मुंबई, १२ एप्रिल –
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्यावरून राज्यातील वातावरण तापले असून, आता स्वाभिमानी शेतकरी
संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी थेट कृषीमंत्री माणिकराव कोकाटे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर सडकून टीका केली आहे.
Related News
गुरुग्राममधील टेनिसपटू राधिका यादव हत्येप्रकरणी नवे धक्कादायक तपशील समोर आले आहेत.
वडील दीपक यादव यांनी राधिकेवर ५ गोळ्या झाडल्या, त्यापैकी ४ गोळ्या लागून तिचा ज...
Continue reading
राज्यातील प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतापर्यंत रस्ता पोहोचावा यासाठी महाराष्ट्र सरकार समन्वित योजना राबवणार आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत घोषणा केली की, विविध विभाग...
Continue reading
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) प्रदेशाध्यक्षपदावरून जयंत पाटील यांनी राजीनामा दिला असून,
शशिकांत शिंदे यांची नावाची जोरदार चर्चा सुरु आहे. १५ जुलै रोजी नवा प...
Continue reading
शेतकऱ्यांच्या हक्कासाठी लढा देणाऱ्या प्रहार जनशक्ती पक्षासाठी अकोला जिल्ह्यातून धक्कादायक बातमी समोर आली आहे.
अकोट कृषी उत्पन्न बाजार समितीतील हमीभावाने झालेल्या ज्वारी खरेदीत मोठ...
Continue reading
बुलढाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात एका महिला रुग्णाच्या नातेवाईकांमध्ये तुफान हाणामारी
झाल्याची घटना घडली असून, याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
ही घटना वार्ड क्रमांक ...
Continue reading
नागपूरच्या खदान पोलिस स्टेशनच्या हद्दीतील कौलखेड परिसरात एका ३२ वर्षीय युवकावर चार मारेकऱ्यांनी
चाकू आणि लोखंडी पाइपने प्राणघातक हल्ला केला. ही धक्कादायक घटना गुरुवारी रात्री घडल...
Continue reading
आज 12 जुलै 2025 रोजी अकोला जिल्ह्यात एक विस्मयकारक नैसर्गिक घटना पाहायला मिळाली.
दुपारी 12 ते 12:15 दरम्यान आकाशात सूर्याभोवती इंद्रधनुष्यसारखे वलय,
म्हणजेच सूर्य प्रभामंडल (Sun ...
Continue reading
गुरुवारी विधानसभेत जन सुरक्षा विधेयक मंजूर करण्यात आलं .
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत जन सुरक्षा विधेयक सादर केलं त्यानंतर त्यावर चर्चा झाली
आणि नंतर आवाजी मतद...
Continue reading
संग्रामपूर प्रतिनिधी-
वारी हनुमान येथील डोहात बुडून एका युवकाचा मृत्यू झाल्याची घटना आज 11 जुलै रोजी दुपारी 2.30
वाजताचे सुमारास घडली. मृतक युवकाचे नाव अक्षय सिध्दार्थ भोजने रा. ...
Continue reading
अकोल्याच्या डाबकी रोड पोलीस स्टेशन अंतर्गत
गोवंश कारवाई करून एका बैल जोडीला जीवनदान दिले आहे.
ही कारवाई बजरंग दलच्या कार्यकर्त्यांच्या मदतीने करण्यात आली.
दरम्यान, गायगाव ...
Continue reading
शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात आले आहेत.
कॅन्टीनमधील कर्मचाऱ्याला मारहाण केल्याच्या प्रकरणी त्यांच्या विरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे...
Continue reading
राज्यभरात शहरांच्या नामांतराची लाट सुरू असताना, पिंपरी-चिंचवड शहराचे नामकरण
‘राजमाता जिजाऊनगर’ करावे, अशी ठाम मागणी भाजपच्या आमदार उमा खापरे यांनी विधानसभेत केली आहे.
त्यांनी जिज...
Continue reading
काही दिवसांपूर्वी माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्यांविषयी वादग्रस्त वक्तव्य करत म्हटलं होतं की,
“शेतकरी कर्ज घेतात आणि त्यातून मिळणारे पैसे लग्न, साखरपुड्यावर खर्च करतात.
” तसेच, “भिकारी एक रुपया घेत नाही, पण आम्ही एक रुपयात पीक विमा देतो,”
असे वादग्रस्त विधान देखील त्यांनी याआधी केले होते. या विधानांमुळे मोठा गदारोळ निर्माण झाला होता.
विरोधकांनी याला मुद्दा बनवत कोकाटेंच्या राजीनाम्याची मागणी केली होती.
यानंतर कोकाटेंनी जाहीर माफी मागितली होती, तर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी देखील त्यांना समज दिली होती.
मात्र, यावर राजू शेट्टी यांनी संतप्त प्रतिक्रिया देताना म्हटलं की, “अजितदादांनी समज दिल्यानंतर ही
माणिकराव कोकाटेंचं बेताल वक्तव्य थांबत नाही. अशा मंत्र्याला मंत्रिमंडळात ठेवणं हे शेतकऱ्यांच्या अपमानासारखं आहे.
त्यांना त्वरित मंत्रिमंडळातून काढलं पाहिजे.”
त्याचप्रमाणे कांद्याच्या निर्यातीसंदर्भातही शेट्टींनी कोकाटेंना सुनावलं.
“जे आयात शुल्क त्यांनी आत्ताच शून्यावर आणलं, ते जर दोन महिने आधी केलं असतं,
तर शेतकऱ्यांचा कांदा आंतरराष्ट्रीय बाजारात विकला गेला असता,” असं ते म्हणाले.
अजित पवारांवरही निशाणा:
राजू शेट्टी यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांवरही निशाणा साधला.
“अकरा वेळा अर्थसंकल्प सादर करणाऱ्या अजित पवारांना राज्याच्या आर्थिक स्थितीची कल्पना असूनही
त्यांनी शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याचं खोटं आश्वासन दिलं. हे सरळसरळ गंडवणं आहे,” असा आरोप शेट्टींनी केला.
“राज्याची आर्थिक स्थिती बिकट आहे, असं सांगितलं जातं, पण तरीही ८६ हजार कोटींचे ‘शक्तीपीठ’ सारखे प्रकल्प राबवले जात आहेत.
हे दुहेरी धोरण शेतकऱ्यांशी विश्वासघात आहे,” अशी घणाघाती टीका त्यांनी केली.
शेट्टींनी स्पष्ट इशारा दिला की, “आता आम्ही थेट कार्यक्रमात जाऊन महायुतीच्या नेत्यांना जाब विचारणार आहोत.
” प्रहार जनशक्ती पक्षानंतर आता स्वाभिमानी शेतकरी संघटना देखील
आक्रमक पवित्रा घेतल्यामुळे सरकारसमोर दबाव वाढल्याचं चित्र आहे.