मुंबई, १२ एप्रिल –
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्यावरून राज्यातील वातावरण तापले असून, आता स्वाभिमानी शेतकरी
संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी थेट कृषीमंत्री माणिकराव कोकाटे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर सडकून टीका केली आहे.
Related News
सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी आयजी जालिंदर सुपेकर
यांच्यावर गंभीर स्वरूपाचे आरोप केले आहेत.
पत्रकार परिषदेत त्यांनी एक कथित ऑडिओ क्लिप माध्यमांसमोर सादर केली असून,
त्...
Continue reading
देशातील 7 कोटींपेक्षा अधिक कर्मचारी भविष्य निधी (EPFO)
सदस्यांसाठी मोठी आनंददायक बातमी आहे. केंद्र सरकारने वित्तीय
वर्ष 2024-25 साठी पीएफवरील व्याजदर 8.25 टक्के कायम ठेवण्याचा ...
Continue reading
बॉलीवूड अभिनेत्री आलिया भट्ट हिने कान फिल्म फेस्टिव्हल 2025
च्या समारोप सोहळ्यातील आपल्या काही अद्भुत छायाचित्रांचा सोशल मीडियावर खुलासा केला आहे.
आपल्या कान डेब्यूदरम्यान तिने फ...
Continue reading
पुणे: शहरातील खराडी परिसरात सुरू असलेल्या एका बनावट कॉल
सेंटरवर पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने मोठी छापेमारी करत कारवाई केली आहे.
प्राईड आयकॉन इमारतीत सुरू असलेल्या या कॉल सेंटर...
Continue reading
दिल्लीत शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली नीति
आयोगाच्या शासी परिषदेची 10वी बैठक पार पडली.
या बैठकीचं विषयवस्तू होती – ‘2047 मध्ये विकसित भारतासाठी विकसित राज...
Continue reading
विशाल आग्रे | अकोट प्रतिनिधी
अकोट : आगामी पावसाळा आणि संभाव्य पूरस्थिती लक्षात घेता केंद्र व राज्य
शासनाने राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेत (NFSA) अंतर्भूत लाभार्थ्यांसाठी महत्त्वाच...
Continue reading
आज खामगाव येथे नगरसेवक देवेंद्र देशमुख यांच्या घरी सांत्वनपर
भेट देण्यासाठी आले असता पत्रकारांनी त्यांना गाठले.
यावेळी सध्याच्या राज्यातील राजकीय परिस्थिती,
सामाजिक तणाव आणि प्र...
Continue reading
मान्सून ने दी दस्तक – केरल से शुरुआत
केरलमध्ये दक्षिण-पश्चिम मान्सूनची अधिकृत एंट्री झाली आहे.
यामुळे दक्षिण भारत, पश्चिम भारतातील हवामान बदलणार.
बंगालच्या उपस...
Continue reading
ठाणे जिल्ह्यात कोरोनामुळे पहिल्याचवेळी मृत्यूची नोंद झाली असून,
दुर्दैवाने हा बळी अवघ्या 21 वर्षीय तरुणाचा आहे. यामुळे प्रशासन,
आरोग्य विभाग आणि नागरिकांमध्ये चिंता निर्माण झाली ...
Continue reading
24 मे रोजी मान्सूनची ‘सरप्राईज एंट्री’
भारतीय हवामान खात्याने जाहीर केल्याप्रमाणे, नैऋत्य मोसमी पावसाने आज
(24 मे) केरळमध्ये 8 दिवस आधीच एंट्री घेतली आहे. यावर्षी मान्सूनचे आगमन ...
Continue reading
अकोला, दि. २४ : राज्य बियाणे महामंडळाच्या पैलपाडा येथील संशोधन केंद्र,
तसेच सेंटर ऑफ एक्सलन्स येथे संशोधित झालेल्या संकरित बीटी कपाशी
महाबीज 124 चे सहविपणन अंतर्गत संकरित बीट...
Continue reading
अकोल्याच्या उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेनेने आज नेहरू पार्क चौकातील महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या
कार्यालयात ठिय्या आंदोलन करत ग्रामीण पाणी पुरवठ्याच्या ज्वलंत विषयाला हात घातलाय....
Continue reading
काही दिवसांपूर्वी माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्यांविषयी वादग्रस्त वक्तव्य करत म्हटलं होतं की,
“शेतकरी कर्ज घेतात आणि त्यातून मिळणारे पैसे लग्न, साखरपुड्यावर खर्च करतात.
” तसेच, “भिकारी एक रुपया घेत नाही, पण आम्ही एक रुपयात पीक विमा देतो,”
असे वादग्रस्त विधान देखील त्यांनी याआधी केले होते. या विधानांमुळे मोठा गदारोळ निर्माण झाला होता.
विरोधकांनी याला मुद्दा बनवत कोकाटेंच्या राजीनाम्याची मागणी केली होती.
यानंतर कोकाटेंनी जाहीर माफी मागितली होती, तर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी देखील त्यांना समज दिली होती.
मात्र, यावर राजू शेट्टी यांनी संतप्त प्रतिक्रिया देताना म्हटलं की, “अजितदादांनी समज दिल्यानंतर ही
माणिकराव कोकाटेंचं बेताल वक्तव्य थांबत नाही. अशा मंत्र्याला मंत्रिमंडळात ठेवणं हे शेतकऱ्यांच्या अपमानासारखं आहे.
त्यांना त्वरित मंत्रिमंडळातून काढलं पाहिजे.”
त्याचप्रमाणे कांद्याच्या निर्यातीसंदर्भातही शेट्टींनी कोकाटेंना सुनावलं.
“जे आयात शुल्क त्यांनी आत्ताच शून्यावर आणलं, ते जर दोन महिने आधी केलं असतं,
तर शेतकऱ्यांचा कांदा आंतरराष्ट्रीय बाजारात विकला गेला असता,” असं ते म्हणाले.
अजित पवारांवरही निशाणा:
राजू शेट्टी यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांवरही निशाणा साधला.
“अकरा वेळा अर्थसंकल्प सादर करणाऱ्या अजित पवारांना राज्याच्या आर्थिक स्थितीची कल्पना असूनही
त्यांनी शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याचं खोटं आश्वासन दिलं. हे सरळसरळ गंडवणं आहे,” असा आरोप शेट्टींनी केला.
“राज्याची आर्थिक स्थिती बिकट आहे, असं सांगितलं जातं, पण तरीही ८६ हजार कोटींचे ‘शक्तीपीठ’ सारखे प्रकल्प राबवले जात आहेत.
हे दुहेरी धोरण शेतकऱ्यांशी विश्वासघात आहे,” अशी घणाघाती टीका त्यांनी केली.
शेट्टींनी स्पष्ट इशारा दिला की, “आता आम्ही थेट कार्यक्रमात जाऊन महायुतीच्या नेत्यांना जाब विचारणार आहोत.
” प्रहार जनशक्ती पक्षानंतर आता स्वाभिमानी शेतकरी संघटना देखील
आक्रमक पवित्रा घेतल्यामुळे सरकारसमोर दबाव वाढल्याचं चित्र आहे.