाड्याच्या घराची चर्चा
जुने PF पैसे अडकलेत? EPFO चं नवं पोर्टल देणार दिलासा
“धक्कादायक खुलासा 2026: कोहिनूर हिरा परताव्यावर 5 मोठे अपडेट्स आणि किंग चार्ल्ससमोरची मागणी!”
अलीगढमध्ये बनावट Paneer चा भांडाफोड; 1664 किलो साठा जप्त
18 वर्षांनंतर Akashdeep Saigal चा दमदार कमबॅक; ‘क्योंकि…’मध्ये नवा ट्विस्ट
Summer Drink : बेल शरबताचे जबरदस्त फायदे जाणून घ्या
या अपघातात दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले असले तरी कोणतीही जीवितहानी झाली नाही.
अपघात कसा घडला?
टॉवरच्या दिशेने निघालेल्या कालीपिली वाहनाचा चालक गाडीवरील नियंत्रण गमावून
उड्डाणपुलावरील डिव्हायडरला धडकला आणि समोरून येणाऱ्या किया कारवर जाऊन आदळला.
अपघाताची माहिती मिळताच खदान पोलीस स्टेशनचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.
त्यांनी पंचनामा करून दोन्ही चालकांना वाहनांसह पुढील तपासासाठी नेले आहे.
उड्डाणपुलावरील वाढते अपघात – नागरिकांमध्ये संताप
सदर उड्डाणपूल शहरातील वाहतूक सुरळीत करण्यासाठी बांधण्यात आला असला तरी,
पुलाच्या उद्घाटनापासून अनेक अपघात घडले आहेत. काही वाहतूक चालक नो
एन्ट्री झोनमधून सर्रास वाहतूक करत असल्याने धोकादायक परिस्थिती निर्माण होते.
वाहतूक पोलिसांकडून याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
सेल्फी आणि रीलमुळे वाहतुकीला अडथळा
या उड्डाणपुलावर अनेक नागरिक सेल्फी काढणे आणि सोशल मीडियासाठी रील बनवणे
याकडे आकर्षित होत असल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे.
यामुळेच या ठिकाणी अपघातांचे प्रमाण वाढले आहे.
नागरिकांची मागणी – कायमस्वरूपी पोलिस बंदोबस्त ठेवावा
या पुलावर आतापर्यंत अनेकांनी आपले प्राण गमावले आहेत. त्यामुळे आणखी किती बळी
गेल्यावर प्रशासन उपाययोजना करणार? असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षकांनी या पुलावर कायमस्वरूपी पोलिस बंदोबस्त ठेवावा, अशी जोरदार मागणी होत आहे.
