अकोला, १२ एप्रिल –
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मागणीसाठी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने अकोला शहरात
तीव्र आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनाचं नेतृत्व प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक
Related News
उमरा उपकेंद्राची घोर निष्काळजी — मेंढीपालाचा जीव थोडक्यात वाचला,
मशालीतून उठली आग – शेतकरी आणि दिव्यांगांच्या हक्कासाठी ‘प्रहार’चा एल्गार!
२४ तासांत जबरी चोरीचा पर्दाफाश; अकोला पोलिसांची उत्कृष्ट कामगिरी
सोनं 1 लाख पार करणार? – तज्ज्ञांच्या अंदाजांमधून गुंतवणूकदार संभ्रमात!
जळगावचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना ठार मारण्याची धमकी; मुख्यमंत्री कार्यालयाला ईमेल
अहमदाबादमध्ये अपार्टमेंटला आग; धडकी भरवणाऱ्या १८ जणांच्या रेस्क्यूचा थरार
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरून राजू शेट्टी आक्रमक
बुद्धगया महाबोधी महाविहार मुक्तीसाठी अकोटमध्ये ४०० नागरिकांची स्वाक्षरी
Saif Ali Khan Attack Case: 16 हजार पानी आरोपपत्रात गंभीर खुलासे; करीना कपूरचा पोलिसांना सविस्तर जबाब
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त राज्य शासनाचा उपक्रम – 14 व 15 एप्रिलला मोफत टूर सर्किट
किन्हीराजा : श्री शिवाजी हायस्कूलला दीड लाखांचे आरोप्लॅन्ट भेट – श्रीकृष्ण सोनुने यांचे योगदान
लाखपुरी येथे महात्मा फुले जयंती उत्साहात साजरी
व आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली करण्यात येत असून, १०० दिवस उलटूनही
राज्य सरकारने कर्जमाफीसंदर्भात ठोस भूमिका घेतली नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
या पार्श्वभूमीवर अकोला पूर्व मतदारसंघाचे आमदार रणधीर सावरकर यांच्या घरासमोर प्रहारच्या कार्यकर्त्यांनी
मध्यरात्री मशाल आंदोलन केलं. या आंदोलनादरम्यान शेतकऱ्यांच्या
कर्जमाफीसाठी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
शेतकऱ्यांच्या अडचणी सरकारपर्यंत पोहचवण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आल्याचं प्रहार कार्यकर्त्यांनी सांगितलं.
यावेळी सरकारकडून लवकरच कर्जमाफीसंदर्भात निर्णय घेतला जाईल,
असं आश्वासन आमदार रणधीर सावरकर यांनी दिलं.
आंदोलन स्थळी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू नये म्हणून पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.