अकोला | प्रतिनिधी
अकोला शहरातील नागरिक गेल्या काही दिवसांपासून पिवळसर आणि दूषित पाण्याचा पुरवठा होत
असल्याने मोठ्या त्रासाला सामोरे जात आहेत. शहराच्या विविध भागांतून अशा पाण्यामुळे आरोग्यावर परिणाम होत असल्याच्या तक्रारी वाढत असून नागरिकांमध्ये नाराजी आहे.
Related News
गुरुग्राम हत्याकांड नवा खुलासा: वडिलांनी राधिकावर झाडल्या ५ गोळ्या; किचनमध्येच केला क्रूर अंत
शेतरस्त्यांसाठी समग्र योजना; मुख्यमंत्री फडणवीसांची मोठी घोषणा
जयंत पाटील यांचा राजीनामा; शशिकांत शिंदे नवे प्रदेशाध्यक्ष होण्याची शक्यता
ज्वारी खरेदीत घोटाळ्याचा आरोप; प्रहार पक्षाच्या जिल्हाध्यक्षांवर एसआयटी चौकशी
बुलढाणा जिल्हा रुग्णालयात नातेवाईकांमध्ये तुफान हाणामारी; सुरक्षेवर उठले प्रश्न
खदान परिसरात युवकावर चार जणांचा प्राणघातक हल्ला;
अकोल्यात आकाशात सूर्याभोवती इंद्रधनुष्य! नागरिकांनी घेतला अनोख्या दृश्याचा आनंद
जन सुरक्षा की भाजप सुरक्षा विधेयक उद्धव ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल
वारी हनुमान येथील डोहात युवकाचा बुडून मृत्यू
डाबकी रोड पोलिसांची गोवंश रक्षण कारवाई
आमदार संजय गायकवाड अडचणीत; कॅन्टीन कर्मचाऱ्याला मारहाणीप्रकरणी गुन्हा दाखल,
पिंपरी-चिंचवडचे नामकरण ‘राजमाता जिजाऊनगर’ करावे – विधानसभेत आमदार उमा खापरे यांची ठाम मागणी
अकोला शहराला महान येथील काटेपूर्णा जलप्रकल्पातून 90 एमएलडी पाण्याचा पुरवठा केला जातो.
पाण्याचे शुद्धीकरण रीतसर केले जाते, असा दावा संबंधित जलशुद्धीकरण विभागाने केला आहे.
मात्र, पाणी शुद्ध असूनही ते नागरिकांपर्यंत दूषित स्वरूपात पोहोचत असल्यामुळे प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम
-
पोटदुखी, त्वचेचे विकार आणि इतर संसर्गजन्य आजारांच्या तक्रारी वाढल्या आहेत.
-
अनेक भागांतून पाण्याचा वास आणि रंग बदलल्याची माहिती मिळत आहे.
-
शाळा, रुग्णालये आणि घरांमध्ये हे पाणी वापरण्याची धास्ती नागरिकांनी घेतली आहे.
प्रशासनाचे स्पष्टीकरण अपुरे?
जलशुद्धीकरण विभागाचे अधिकारी म्हणतात, “पाणीप्रक्रिया पूर्णपणे शुद्ध पद्धतीने केली जाते.
कोणताही दोष आमच्या ट्रीटमेंटमध्ये नाही.” पण प्रश्न असा आहे की,
जर प्रकल्पात पाणी शुद्ध होत असेल, तर ते दूषित स्वरूपात नागरिकांपर्यंत का आणि कसे पोहोचते?
दोष पुरवठा व्यवस्थेत?
-
पाईपलाइनमधील गळती किंवा झाडलेल्या पाईप्समधून गाळ किंवा घाण मिसळत असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
-
या बाबींची तांत्रिक तपासणी करून दोष नेमका कोठे आहे हे प्रशासनाने शोधणे गरजेचे ठरत आहे.
जनतेची मागणी:
दूषित पाणीपुरवठ्याची सखोल चौकशी करून दोषी घटकांवर कारवाई करावी आणि नागरिकांना सुरक्षित पाण्याचा पुरवठा तात्काळ सुरू करावा.