अहिल्यानगर येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे राष्ट्रीय
स्मारक उभारण्यासाठी महसूल तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे
पाटील यांनी केलेल्या निर्णयाचे ज्येष्ठ नेते शाळीग्राम होडगर यांनी
Related News
अकोट (ता. २० जुलै २०२५): अकोट ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत एका महिलेसोबत विनयभंग करणाऱ्या आरोपीविरोधात पोलिसांनी अवघ्या २४ तासांत दोषारोपपत्र दाखल करत जलद आणि ठोस कारवाई केली आहे.
...
Continue reading
लोणार - प्रतिनिधी
दिनांक - १८ जुलै २०२५
लोणार तालुक्यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) मध्ये अलीकडेच झालेल्या नेतृत्वबदलामुळे पक्षातील अंतर्गत कलह आणखी गडद होत असल्याचे स्पष्...
Continue reading
प्रतिनिधी |
विवरा
देशात सायबर गुन्हेगारीचे जाळे दिवसेंदिवस अधिकच विस्तारित होत आहे. नागरिकांना सरकारी अधिकाऱ्यांच्या नावे खोट्या हुलकावण्या देत, त्यांच्यावर गंभीर गुन्ह्यांचे...
Continue reading
शाळांचे परिसर एका महिन्यात तंबाखूमुक्त करण्याचे आदेश अकोला जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी दिले आहेय..केवळ कागदावर नको तर प्रत्यक्षात कार्यवाही करा अशा सूचना यावेळी जिल्हाधिकारी अजि...
Continue reading
मूर्तिजापूर,
शहरात सुरू असलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेचा फटका आता अधिक गंभीर पातळीवर पोहोचला आहे. या कारवाईत एका अपंग व्यक्तीचे छोटं दुकान तोडून टाकण्यात आल्याने त्याच्यासमोर उपासम...
Continue reading
जुन्या वादातून दोन गटात झालेल्या शस्त्रास्त्र हाणामारीत आठ जण जखमी झाल्याची धक्कादायक घटना अकोल्यातील कृषी नगर भागात घडली आहे. दोन गटात झालेल्या या वादात गोळीबार झाल्याची माहिती आह...
Continue reading
राज्यातील शासकीय रुग्णालयातील परिचारिकांच्या विविध मागण्यांबाबत कोणताही अंतिम निर्णय न झाल्याने त्यांनी आज गुरूवारी काम बंद आंदोलन केलेये. या आंदोलनात अकोला येथील शासकीय वैद्यकीय म...
Continue reading
‘एक जिल्हा, एक उत्पादन - 2024’ मध्ये महाराष्ट्राला ‘अ’ श्रेणीत सुवर्णपदक मिळालाय..तर अकोल्याच्या कापूस उत्पादनांना राष्ट्रीय ओळख मिळाली आहेय..कापूस प्रक्रिया उद्योगासाठी
अकोल्या...
Continue reading
अकोट : अजिंक्य भारत ने 10 जुलै रोजी पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या अडगाव खुर्द गट ग्रामपंचायत मधील कातखेडा,
पिंपळखुटा गावामध्ये नागरिकांना मूलभूत सुविधांचा अभाव असल्याने सर्व...
Continue reading
शेलुबाजार वार्ता :-
बुधवार दि16/07/25 रोजी ता मंगरूळपिर मधून प्राथमिक आरोग्य केंद्र शेलुबाजार येथे संशयित क्षयरुग्नाचे तपासणी शिबिर
घेण्यात आले यामध्ये डिजिटल मशीनद्वारे संश...
Continue reading
शेलुबाजार वार्ता :-
मंगरूळपीर तालुक्यातील पार्डी ताड ते पिंपळखुटा या मुख्यमंत्री ग्राम सडक यो जनेंतर्गत काही महिन्यांपूर्वीच पूर्ण झालेल्या रस्त्याची अवघ्या
सहा महिने ते एक...
Continue reading
वाडेगाव:- ग्राम पंचायत समोर गेल्या दोन दिवसा पासून आमरण उपोषण करत असलेले
शे दस्तगीर शे महेमुद देगाव येथील यानी लेखी तक्रारारी मधे काशीराम तुळशीराम गव्हाळे यांचे शेत
गट क्र २७...
Continue reading
स्वागत केले असून, या स्मारकामुळे पुण्यश्लोक अहिल्यादेवींचा
इतिहास जगासमोर येईल आणि महिलांच्या सक्षमीकरणाच्या
संदेशाचे कृतीत रुपातंर होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
यासंदर्भात बोलताना होडगर म्हणाले, पुण्यश्लोक अहिल्यादेवींचे
जन्मगाव हे आपल्या जिल्ह्यातील असले तरी, त्यांचे संपूर्ण जीवन
हे देशासाठी समर्पित झाले. हा इतिहास नव्या पिढीसमोर आणणे
खूपच गरजेचे होते. पुण्यश्लोक अहिल्यादेवींनी हिंदू धर्मावर
असलेली श्रध्दा आपल्या उक्ती आणि कृतीतून दाखवून दिली.
त्याचबरोबर इतर सर्व धर्मांच्या सन्मानाप्रित्यर्थ मोठे योगदान देऊन
मानवता धर्माचे आचरण केले. उत्तम आणि आदर्श प्रशासक म्हणून
त्यांची एक ख्याती होती. त्यांचे कार्य समाजातील प्रत्येक घटकाला
न्याय मिळवून देणारेच होते. एवढेच नाही तर रोजगाराच्या निर्माण
कार्यातही त्यांचे मार्गदर्शन महत्त्वपूर्ण ठरले. देशातील मंदिरांचे
विकास असेल किंवा नदीकाठच्या घाटांचा पुनर्विकासाला प्राधान्य
देऊन अहिल्यादेवी होळकरांनी या देशाची संस्कृती, परंपरा आणि
मूल्य जोपासण्याच्या केलेल्या ऐतिहासिक कार्याचा वारसा हा
आपल्या सर्वांनाच अभिमानास्पद असा आहे. नव्या पिढीला या
इतिहासाची जाणीव करून देण्याच्यादृष्टीने जिल्ह्याच्या भूमिमध्ये
त्यांचे स्मारक उभे राहणे हे आपल्या सर्वांनाच प्रेरणादायी
असल्याचे होङगर म्हणाले. जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे
पाटील यांनी यासाठी विशेष पुढाकार घेतल्याबद्दल समाधान व्यक्त
करून होडगर यांनी सांगितले, की या स्मारकाची संकल्पना
यापूर्वीच कार्यान्वित होण्याची गरज होती. परंतु आता मंत्री विखे
पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या स्मारकाचा तयार होत असलेला
आराखडा खूपच अभ्यासपूर्ण असा आहे. या स्मारकामध्ये
पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या जीवनकार्याची संपूर्ण वाटचाल,
महिलांच्या सक्षमीकरणासाठी मार्गदर्शन केंद्र, अध्यासन केंद्र या
बरोबरीनेच एक चांगले असे पर्यटनस्थळ जिल्ह्याच्या भूमीमध्ये उभे
राहत असल्याचा निश्चितच आनंद आहे. अहिल्यादेवींचे जन्मस्थळ हे
जिल्ह्यातीलच असल्यामुळे या उभ्या राहणाऱ्या स्मारकामुळे
जिल्ह्याची नवी ओळखही निर्माण होईल.
Read also: https://ajinkyabharat.com/highest-turnout-in-jammu-and-kashmir-elections-in-udhampur/