मुंबई, १२ एप्रिल –
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्यावरून राज्यातील वातावरण तापले असून, आता स्वाभिमानी शेतकरी
संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी थेट कृषीमंत्री माणिकराव कोकाटे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर सडकून टीका केली आहे.
Related News
IND vs ENG, T20 वर्ल्डकप 2026: संजू सॅमसनचा झंझावाती अर्धशतक, भारताची उपांत्य फेरीत विजयानुभवाची तयारी
टी20 वर्ल्डकप 2026 च्या उपांत्य फेरी...
Continue reading
अर्जुन तेंडुलकर आणि सानिया चंदोकचं विवाहसंस्कार: पारंपरिक लाल रंगातील समन्वित देखणे असेतं जोडीचं शैली विधान
क्रिकेटचे लीजेंड साचि...
Continue reading
९८वे ऑस्कर पुरस्कार 2026: भारतात कधी आणि कुठे पाहता येईल?
हॉलिवूडमधील सर्वात मोठा सिनेमा उत्सव पुन्हा एकदा आपल्या दारात आला आहे. 2026 मध्ये होणारे ९८वे
Continue reading
मोठी बातमी! इराणकडून भारताला सर्वात मोठी मदत — युद्धाच्या दरम्यान झाली निर्णायक घोषणा, भारतास मोठा दिलासा
मध्य पूर्वेतील परिस्थिती सध्या अतिशय तणावपूर्ण आणि अस्थिर आहे.
Continue reading
साराचा परंपरागत आकर्षक लूक: अर्जुन टेंडुलकरच्या लग्नात पिंक मनीष मल्होत्रा साडीमध्ये कमाल
भारतीय क्रिकेटचे दिग्गज सचिन तेंडु...
Continue reading
मद्यपान करताना चखणा कसा असावा? आरोग्यासाठी योग्य पर्याय कोणता?
मद्यपान हा आजच्या काळात अनेकांचा सामाजिक आणि वैयक्तिक जीवनाचा भाग बनला आहे. तरीही, आरोग...
Continue reading
रायगडमध्ये इस्रायल-इराण युद्धाच्या पार्श्वभूमीवर पेट्रोल पंपावर गर्दी; अफवांना प्रशासनाचा स्पष्टीकरण
रायगड, मुरुड तालुका – इस्रायल आणि इराणमध...
Continue reading
धारावीतील 436 झोपडपट्टीधारकांसाठी फडणवीस सरकारचा मोठा दिलासा, देवनार येथे हक्काचे घरकुल
धारावी : मुंबईतील धारावी येथे नुकतीच घडलेली आग या परिसरातील रह...
Continue reading
सोनं-चांदीच्या भावात घसरण; 10 ग्रॅम सोन्यासाठी आता किती रुपये लागणार?
जगभरातील राजकारण आणि युद्ध परिस्थितींचा परिणाम सोनं आणि चांदीच्या बाजारात...
Continue reading
पार्थ पवार राज्यसभेत पदार्पण: सुप्रिया सुळे यांचा मोलाचा सल्ला
महाराष्ट्र राजकारणात एक महत्त्वाची घडामोड घडत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि बारामतीचे माजी खासद...
Continue reading
इराण-इस्त्रायल युद्ध: रशियाने इराणच्या बाजूने केलेलं मोठं विधान, अमेरिका-इस्त्रायलवर आंतरराष्ट्रीय दबाव
इराण आणि इस्त्रायलमध्ये सुरू असलेल्...
Continue reading
मोठा धक्कादायक समाचार: इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांचे निधन; भारताने व्यक्त केले दु:ख
इराणमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे संपूर्ण जागतिक ...
Continue reading
काही दिवसांपूर्वी माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्यांविषयी वादग्रस्त वक्तव्य करत म्हटलं होतं की,
“शेतकरी कर्ज घेतात आणि त्यातून मिळणारे पैसे लग्न, साखरपुड्यावर खर्च करतात.
” तसेच, “भिकारी एक रुपया घेत नाही, पण आम्ही एक रुपयात पीक विमा देतो,”
असे वादग्रस्त विधान देखील त्यांनी याआधी केले होते. या विधानांमुळे मोठा गदारोळ निर्माण झाला होता.
विरोधकांनी याला मुद्दा बनवत कोकाटेंच्या राजीनाम्याची मागणी केली होती.
यानंतर कोकाटेंनी जाहीर माफी मागितली होती, तर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी देखील त्यांना समज दिली होती.
मात्र, यावर राजू शेट्टी यांनी संतप्त प्रतिक्रिया देताना म्हटलं की, “अजितदादांनी समज दिल्यानंतर ही
माणिकराव कोकाटेंचं बेताल वक्तव्य थांबत नाही. अशा मंत्र्याला मंत्रिमंडळात ठेवणं हे शेतकऱ्यांच्या अपमानासारखं आहे.
त्यांना त्वरित मंत्रिमंडळातून काढलं पाहिजे.”
त्याचप्रमाणे कांद्याच्या निर्यातीसंदर्भातही शेट्टींनी कोकाटेंना सुनावलं.
“जे आयात शुल्क त्यांनी आत्ताच शून्यावर आणलं, ते जर दोन महिने आधी केलं असतं,
तर शेतकऱ्यांचा कांदा आंतरराष्ट्रीय बाजारात विकला गेला असता,” असं ते म्हणाले.
अजित पवारांवरही निशाणा:
राजू शेट्टी यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांवरही निशाणा साधला.
“अकरा वेळा अर्थसंकल्प सादर करणाऱ्या अजित पवारांना राज्याच्या आर्थिक स्थितीची कल्पना असूनही
त्यांनी शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याचं खोटं आश्वासन दिलं. हे सरळसरळ गंडवणं आहे,” असा आरोप शेट्टींनी केला.
“राज्याची आर्थिक स्थिती बिकट आहे, असं सांगितलं जातं, पण तरीही ८६ हजार कोटींचे ‘शक्तीपीठ’ सारखे प्रकल्प राबवले जात आहेत.
हे दुहेरी धोरण शेतकऱ्यांशी विश्वासघात आहे,” अशी घणाघाती टीका त्यांनी केली.
शेट्टींनी स्पष्ट इशारा दिला की, “आता आम्ही थेट कार्यक्रमात जाऊन महायुतीच्या नेत्यांना जाब विचारणार आहोत.
” प्रहार जनशक्ती पक्षानंतर आता स्वाभिमानी शेतकरी संघटना देखील
आक्रमक पवित्रा घेतल्यामुळे सरकारसमोर दबाव वाढल्याचं चित्र आहे.