अकोट, ता. १२ एप्रिल –
अकोट तालुका व शहरात वंचित बहुजन आघाडीच्या वतीने बुद्धगया महाबोधी महाविहार मुक्ती
आंदोलनासाठी स्वाक्षरी मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. बुद्धगया येथील महाबोधी महाविहाराचे
Related News
मनभा परिसरात संततधार पावसामुळे दुबार पेरणीचे संकट; शेतकऱ्यांचे मोठे नुकसान
हिंदी जीआरवर सरकारची माघार; ठाकरेबंधूंच्या एकतेमुळे मराठी ताकद उभी – संजय राऊतांचा दावा
हिंदी सक्तीवरून राज ठाकरे आक्रमक; “जाधव येऊ देत की कोणीतरी… आम्ही खपवून घेणार नाही!”
अकोला जिल्ह्यात व्यवसाय शिक्षण अधिकाऱ्यांचे जल्लोषात स्वागत
शिक्षण राज्यमंत्री यांच्या हस्ते श्री शिवाजी विद्यालयाच्या गौरी व वैभवीचा सत्कार
बोर्डी ग्राम पंचायत थकित गौण खनिज दंड वसुली प्रकरण गुलदस्त्यात
कुंडामधून गरम पाण्याचा झरा : अद्भुत घटना
पिंजर पोलिसाकडून अमली पदार्थ मिशन उडान दिनानिमित्त विविध विद्यालयातील विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन
जागतिक अंमली पदार्थविरोधी दिनानिमित्त ‘मिशन उडान’ अंतर्गत अकोला पोलिसांकडून भव्य जनजागृती उपक्रम
राजेश्वर मंदिराच्या विकासावरून आरोप-प्रत्यारोप; भाजपाची आमदार पठाण यांच्यावर टीका
दानापुर येथे राजर्षी शाहु महाराज जयंती उत्सव संपन्न
रशियात खासगी दौऱ्यावर गेलेले शशि थरूर; मॉस्कोमध्ये रशियाच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट
व्यवस्थापन बौद्ध समाजाच्या ताब्यात द्यावे, या मागणीसाठी ही मोहीम राबविण्यात येत आहे.
ही मोहीम ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशानुसार सुरू करण्यात आली असून, खानापूर
वेस येथील बौद्ध विवाह मंडपाजवळून मोहिमेला सुरुवात झाली. यावेळी बौद्ध धर्मगुरु तथागत गौतम
बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून मोहिमेची सुरूवात करण्यात आली.
तालुकाध्यक्ष चरण इंगळे आणि महासचिव रोशन पुंडकर यांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला.
या स्वाक्षरी मोहिमेला अकोटमधील सर्व स्तरांतील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून सुमारे ४०० महिला,
पुरुष व विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. या मोहिमेच्या यशस्वीतेसाठी वंचित बहुजन आघाडीचे
पदाधिकारी आणि कार्यकर्ते सक्रियपणे सहभागी झाले होते. यामध्ये संघटक सुरेंद्र ओईबे,
सुरेश गवई, पुरुषोत्तम भटकर, अनिल वानखडे, मिलिंद वानखडे, योगेश आग्रे, सुनीता वानखडे,
मुरलीधर तेलगोटे, मंदा कोल्हे, अर्चना वानखडे, माला वानखडे, शिला लबडे,
सोनू पोहरकार यांचा सहभाग उल्लेखनीय होता.
बौद्धगया महाबोधी महाविहार बौद्धांच्या आधिकारात देण्यात यावा,
या मुख्य मागणीसाठी पुढील काळातही ही मोहीम अधिक व्यापक केली जाणार
असल्याची माहिती वंचित बहुजन आघाडीने दिली आहे.