गेल्या काही दिवसांपासून मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा प्रश्न चर्चेत आहे.
मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्याची मागणी
मनोज जरांगे पाटील यांनी केलेली आहे. यासाठी त्यांनी अनेकदा उपोषणही केलं.
Related News
भारताला जपानकडून बुलेट ट्रेनची भेट! मुंबई-अहमदाबाद उच्चगती रेल्वे
अकोल्यात केंद्र सरकारविरोधात काँग्रेसचे तीव्र आंदोलन!
मेरठमध्ये धक्कादायक प्रकार : तरुणाची २५ वर्षांनी मोठ्या विधवा महिलेशी फसवून लग्न
राजस्थानमध्ये भीषण अपघात; वरात घेऊन जाणारी बस आणि ट्रकची समोरासमोर धडक….
अकोल्यात पाणी प्रश्न पेटला; शिवसेनेचा जलप्रदाय विभागात घागर मोर्चा, तोडफोड
कोल्हापुरात फुटबॉल सामन्यादरम्यान आयोजकांना पाच हजारांचा दंड
राजकोटमध्ये अपघात; ४ जणांचा मृत्यू, संतप्त नागरिकांचा रस्तारोको
जिल्हा परिषद अकोला : अधिकारी–कर्मचारी, जनतेत तीव्र नाराजी
सुदैवाने जीवितहानी टळली….
मुर्तीजापुरात चोरट्यांचा धुमाकूळ; नागरिकांनी घेतली गस्त मोहीम हाती
पारंपरिक शेती करताना शेतकऱ्यांना अनेक अडचणी
सानंदांच्या निष्ठावान कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी ( अजित पवार ) मध्ये प्रवेश
मात्र, या मागणीबाबत राज्य सरकारने अद्याप कोणताही ठोस निर्णय घेतलेला नाही.
मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर भूमिका स्पष्ट करण्याच्या मागणीसाठी
काही मराठा आंदोलकांनी मंगळवारी उद्धव ठाकरे यांच्या ‘मातोश्री’
या निवासस्थानासमोर आंदोलन केलं.
यावर प्रतिक्रिया देताना मनोज जरांगे यांनी सत्ताधारी आणि विरोधी पक्षांवर हल्लाबोल केला.
तसेच यावेळी त्यांनी सूचक विधानही केलं.
दोन तीन दिवस थांबा, मोठा पर्दाफाश करणार, असं मनोज जरांगे यांनी
माध्यमांशी बोलताना म्हटलं आहे.
मराठा आरक्षणाबाबत भूमिका स्पष्ट करण्याची मागणी आम्ही केलेली आहेच.
फक्त सत्ताधारी पक्षाला नाही तर विरोधकांना देखील आम्ही सांगतो.
मराठा आरक्षणाबाबत भूमिका स्पष्ट करा.
सत्ताधारी आणि विरोधकांनी ७० वर्ष आमचे मते घेतलेले आहेत.
त्यामुळे भूमिका स्पष्ट केली पाहिजे. जर हे भूमिका स्पष्ट करत नसतील
तर यावेळी मराठा समाज त्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही,
असा इशारा मनोज जरांगे यांनी दिला. उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री या निवासस्थानाबाहेर
मराठा आरक्षणावर भूमिका स्पष्ट करण्याच्या मागणीसाठी मंगळवारी काही आंदोलकांनी आंदोलन केलं.
यावर बोलताना मनोज जरांगे म्हणाले, आता आम्ही टेन्शन घेत नाहीत.
कारण लवकरच पर्दाफाश होणार आहे. कारण १२ ते १३ संघटना देवेंद्र फडणवीस यांच्या
सांगण्यावरून दरेकरांनी जमा केल्या आहेत. मराठा समाजाच्या बाजूने न बोलता फक्त काहीही बोलायचं असं त्यांनी सांगितलं.
Read also: https://ajinkyabharat.com/raju-shetty-will-field-288-candidates-for-assembly/