‘कभी तुम सुन नहीं पाई, कभी मैं कह नहीं पाया…’, दिल्ली निवडणूक निकालादरम्यान कुमार विश्वास यांची पोस्ट व्हायरल
डॉ.कुमार विश्वास हे त्यांच्या हजरजबाबीपणासाठी ओळखले जातात.
सोशल मीडियावरही ते खूप सक्रिय असतो आणि अनेक मुद्द्यांवर आपले मत व्यक्त करतात.
कधीकाळी त्यांनी आम आदमी पार्टीच्या माध्यमातून राजकारणातही प्रवेश केला होता.
Related News
अकोट | प्रतिनिधी
कावसा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अंतर्गत येणाऱ्या धामणा बु. गावात कॉलऱ्याच्या संसर्गाचा पहिला रुग्ण आढळून आला असून,
विष्णू संपत बेंद्रे (वय ५०) या व्यक्तीचा उपच...
Continue reading
अकोला : जून २०२५ मध्ये अहमदाबाद येथील ‘नरेंद्र मोदी स्टेडियम’ येथे झालेल्या ‘पंच’ परीक्षेचा निकाल ‘बीसीसीआय’ने नुकताच जाहीर केला.
त्यामध्ये उत्तीर्ण घोषित झालेल्या २६ उमेदवारांप...
Continue reading
अडगाव बु. | प्रतिनिधी
तेल्हारा तालुक्यातील धोंडा आखर या आदिवासीबहुल गावात प्रधानमंत्री ‘धरती आबा’ जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान प्रभावीपणे राबवण्यात आले.
या अभियानात अनुसूचित जमात...
Continue reading
बोरगाव मंजू | प्रतिनिधी
जागतिक अमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त परशुराम नाईक विद्यालय आणि जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने
आयोजित कार्यक्रमात सादर करण्यात आलेले...
Continue reading
अकोट | प्रतिनिधी
बोर्डी गावातील आठवडी बाजार ते नागास्वामी महाराज मंदिर या मुख्य रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी असलेल्या
नाल्यांची दीर्घकाळपासून साफसफाई न झाल्यामुळे सांडपाणी रस्त्याव...
Continue reading
इंझोरी | प्रतिनिधी
२५ व २६ जून रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे इंझोरी महसूल मंडळातील शेकडो शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट कोसळले आहे.
सोयाबीनच्या आधीच पेरलेल्या बियाण्यांचे उगम न झाल...
Continue reading
पुणे |
पुण्यात झालेल्या एका कार्यक्रमात राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह
यांच्या उपस्थितीत दिलेला एक शेर आणि “जय गुजरात” घोषणेमुळे राजकीय वर्...
Continue reading
अकोट | प्रतिनिधी
अकोट येथील सेंट पॉल्स अकॅडमीचा स्थापना दिन दिनांक २ जुलै रोजी मोठ्या उत्साहात आणि गौरवाच्या वातावरणात साजरा करण्यात आला.
या वेळी गुणवंत विद्यार...
Continue reading
अकोला | प्रतिनिधी
अकोल्यातील श्री. गजानन नागरी सहकारी पतसंस्थेवर ठेवीदारांनी गंभीर गैरव्यवहाराचे आरोप करत मोठा गोंधळ घातला.
जुन्या शहरातील शाखेत आज सकाळपासूनच शेकडो ठेवीदारांनी आ...
Continue reading
पातूर | प्रतिनिधी
पातूर शहरातील भावना पब्लिक स्कूलमध्ये शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी चिमुकल्यांचा जल्लोष आणि उत्साह पाहण्यासारखा होता.
गुलाबाच्या फुलांनी स्वागत, डोक्यावर रा...
Continue reading
वाशीम | प्रतिनिधी
समृद्धी महामार्गावर वाशिमजवळील शेलुबाजार इंटरचेंजजवळ ३ जुलै रोजी सायंकाळी ७.३० वाजता एक भीषण अपघात झाला.
