ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्येही प्रचंड गुणवत्ता असून टॅलेंटच्या बाबतीत ते शहरातील विद्यार्थ्यांपेक्षा अजिबात कमी नाहीत, असे प्रतिपादन ठाणेदार अजित जाधव यांनी केले. दारूल उलूम संस्था व इमाम वलीउल्लाह पब्लिक स्कूल अँड ज्युनियर कॉलेजतर्फे बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या बोर्ड प्रमाणपत्र वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
आपल्या भाषणात जाधव यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करताना सांगितले की, योग्य मार्गदर्शन, कठोर परिश्रम आणि आत्मविश्वास यांच्या बळावर ग्रामीण भागातील विद्यार्थी कोणतेही शिखर गाठू शकतात. आजच्या स्पर्धात्मक युगात संधी सर्वांसाठी समान असून, विद्यार्थ्यांनी आपली क्षमता ओळखून ध्येय निश्चित करणे आवश्यक आहे, असे त्यांनी नमूद केले.
शिक्षण हे समाजबदलाचे प्रभावी साधन असल्याचे सांगत त्यांनी विद्यार्थ्यांना शिस्त, नैतिकता आणि कर्तव्यभावना जोपासण्याचे आवाहन केले. तसेच शिक्षणासोबतच सामाजिक जाणीव ठेवून जबाबदार नागरिक बनण्याचा संदेशही त्यांनी दिला.
Related News
स्व. गुलाबरावजी बांबल विद्यालयात प्रजासत्ताक दिनानिमित्त संविधानाचे महत्त्व कार्यक्रम
मूर्तिजापूरात वाद मिटवायला गेलेल्या बँक मॅनेजरवर प्राणघातक हल्ला; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
जुने पैसे मागण्याच्या वादातून प्राणघातक हल्ला; मूर्तिजापूर पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा नोंदवला
2026:संत Gadge बाबांच्या दशसूत्री विचारांचा जागर
मूर्तिजापूर आगारात इंधन बचत मासिक मोहिमेचा उत्साहात शुभारंभ
वाल्मिक नगरात अनोळखी इसमाचा मृतदेह आढळल्याने खळबळ; ओळख पटविण्याचे पोलिसांचे आवाहन
शेतकऱ्याचा मुलगा १२०० विद्यार्थ्यांमध्ये प्रथम! ई-बाइक जिंकून NEET शिक्षण मोफत मिळाले
रेल्वेतून पडून अज्ञात इसमाचा दुर्दैवी मृत्यू
कार्यक्रमाच्या सुरुवातीला संस्थेचे अध्यक्ष मौलाना मुफ्ती रोशन शाह कासमी यांच्या हस्ते ठाणेदार अजित जाधव यांचे शाल व पुष्पमालाने स्वागत करण्यात आले. त्यानंतर जाधव यांनी संस्थेची पाहणी करून शैक्षणिक उपक्रमांचे कौतुक केले.
या कार्यक्रमास संस्थेचे पदाधिकारी, शिक्षकवृंद, पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी सामाजिक कार्यकर्ते शे. इमरान शेख खालील व मौलवी अशरफ यांचीही प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे वातावरण उत्साहपूर्ण असून विद्यार्थ्यांच्या यशाचा आनंद सर्वांनी साजरा केला.
