अकोला | 14 एप्रिल 2025:
अकोला जिल्ह्यातील खारपाण पट्ट्यातील उगवा गावाला भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे.
जवळपास 15,000 लोकसंख्या असलेल्या या गावात महिन्योनमहिने नळाला
Related News
गुरुग्राम हत्याकांड नवा खुलासा: वडिलांनी राधिकावर झाडल्या ५ गोळ्या; किचनमध्येच केला क्रूर अंत
शेतरस्त्यांसाठी समग्र योजना; मुख्यमंत्री फडणवीसांची मोठी घोषणा
जयंत पाटील यांचा राजीनामा; शशिकांत शिंदे नवे प्रदेशाध्यक्ष होण्याची शक्यता
ज्वारी खरेदीत घोटाळ्याचा आरोप; प्रहार पक्षाच्या जिल्हाध्यक्षांवर एसआयटी चौकशी
बुलढाणा जिल्हा रुग्णालयात नातेवाईकांमध्ये तुफान हाणामारी; सुरक्षेवर उठले प्रश्न
खदान परिसरात युवकावर चार जणांचा प्राणघातक हल्ला;
अकोल्यात आकाशात सूर्याभोवती इंद्रधनुष्य! नागरिकांनी घेतला अनोख्या दृश्याचा आनंद
जन सुरक्षा की भाजप सुरक्षा विधेयक उद्धव ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल
वारी हनुमान येथील डोहात युवकाचा बुडून मृत्यू
डाबकी रोड पोलिसांची गोवंश रक्षण कारवाई
आमदार संजय गायकवाड अडचणीत; कॅन्टीन कर्मचाऱ्याला मारहाणीप्रकरणी गुन्हा दाखल,
पिंपरी-चिंचवडचे नामकरण ‘राजमाता जिजाऊनगर’ करावे – विधानसभेत आमदार उमा खापरे यांची ठाम मागणी
पाणी न येण्याची गंभीर स्थिती निर्माण झाली आहे. परिणामी नागरिक त्रस्त असून,
पाणी चोरीच्या भीतीने पाण्याच्या टाक्यांना कुलूप लावून ठेवावे लागत आहे.
पाण्यासाठी टाक्यांना कुलूप, लग्नासाठी मुली नाहीत…
गावातील नागरिकांनी सांगितले की, “64 खेडी पाणी योजनेतून महिन्यातून एखाददाच पाणी येतं,”
त्यामुळे मिळालेलं पाणी कोण चोरून नेईल याची भीती असल्याने टाक्यांना कुलूप लावून ठेवावं लागतं.
गावात बहुतेक सर्वजण शेतकरी असल्याने दिवसभर शेतात असतात,
अशावेळी घरात कोण नसल्यामुळे पाणी चोरीचे प्रकार घडू लागले आहेत.
लग्नासाठीही अडचणी
या समस्येचं गंभीर वास्तव सांगताना काही ग्रामस्थ म्हणाले, “गावात पाणी नाही म्हणून
आमच्या तरुणांना लग्नासाठी मुली मिळेनाशा झालाय.
पाणी नसल्याने मुलींचे आई-वडील या गावात लग्न करायलाच तयार नाहीत.”
हे शब्द गावकऱ्यांच्या वेदनेचं प्रतिक आहेत.
शासनाच्या योजनांचा लाभ नाही
गावात लाखो रुपयांचे सरकारी निधीच्या माध्यमातून पाणी योजना राबवल्या गेल्या,
मात्र प्रत्यक्षात पाण्यासाठी नागरिकांना अजूनही मैलोनमैल पायपीट करावी लागते.
यामुळे शासनाच्या योजना कागदावरच राहत असल्याचं चित्र स्पष्ट होतं.
गावकऱ्यांची मागणी
गावकऱ्यांनी शासनाकडे तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.
खारपाण पट्ट्यातील गावांना विशेष योजना करून सतत आणि पुरेसं
पाणी पुरवठा करण्याची गरज आहे, असं ग्रामस्थ ठामपणे सांगतात.
Read Also : https://ajinkyabharat.com/ashwini-bidre-massacre-main-accused-abhay-kurundkarla-birthplace/