मोर्शी-चांदूरबाजार मार्गावरील उदखेड येथील चारगड नदी पुलावर शनिवारी सकाळी झालेल्या भीषण अपघातामुळे काही काळ वाहतूक ठप्प झाली. रस्त्यावरील मोठा खड्डा चुकविण्याच्या प्रयत्नात ट्रक आणि पिकअप वाहनाची समोरासमोर जोरदार धडक झाली. या अपघातात दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले असले तरी सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, एमएच ३१ एफसी ३६४५ क्रमांकाचा ट्रक भिलाई येथून अंजनगावकडे केळी भरण्यासाठी जात होता. तर एमएच १९ सीएक्स ०८०० क्रमांकाचे पिकअप वाहन जळगाव येथून वरूडकडे स्प्रिंकलर साहित्य घेऊन निघाले होते. शनिवारी सकाळी सुमारे सात वाजताच्या सुमारास दोन्ही वाहने उदखेड परिसरातील चारगड नदी पुलावर पोहोचली. यावेळी पुलावरील रस्त्यात पडलेला मोठा खड्डा चुकविण्याच्या प्रयत्नात दोन्ही चालकांचे वाहनांवरील नियंत्रण सुटले आणि समोरासमोर जोरदार धडक झाली.
धडक इतकी तीव्र होती की दोन्ही वाहनांच्या पुढील भागाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अपघातानंतर ट्रक आणि पिकअप रस्त्याच्या मधोमध आडवे झाल्याने मार्गावरील वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली. काही काळ वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक, वाहतूक पोलीस आणि संबंधित यंत्रणेचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तत्काळ बचावकार्य सुरू करून वाहने बाजूला करण्याचे प्रयत्न केले. सुमारे काही वेळानंतर दोन्ही वाहने रस्त्याच्या कडेला हलविण्यात आली आणि वाहतूक पूर्ववत करण्यात आली.
Related News
कल्याणमध्ये मद्यधुंद टँकर चालकाचा धुमाकूळ; 2 रिक्षांसह 7-8 दुचाकींना धडक
मोठी बातमी! मराठा आंदोलन पुन्हा पेटलं; सोलापुरात मंत्र्यांची गाडी अडवली
उपोषणाआधीच मनोज जरांगेंची सरकारला मोठी मागणी; जात पडताळणी समिती बरखास्त करण्याचे आव्हान!
मुंबईकरांच्या खिशाला महागाईचा डबल झटका! दूध आणि ऑटो-टॅक्सी प्रवास महागणार
20 वर्षांचा लढा जिंकला, पण प्रशासनाच्या कथित पिळवणुकीने जीव घेतला; पुसदच्या वनमजुराची यवतमाळमध्ये आत्महत्या
Shirdi Saibaba : शिर्डीत साईबाबांच्या प्रसादाच्या दरात वाढ होणार? साखरेच्या दरवाढीने व्यापाऱ्यांची चिंता वाढली
Khavdya Dongar Case : संभाजीनगरच्या ‘खवड्या डोंगरा’चं रहस्य काय? नावामागची कहाणी ऐकून बसेल धक्का!
आयफोन 15 साठी वाद अन् अख्खं कुटुंब उद्ध्वस्त; कुणालबाबत पोलिसांनी सांगितलं धक्कादायक सत्य
लाडकी बहीण योजनेचा मोठा खुलासा! 92 लाख अपात्र लाभार्थी, 9,605 कोटी रुपये खात्यात; RTI मधून धक्कादायक माहिती
सावधान! ड्रायव्हिंग करताना गाणं बदलणं ठरू शकतं जीवघेणं; रिसर्चमध्ये धक्कादायक खुलासा
Pune News : बावधनमध्ये खड्ड्यांचा कहर! पाण्याने भरलेल्या रस्त्यांतून वाहनचालकांची दमछाक
नाशिकची सिटी लिंक बससेवा विस्कळीत; तब्बल 200 फेऱ्या रद्द, वाहतूक कोंडीचा मोठा फटका
या अपघातानंतर परिसरातील नागरिकांनी रस्त्याच्या दुरवस्थेबाबत तीव्र संताप व्यक्त केला आहे. संबंधित मार्गावर अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे पडले असून वाहनचालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत असल्याची तक्रार नागरिकांनी केली. वारंवार अपघात होऊनही प्रशासनाकडून कायमस्वरूपी उपाययोजना होत नसल्याचा आरोपही करण्यात आला.
“प्रत्येक वेळी अपघात झाल्यानंतरच प्रशासनाला जाग येणार का?” असा सवाल उपस्थित करत नागरिकांनी संबंधित विभागाने तातडीने रस्त्याची दुरुस्ती करावी, खड्डे बुजवावेत आणि सुरक्षित वाहतुकीची व्यवस्था करावी, अशी मागणी केली आहे. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी भविष्यात मोठी दुर्घटना टाळण्यासाठी प्रशासनाने त्वरित पावले उचलण्याची गरज व्यक्त होत आहे.
