भारतीय रेल्वे ट्रेनमध्ये बोर्डिंगबाबत मोठा बदल करण्याच्या तयारीत आहे, ज्याचा थेट परिणाम प्रवाशांच्या सीट आणि बर्थवर होणार आहे. नवीन नियमांनुसार, तुम्ही तुमच्या निर्धारित बोर्डिंग स्टेशनवरून ट्रेन पकडली नाही तर टीटीई (TTE) पुढील स्टेशनपर्यंत तुमची वाट पाहणार नाही. ट्रेन तुमच्या बोर्डिंग स्टेशनवरून सुटताच आणि तुम्ही तुमच्या सीटवर आढळला नाहीत, तर टीटीई लगेच आपल्या हँडहेल्ड डिव्हाइस (EFT) वर “Not Turned Up” अशी नोंद करेल. यामुळे ती सीट रिकामी मानली जाईल आणि ती तात्काळ दुसऱ्या प्रवाशाला दिली जाऊ शकते.
वेटिंग आणि RAC प्रवाशांना होणार फायदा
नवीन तंत्रज्ञान आणि सॉफ्टवेअर अपडेटमुळे वेटिंग लिस्ट किंवा RAC तिकीटावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा फायदा होणार आहे. टीटीई सीट रिकामी असल्याची माहिती सिस्टिममध्ये अपडेट करताच पुढील वेटिंग लिस्टवरील प्रवाशाला आपोआप बर्थ दिली जाईल. तसेच, त्या प्रवाशाच्या मोबाईलवर कोच आणि सीटची माहिती देणारा मेसेजही पाठवला जाईल. रिकाम्या सीटचे अधिक चांगले व्यवस्थापन करण्यासाठी रेल्वे मंत्रालयाने सेंटर फॉर रेल्वे इन्फॉर्मेशन सिस्टिम्स (CRIS) ला यासंबंधी सूचना दिल्याचे सांगितले जाते.
Related News
Railway Online Luggage Booking: रेल्वेच्या नव्या सुविधेने असे ऑनलाईन बुक करा लगेज, असे असेल भाडे, स्टेप बाय स्टेप प्रोसेस जाणून घ्या
Continue reading
Rule Change : फक्त तीन दिवस बाकी! 1 ऑगस्टपासून होणार मोठे बदल; हे 5 नियम बदलणार, तुमच्या खिशावर वाढणार ताण?
फ...
Continue reading
रेल्वे प्रवाशांसाठी मोठी खुशखबर! IRCTC वेबसाइटमध्ये होणार मोठा बदल; तत्काल तिकीट बुकिंग होणार सुपरफास्ट
भारतीय रेल्वेने प्रवास करणाऱ्या कोट्यवधी प्रवाश...
Continue reading
Railway News: चालत्या ट्रेनमधील 'हनिमून' वादानंतर आता सलून कोचमध्ये पूजा; व्हायरल व्हिडीओवर रेल्वेचं स्पष्टीकरण, नेमकं प्रकरण काय?
चालत्या ट्रेनमधील फर्स्ट एसी कोच फुलांनी सजवून
Continue reading
वंदे भारत एक्स्प्रेसमध्ये प्रवाशाला दिलेल्या कॉर्न फ्लेक्समध्ये दूध टाकताच ते फाटल्याचा दावा करणारा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. माजी मंत्...
Continue reading
भारतीय रेल्वेची देशातील पहिली हायड्रोजन ट्रेन 17 जुलैपासून हरियाणातील जिंद-सोनीपत मार्गावर धावणार आहे. 12 स्थानके, 90 किमीचा प्रवास, तिकीट दर, वेग, वैशि...
Continue reading
पुणे जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे लोहगड, विसापूर, तुंग, तिकोना, भाजे धबधबा, टायगर पॉइंटसह 10 प्रमुख पर्यटनस्थळांवर 31 ऑगस्ट 2026 पर्यंत बंदी. मुंबई-पुणे...
Continue reading
लोको पायलटने समोसे घेण्यासाठी ट्रेन थांबवल्याचा दावा; चौकशीचे आदेश
समोसे साठी रेल्वे थांबवली : भारतातील रेल्वे ही देशाची जीवनवाहिनी मानली जाते. दररोज लाखो प्रवासी रेल्वेने प्रवास ...
Continue reading
3 दिवसांच्या प्रतीक्षेनंतर मोठा दिलासा! मुंबई-पुणे रेल्वे सेवा पुन्हा सुरू; 4 गाड्या धावल्या, प्रवाशांचा सुटकेचा नि:श्वास
गेल्या तीन दिवसांपासून ठप...
Continue reading
रेल्वे प्रवाशांसाठी 7 जबरदस्त ट्रिक्स! ट्रेन सुटल्यानंतरही रिकामी बर्थ शोधा; IRCTC चे पॉवरफुल फीचर ठरेल गेमचेंजर
भारतीय रेल्वेने प्रवाशांच्या सोयीसाठी अ...
Continue reading
Pandharpur Ashadhi Wari Special Trains 2026: आषाढी एकादशी म्हणजे महाराष्ट्राच्या भक्ती परंपरेतील सर्वात मोठा आणि भावनिक सोहळा. लाखो वारकरी दरवर्षी "ज्ञान...
Continue reading
Railway Fine Increase 2026: रेल्वेत विनातिकीट प्रवास करणाऱ्यांना मोठा धक्का; आता किमान ₹500 दंड, 20 जूनपासून नवे नियम लागू
भारतीय रेल्वेने विनातिकीट प...
Continue reading
बोर्डिंग स्टेशन बदलताना विशेष काळजी घ्या
आकडेवारीनुसार, जवळपास प्रत्येक ट्रेनमध्ये तीन ते पाच टक्के सीट प्रवासी प्रवास रद्द करतात किंवा वेळेवर स्टेशनवर पोहोचत नाहीत म्हणून रिकाम्या राहतात. रेल्वे तज्ज्ञांच्या मते, प्रवाशांनी आता अधिक सतर्क राहण्याची गरज आहे. जर तुम्हाला ठरलेल्या स्टेशनऐवजी पुढील स्टेशनवरून ट्रेन पकडायची असेल, तर चार्ट तयार होण्याच्या किमान 24 तास आधी बोर्डिंग स्टेशन बदलणे आवश्यक आहे. अन्यथा, तुमची सीट दुसऱ्याला दिली जाऊ शकते आणि तुम्ही टीटीईकडे ती परत मिळवण्याचा दावा करू शकणार नाही.
रेल्वेच्या डिजिटायझेशनकडे मोठे पाऊल
आधुनिकीकरणाच्या दिशेने हा रेल्वेचा एक महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे. तज्ज्ञांच्या मते, या तंत्रज्ञानामुळे भ्रष्टाचार कमी होईल आणि सीट वाटप प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक बनेल. आतापर्यंत टीटीई पुढील स्टेशनपर्यंत वाट पाहत असत, त्यामुळे वेटिंग लिस्टवरील प्रवाशांना सीटसाठी जास्त वेळ थांबावे लागे. मात्र, नवीन नियम लागू झाल्यानंतर सर्व माहिती रिअल टाइममध्ये अपडेट होईल आणि प्रवाशांना अधिक चांगली सेवा मिळेल.
read also : https://ajinkyabharat.com/manipur-president-rule-ends-historic-decision-yumnam-khemchand-chief-minister-shantekde-powerful-migration-5-major-changes/