या अपघातात उमरेड (जि. नागपूर) येथील जयस्वाल कुटुंबातील ...
Continue reading
नागपूर
नागपूरमधील लता मंगेशकर रुग्णालयात मध्य भारतातील पहिलीच यशस्वी लिंग प्रत्यारोपण शस्त्रक्रिया पार पडली.
राजस्थानमधील ४० वर्षीय रुग्णाने कॅन्सरमुळे ८ वर्षांपूर्वी लिंग गमावले...
Continue reading
मात्र दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे अरविंद केजरीवाल यांच्याशी मतभेद
झाल्यानंतर कुमार विश्वास यांनी वेगळा मार्ग निवडला.
आप मधून बाहेर पडल्यानंतर ते इशाऱ्यांमध्ये, मिश्किल टिपण्णी करत खोचक टोला लगावतात, कधी कधी चिमटेही काढतात.
आज दिल्ली विधानसभा निवडणुकांचे निकाल असून प्रपोज डे सुद्धा आहे.
याच दरम्यान कुमार विश्वास यांनी काव्यात्मक शैलीत पोस्ट शेअर केली आहे,
ज्यावरून अनेक तर्क वितर्क व्यक्त केले जात आहेत.
कुमार विश्वास यांनी X या सोशल मीडिया साईटवरील अकाऊंटवर एक पोस्ट शेअर केली आहे,
ज्याची सध्या सर्वत्र चर्चा आहे. कभी तुम सुन नहीं पाई, कभी मैं कह नहीं पाया –
या सह त्यांनी ब्रोकन हार्ट इमोजी टाकत एक व्हिडीओही शेअर केलाय. बहुत बिखरा, बहुत टूटा, थपेड़े सह नहीं पाया.
हवाओं के इशारों पर मगर मैं बह नहीं पाया. अधूरा अनसुना ही रह गया यूं प्यार का किस्सा.
कभी तुम सुन नहीं पाई, कभी मैं कह नहीं पाया –
अशा ओळी त्यांनी म्हटल्या आहेत. या पोस्टवरून वेगवेगळे अंदाज व्यक्त होत आहेत.
अनेक युजर्सनी असा अंदाज व्यक्त केला आहे की या पोस्टचा आम आदमी पक्षाशी संबंध आहे.
तुमचा मित्र निवडणूक हरतो, असे एकाने लिहीलं. तर ‘आप-दा संपल्याबद्दल तुमचे खूप खूप अभिनंदन’ अशी टिपण्णी आणखी एकाने केली. .
अभिनंदन डॉक्टर साहेब, आज तुम्हाला चांगली बातमी मिळणार आहे, अशी कमेंट आणखी एका युजरने केली.
मात्र अनेक युजर्सना तर ही प्रपोज डे ची शायरी वाटत असून अनेकांनी त्यांचं कौतुकही केलंय.
दिल्लीत भाजपचं कमळ फुललं
नवी दिल्ली विधानसभेच्या जागेवर ५ फेब्रुवारीला मतदान झाले आणि आज त्याची मतमोजणी होऊन निकाल समोर येण्यास सुरूवात झाली आहे.
भाजपाचा दिल्लीतील सत्ता स्थापनेचा वनवास संपण्याची चिन्हं दिसत आहेत.
दिल्लीत आपचा नाही तर भाजपाचा आपला मुख्यमंत्री येण्याची शक्यता आहे.
दिल्ली विधानसभेतील 70 पैकी 70 जागांचे कल समोर आले आहे.
पोस्टल मतमोजणीत आणि आता ईव्हीएममधील मतमोजणीचा कल सुद्धा भाजपाच्या बाजूने दिसत आहे.
त्यामुळे दिल्लीकरांनी ‘आप’ला तिसऱ्यांदा संधी देण्यास नकार दिल्याचे चित्र सध्या दिसत आहे.
अधिक बातम्या करीता भेट द्या : https://ajinkyabharat.com/chief-minister-koni-basla-mhanje-shahana-tharat-nahi-sanjay-raut-yancha-chief-minister/