किन्हीराजा दि ५ जून २५
वाशीम जिल्हातील मालेगांव तालुक्यात येत असलेल्या गणेशपूर(गिव्हा) येथिल शेतकरी महिलेच्या जेसीबी चालक
पुञाने कर्जबाजारीपणाला कंटाळून मोहाच्या झाडाला गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना
Related News
“पूर्णपणे बिनबुडाचे आरोप” — राहुल गांधींच्या ‘मॅच फिक्सिंग’ दाव्यावर…
उभ्या असलेल्या ट्रक ट्रॉली आग लागल्या प्रकरणी पातुर पोलिसात तक्रार
अवैध डिझेल वाहतूक करणाऱ्या व्हॅन व दुचाकीचा अपघात
अकोट नगर परिषद कृती आराखड्यात जिल्ह्यातून प्रथम
ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा जोमात!
दिल्लीत परतली उकाड्याची लाट; पारा ४० पार, उष्णतेच्या लाटेचा इशारा
पावसाने उघडीप दिल्याने शेतकऱ्यांना दिलासा
दुचाकी अपघातात पत्नीचा दुर्दैवी मृत्यू; दानापूर परिसरात शोककळा
अकोट-अंजनगाव रस्त्यावर भीषण अपघात; ट्रकने ट्रॅक्टर व विटांचा ढिगार उडवला, सुदैवाने जीवितहानी नाही
आदिवासी हक्कांसाठी अनुसूचित जमाती आयोग महत्त्वाचे पाऊल
अकोल्यात रस्ते सुरक्षेसाठी आरटीओचा नवा फंडा; रोड सेफ्टी व्हॅनच्या माध्यमातून जनजागृती आणि त्वरित कारवाई
अपघाताच्या ठिकाणी वेळेवर धावले आरटीओचे फिरते पथक; तीन जणांना वाचवले, बालक सुखरूप
बुधवार ४ जून रोजी दूपारी बोराळा शेतशिवारात घडली असून प्रदीप सुखदेव ठाकरे (३२)असे मृतकाचे नांव आहे.
मिळालेल्या प्राप्त माहिती नूसार प्रदीप ठाकरे हा मालेगांव तालुक्यातील गणेशपूर (गिव्हा) येथिल रहिवासी असुन
त्याचेकडे त्याची आई सौ.सुमनबाई ठाकरे यांच्या नांवाने थोडीफार शेती आहे.प्रदीप हा विवाहित असून त्याला
दोन व तीन वर्षाच्या लहान लहान दोन मुली आहेत. प्रदीप हा जेसीबी आॅपरेटर (चालक) होता.
त्याने एका खाजगी फायनान्स कंपनीकडून कर्ज घेऊन ट्रॅक्टर सुध्दा घेतला असल्याची माहीती मिळाली आहे.
प्रदीप ठाकरे हा ४ जून रोजी एरंडा येथिल आपल्या मालकाची पोकलॅंड मशिन घेऊन बोराळा येथिल शेतकरी
दिनकर नामदेव वानखेडे यांच्या गट क्रंमाक १४६ मधिल शेतातील विहीरी मधिल गाळ काढण्या करीता गेला होता.
विहीरी मधून गाळकाढण्याचे काम सूरु असतांना प्रदीप ठाकरे याने त्याच शेतातील ३० फूट ऊंच असलेल्या मोहाच्या
झाडाला जमिनीपासून १५ फूट अंतरावर दोरीच्या सहाय्याने दुपारी ४ च्या सुमारास गळफास लावून आत्महत्या केली.
प्रदीप ठाकरे हा गेल्या काही दिवसापासून आर्थिक विवंचनेत होता.त्याला खाजगी कंपनीकडून घेतलेल्या कर्जाची
चिंता सतावत होती अशी माहीती त्याच्या एका मिञाने दिली.या घटनेची माहिती जऊळका ठाणेदारांना मिळताच ठाणेदार
हिवरकर यांनी पोलीस कर्मचार्यासह घटनास्थळ गाठून घटनेचा पंचनामा करुन मृतदेह ऊत्तरीय तपासणीसाठी हलविला.
जउळका पोलीसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करुन प्रकरण तपासात घेतले आहे.
शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्या नंतरच मृत्यू कशामुळे झाला हे स्पष्ट होणार आहे.
Read Also : https://ajinkyabharat.com/pavasane-vishranti-ghetali-real-way-to-punha-aapla-vine-done/