राहुल गांधींचा हल्लाबोल..
लोकसभा निवडणुकीनंतर आजपासून 18व्या लोकसभेच्या पहिल्या अधिवेशनाला सुरुवात झाली.
Related News
मुजफ्फरनगर (उत्तर प्रदेश),
उत्तर प्रदेशातील मुजफ्फरनगर येथे ११ जुलैपासून सुरू होणाऱ्या कांवड यात्रेमुळे दिल्ली-देहरादून
राष्ट्रीय महामार्ग व गंगा कालवा मार्गावर वाहतुक...
Continue reading
अकोला,
अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांसमोरील आर्थिक व व्यवस्थापकीय अडचणींमुळे आत्महत्येचे संकट दिवसेंदिवस वाढत चालले आहे.
यंदा केवळ जानेवारी ते जून २०२५ या कालावधीत ८० शेतकऱ्यांनी आत...
Continue reading
ठाणे |
मराठी हक्कासाठी निघालेल्या मोर्चात पोलिसांनी अडथळा आणल्याने मनसे नेते अविनाश जाधव यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
“आम्ही आतंकवादी आहोत की दहशतवादी?” असा थेट सवा...
Continue reading
चंदन जंजाळ
बाळापूर:- तालुक्यातिल निबां फाटा वर अवैद्य धंदे मोठ्या प्रमाणात जोर दरत आहे.
कुठे गावात तर कुठे शाळेच्या प्रणागणा तर काही ठिकाणी गावामध्ये गावठी दारु चे खुलेआम वि...
Continue reading
नवी दिल्ली | प्रतिनिधी
अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा BRICS देशांवर १० टक्के अतिरिक्त टॅरिफ लावण्याची धमकी दिली आहे.
"जो कोणी ब्रिक्सच्या अमेरिका-विरोधी ...
Continue reading
प्रतिनिधी आलेगांव
आषाढी एकादशी म्हणजे भक्ती, श्रद्धा आणि विठ्ठलनामाच्या गजराने भारलेला दिवस! याच दिवशी शेकापूर फाट्यावरील
कै. हरसिंग नाईक प्राथमिक आश्रम शाळा, श्री. सुधाकरराव...
Continue reading
आलेगाव दिनांक ५ प्रतिनिधी आलेगाव ते बाभुळगाव रस्त्यावरील कार्ला लगत रस्त्यावर मोठ,
मोठे खड्डे पडले असून जड वाहनांच्या दळण वळणाने सडकेच्या दोन्ही कडच्या कडा खचून १२ ते १८ इंचाचे
...
Continue reading
अकोला | प्रतिनिधी
आज दिनांक ७ जुलै २०२५ रोजी अकोला रेल्वे स्टेशन परिसरात हवामानामुळे अचानक निंबाच्या झाडाची मोठी फांदी
तुटल्याने झाडावर वास्तव्यास असलेले सुमारे ६० बगळे – पिल्ले ...
Continue reading
कुरणखेड - राष्ट्रीय महामार्गावर रोज अपघाताची मालिका सुरूच आहे बोरगाव मंजू पोलीस स्टेशनच्या हद्दीत येत .
असलेल्या राष्ट्रीय महामार्गावर डाळंबी जवळ आज दुपारी अपघात झाला यामध्ये का...
Continue reading
मुर्तिजापूर | शहरातील मध्यवर्ती बसस्थानकावर सोमवारी सकाळच्या सुमारास एक धक्कादायक घटना घडली.
मागून खाणाऱ्या व बेवारस अवस्थेत वावरत असलेल्या एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह थेट बसस्थ...
Continue reading
प्रतिनिधी | आकोलखेड
आषाढी एकादशीच्या शुभमुहूर्तावर अकोलखेड येथील श्री विठ्ठल मंदिरात गुणवंत विद्यार्थी गुणगौरव सोहळा उत्साहात पार पडला.
गुण गौरव सोहळा आयोजन समितीतर्फे आयोजित या ...
Continue reading
अकोला | प्रतिनिधी
अकोल्याच्या ऐतिहासिक आणि १३५ वर्षे जुन्या कच्छी मशीदने तंत्रज्ञानाशी जुळवून घेत एक अभिनव उपक्रम सुरू केला आहे.
'कच्छी मशीद अजान ॲप'च्या माध्यमातून अजान आता थेट...
Continue reading
विरोधकांची पॉवर वाढल्यामुळे हे अधिवेशन पहिल्या दिवसापासूनच वादळी ठरत आहे.
विरोधक विविध मुद्द्यांवरुन सरकारला कोंडीत पकडण्याच्या तयारीत आहेत.
अशातच, काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.
राहुल म्हणतात, “मानसशास्त्रीयदृष्ट्या नरेंद्र मोदी बॅकफूटवर असून,
आपले सरकार वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत.
नरेंद्र मोदी आणि त्यांच्या सरकारने संविधानावर केलेला हल्ला आम्हाला मान्य नाही
आणि आम्ही हे कोणत्याही परिस्थितीत होऊ देणार नाही.
प्रबळ विरोधक म्हणून आम्ही दबाव कायम ठेऊ आणि पंतप्रधानांना जबाबदारीपासून पळू देणार नाही.”
राहुल गांधी यांनी आपल्या पोस्टमध्ये गेल्या 15 दिवसातील
महत्वाच्या घटनांचा उल्लेख केला.
“एनडीएचे पहिले 15 दिवस ! 1- भीषण रेल्वे अपघात. 2- काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ले
3- ट्रेनमधील प्रवाशांची दुर्दशा. 4- NEET घोटाळा. 5- NEET PG रद्द
6- UGC NET चा पेपर लीक. 7- दूध, डाळी, गॅस, टोल महाग.
8- जळणारी जंगले. 9- जलसंकट. 10- उष्णतेच्या लाटेत व्यवस्था नसल्यामुळे मृत्यू,”
अशी टीका राहुल यांनी केली.
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनीदेखील सोशल मीडिया पोस्टद्वारे
पीएम मोदींवर जोरदार टीका केली.
“मोदीजी महत्त्वाच्या मुद्द्यांवर काहीतरी बोलतील,
अशी देशाला आशा होती. NEET आणि इतर भरती परीक्षांमधील पेपरफुटीवर बोलतील,
अशी आशा होती.
पण, त्यांच्या सरकारच्या हेराफेरी आणि भ्रष्टाचाराबाबत त्यांनी कोणतीही जबाबदारी घेतली नाही.
पश्चिम बंगालमधील रेल्वे अपघाताबाबतही मोदींनी मौन बाळगले.
मणिपूर गेल्या 13 महिन्यांपासून हिंसाचाराच्या विळख्यात आहे,
पण मोदीजी तिथे गेले नाहीत किंवा त्यांच्या आजच्या भाषणात
हिंसाचाराबद्दल चिंता व्यक्त केली नाही.
आसाम आणि ईशान्येत पूर येऊ शकतो, महागाई वाढू शकते,
रुपयाची घसरण होऊ शकते, एक्झिट पोल-स्टॉक मार्केट घोटाळा आणि जात जनगणना,
अशा कोणत्याही मुद्द्यावर मोदीजी पूर्णपणे मौन बाळगून होते,” अशी टीका त्यांनी केली.
Read also: https://ajinkyabharat.com/eknath-shindeni-kolhapur-tour-canceled-banana/