अकोला: शहरातील जेतवन नगरमध्ये ऑटोचा धक्का लागल्याच्या कारणावरून तीन
युवकांवर चाकू हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या
करण शितळे या युवकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणात खदान
Related News
शिष्यवृत्ती मिळण्यासाठी फरहान अमीन यांचा पुढाकार; मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडून आश्वासन
पोलीस अधीक्षक मा. अर्चित चांडक यांच्या हस्ते विद्यार्थिनींचा गौरव.
कापूस खरेदी व ज्वारी खरेदी घोटाळ्याची sit चौकशी होणार
पोस्टे खदान पोलिसांची मोठी कामगिरी – ११ घरफोड्यांचे गुन्हे उघड, १४.३२ लाखांचा मुद्देमाल जप्त
कोलवड गावात दुर्दैवी घटना :
बीडमध्ये धक्कादायक घटना: दफनविधीवेळी मृत घोषित केलेलं नवजात बाळ निघालं जिवंत!
कर्तव्यदक्ष रास्त भाव धान्य दुकानदारांचा प्रमाणपत्र देउन सत्कार व सन्मान
गांधीग्राम येथे कावड यात्रेपूर्वी जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांची पूर्णा नदी घाटाची पाहणी
राजराजेश्वर महाराजांच्या कावड यात्रेसाठी प्रशासन सज्ज; मार्गाची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी
राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा महासचिव पदी विकास पवार यांची नियुक्ती
गुरुपौर्णिमा: ज्ञान, कृतज्ञता आणि सद्गुणांचा पवित्र उत्सव
इंझोरीत शेतकऱ्यांना दुबार संकट; २०० एकरावर पेरणी खोळंबली,
पोलिसांनी एकूण 8 आरोपींवर गुन्हा दाखल केला असून, त्यापैकी 4 आरोपी अल्पवयीन असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
मृतकाच्या कुटुंबाची न्यायासाठी लढा – फाशीची मागणी
या हत्याकांडातील आरोपींना कठोर शिक्षा मिळावी, यासाठी आज अकोला शहरातील खदान
परिसरातून जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला.
या मोर्चात मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते.
मृतक करण शितळेच्या आईने आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी, अशी जोरदार मागणी केली.
घटनेची पार्श्वभूमी
काही दिवसांपूर्वी जेतवन नगर येथे किरकोळ कारणावरून तणाव निर्माण झाला होता.
ऑटोचा किरकोळ धक्का लागल्याने वाद वाढला आणि त्याचे पर्यवसान चाकू हल्ल्यात झाले.
यात करण शितळे गंभीर जखमी झाला होता आणि उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
पोलिसांची कारवाई
खदान पोलिसांनी तातडीने कारवाई करत आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
या आरोपींवर कडक कारवाई करण्यात येईल, असे पोलिसांनी आश्वासन दिले आहे. मात्र,
मृतकाच्या कुटुंबीयांना फाशीच्या शिक्षेशिवाय दुसरा पर्याय मान्य नसून,
त्यांनी आरोपींना कठोरात कठोर शिक्षा मिळावी यासाठी न्यायालयीन लढाई लढण्याचा निर्धार केला आहे.
नागरिकांमध्ये संताप – कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह
या घटनेमुळे शहरात संतापाची लाट उसळली आहे. अशा घटना वारंवार घडत असल्याने कायदा
व सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. प्रशासनाने कठोर पावले उचलून आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी,
अशी मागणी मृतकाच्या कुटुंबीयांसह नागरिकांकडून केली जात आहे.