बार्शी टाकळी तालुक्यातील राजनखेड येथील आदर्श ग्रामपंचायत अधिकारी मनोज देविदास गवई यांचा पंचायत समिती बार्शी टाकळी येथील वसंतराव नाईक सभागृहात शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. गवई यांनी ग्रामसेवा क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करत बार्शी टाकळी तालुक्याचे व अकोला जिल्ह्याचे मान उंचावले आहे. त्यांनी सन 2017 मध्ये राजनखेड गावात रुजू होऊन स्वच्छ भारत मिशन अंतर्गत गावात हागणदारी मुक्ती साधली, कोविड-19 काळात लसीकरण व जनजागृती करून नागरिकांचे आरोग्य सुधारले आणि संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानात जिल्हा व विभागस्तरीय पुरस्कार मिळवून गावाला मोठे पारितोषिक मिळवून दिले.
अलीकडेच ‘माझी वसुंधरा 5.0’ अंतर्गत अमरावती विभागातून प्रथम क्रमांक मिळवून रु. 50 लाखांचे पारितोषिक राजनखेड ग्रामपंचायतला मिळवून देणे ही त्यांच्या कार्याची नवीन उंची ठरली. या यशामुळे बार्शी टाकळी तालुक्याची प्रतिष्ठा राज्यस्तरावर वाढली असून विविध स्तरांवर त्यांचे कौतुक होत आहे.
सत्कार कार्यक्रमास गटविकास अधिकारी व उपमुख्य कार्यकारी अधिकारी पंचायत जि. प. अकोला रविकांतजी पवार, सहाय्यक गटविकास अधिकारी सुनीता इंगळे, प्रशासन अधिकारी दिलीप शिरसाट, विस्तार अधिकारी (पंचायत) दीपक इंगळे, संघटनेचे जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब बोचरे, तालुकाध्यक्ष नारायणजी दिवनाले, सचिव राजेश बंड, उपाध्यक्ष ज्ञानेश्वर तांबडे आणि तालुक्यातील सर्व ग्रामपंचायत अधिकारी उपस्थित होते.
Related News
आंध्र प्रदेशात धार्मिक, सांस्कृतिक आणि ग्रामीण विकासाला चालना देण्यासाठी एक महत्त्वाकांक्षी योजना समोर आली आहे. राज्याचे मुख्यमंत्री N. Chandr...
Continue reading
राज्य मंत्रिमंडळाचे 7 मोठे निर्णय जाहीर; नोकरभरती सुधारणा ते 6 जिल्ह्यांना ‘आकांक्षित जिल्हा’ दर्जा
राज्य मंत्रिमंडळाची आज मुख्यमंत्री देव...
Continue reading
अकोल्यात पाल्म संडे हर्षोेेल्हासात, भक्तिभावाने साजरा
अकोला: ख्रिश्चन धर्मियांच्या पवित्र परंपरेतला एक महत्त्वाचा दिवस म्हणजे पाल...
Continue reading
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या जीवनावर आधारित मराठी चित्रपट ‘खंजिरीचे बोल’ या चित्रपटाचा मुहूर्त क्लॅप आज मुंबईत उत्साहात संपन्न झाला. हा कार्य...
Continue reading
पातूर तालुक्यातील खेट्री ग्रामपंचायतीत गेल्या तीन वर्षांत तब्बल सात सचिव बदलल्याने प्रशासनाचा कारभार अक्षरशः ठप्प झाल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. वार...
Continue reading
बार्शीटाकळी : ग्रामीण भागात शिक्षण, संस्कार आणि सामाजिक उन्नतीचा वारसा जपण्याच्या ध्येयाने कार्यरत असलेल्या उत्कर्ष फाउंडेशन, काजळेश्वर...
Continue reading
मनोज जरांगे पाटील पंढरपूरमध्ये सक्रिय; मारहाण आणि सुपारीसह गंभीर आरोप
मराठा आरक्षणासाठी संघर्ष करणारे समाजसेवक मनोज जरांगे पाटील पु...
Continue reading
महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमाच्या कलम १५१ अंतर्गत जिल्हा परिषद अकोलाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अनिता मेश्राम यांनी बाळापूर तालुक्यातील मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींवर प्रशासकांच...
Continue reading
उद्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक; राज्य निवडणूक आयोग सज्ज
उद्या मतदान : राज्यातील 12 जिल्हा परिषदा आणि त्यांतर्गत 125 पंचायत समित्...
Continue reading
केंद्रीय अर्थसंकल्प २०२६: नारळाला का मिळतोय विशेष मान? शेती, आरोग्य आणि अर्थव्यवस्थेसाठी नारळाचे वाढते महत्त्व
केंद्रीय अर्थसंकल्प २०२६
Continue reading
कार्यक्रमाचे अध्यक्ष रविकांतजी पवार यांनी मनोगत व्यक्त करून सर्वांनीमनोज गवई यांचा आदर्श घेत काम करण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तालुका अध्यक्ष नारायणजी देवाने केले तर आभार प्रदर्शन उपाध्यक्ष ज्ञानेश्वरजी तांबडे यांनी केले.
read also : https://ajinkyabharat.com/important-information-for-punyatil-domestic-gas-customers-customers-who-do-not-do-kyc-will-not-get-the-cylinder/