अकोला | प्रतिनिधी
अकोल्यातील पळसो बढे गावाच्या कासमपुर भागात रात्रीच्या सुमारास तीन संशयित
चोरट्यांचा गावात प्रवेश झाल्याचे ग्रामस्थांच्या लक्षात आले.
Related News
शिवसेना (उबाठा) मध्ये नेतृत्वबदलामुळे पक्षातील अंतर्गत कलह आणखी गडद होणार
दोन कोटी विस लाखां च्या नावाखाली रुग्णसेवकाला सायबर गुंड्याकडून गंडवण्याचा प्रयत्न
शाळांचे परिसर एका महिन्यात तंबाखूमुक्त करण्याचे आदेश
अतिक्रमण हटाव मोहीम का फक्त दुर्बळांवरच? अपंगाचे दुकान तोडले –
जुन्या वादातून दोन गटात झालेल्या शस्त्रास्त्र हाणामारी
अकोल्यात विविध मागण्यांसाठी आज धरणे आंदोलन करणाऱ्यात आले
नवी दिल्लीतील भारत मंडपममध्ये पार पडलेल्या राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पीयूष गोयल
अखेर कातखेड,पिंपळखुटा गावात रस्त्याच्या कामाला सुरुवात
शेलुबाजार आरोग्य केंद्रात क्षयरुग्ण तपासणी शिबिर; डिजिटल एक्स-रेद्वारे ८७ संशयितांची तपासणी
पार्डी ताड–पिंपळखुटा रस्ता सहा महिन्यांतच खड्ड्यात! मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेवर प्रश्नचिन्ह
अखेर लेखी आश्वासनाने उपोषणाची मांघार!
दहीहंडा रोडवर मोठमोठे खड्डे; नागरिकांच्या सहकार्यातून काही खड्ड्यांची भर घाल
त्यांच्या सतर्कतेमुळे एक चोरटा पकडण्यात ग्रामस्थांना यश आले, तर इतर दोघे अंधाराचा फायदा घेऊन पसार झाले.
गावातील काही युवकांनी रात्री महिलांच्या शौचालय परिसरात संशयित हालचाली पाहिल्या.
त्यांनी इतर ग्रामस्थांना बोलावले आणि पाठलाग सुरू केला. यावेळी एक चोरटा
शेतातील ज्वारीच्या गव्हणीमध्ये लपलेला आढळून आला.
ग्रामस्थांनी त्याला पकडून झडती घेतली असता, त्याच्याजवळ आधार कार्ड मिळाले.
पकडलेल्या चोरट्याचे नाव रोशन राजू सिडाम (२५), रा. शेलवाडी, पो. अनभोरा असल्याचे समोर आले आहे.
ग्रामस्थांनी काही काळ त्याला मारहाण करण्याचाही प्रयत्न केला, मात्र काही विवेकी
नागरिकांनी हस्तक्षेप करत त्याला वाचवले आणि बोरगाव मंजू पोलिसांना याबाबत कळवले.
गावकऱ्यांचा संयम आणि पोलिसांची भूमिका
गावातील काही दिवसांपासून घरफोड्या आणि शेतसाहित्य चोरीच्या घटना वाढल्या असल्याने नागरिकांमध्ये असंतोष निर्माण झाला होता.
पोलीस गस्त वाढविण्याची मागणीही वारंवार केली जात होती.
मात्र चोरी थांबत नसल्याने नागरिकांनी रात्री स्वतः गस्त देण्यास सुरूवात केली होती.
या घटनेनंतर संपूर्ण गाव घटनास्थळी जमा झाले होते. पकडलेला चोर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला असून,
पुढील तपास बोरगाव मंजू पोलीस स्टेशनमार्फत सुरू आहे.
विशेष:
ही घटना ग्रामसुरक्षेच्या दृष्टीने लोकसहभागाचे महत्त्व अधोरेखित करते. मात्र अशा वेळी कायदा हातात न घेता,
पोलिसांना त्वरित माहिती देणे अधिक योग्य असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
Read Also : https://ajinkyabharat.com/acolateal-contaminated-panyacha-ques/