“हे औरंगजेबापेक्षाही भयंकर कृत्य आहे, ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्यात मराठी भाषेला स्थान दिलं,
शब्दकोष तयार केला तिथे भय्याजी जोशींच हे वक्तव्य म्हणजे औरंगजेबापेक्षाही भयंकर कृत्य आहे.
अजित पवार, एकनाथ शिंदे यांनी भय्याजी जोशी आणि आरएसएसच्या भूमिकेचा धिक्कार केला पाहिजे”
Related News
अजिंक्य भारत प्रतिनिधी | जानोरीमेळ
निंबा अंदुरा सर्कलमधील गजबजलेल्या मोखा गावात जानोरीमेळ गट ग्रामपंचायतीच्या बेजबाबदार कारभाराचा प्रत्यय
सध्या ग्रामस्थांना येत आहे. ऑक्टोबर २०२४...
Continue reading
वणीसह परिसरात दि. 18 ला 5 वाजताच्या दरम्यान पावसाने वादळी वाऱ्यासह जोरदार हजेरी
लावली त्यात शहर तसेच परिसरात मोठे नुकसान झाले असून अनेकांचे घराचे टिनपत्रे, वॉटर टँक, झाडे,
कं...
Continue reading
अकोल्यातील तेल्हारा तालुक्यातल्या दहीगाव येथील घटनेत हिंदू समाज बांधवांवर
खोटे व चुकीच्या पद्धतीने गुन्हे दाखल केल्याच्या निषेधार्थ आज तेल्हारा बंद पाळण्याचे आवाहन करण्यात आले ह...
Continue reading
अलीगढ (उत्तर प्रदेश) :
अलीगढ शहरातील अतरौली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका 'ख्वाजा' नावाच्या हॉटेलमध्ये एका मोठ्या वादाला तोंड फुटले आहे.
येथे जेवणासाठी आलेल्या ग्राहकांना देवी-दे...
Continue reading
नवी दिल्ली : तब्बल पाच वर्षांच्या खंडानंतर कैलास-मानसरोवर यात्रा पुन्हा एकदा 2025
मध्ये सुरू होणार आहे. भारत आणि चीनमधील द्विपक्षीय तणाव कमी झाल्यानंतर ही ऐतिहासिक यात्रा
पुन्हा ...
Continue reading
आई-पुत्राने मिळून फरशीच्या तुकड्याने केलं हत्येचं भयावह कृत्य
पुणे – चंदननगर परिसरात गुरुवारी रात्री एका तरुणाचा फरशीच्या तुकड्याने वार
करून खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे....
Continue reading
हायवे लगत झाडांना आग लावून पाडण्याचे कटकारस्थान; वनविभागाच्या निष्क्रियतेमुळे वाढत आहे धाडस
पातूर (ता.१८ एप्रिल): शहर व परिसरातील झाडे तोडण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढत असून
आता ‘...
Continue reading
अकोला –
ख्रिश्चन धर्मातील अत्यंत पवित्र आणि दु:खद दिवस मानला जाणारा गुड फ्रायडे अकोला
शहरात भक्तीभावाने साजरा करण्यात आला.
येशू ख्रिस्तांना क्रूसावर चढवण्यापूर्वी ज्या यातना देण...
Continue reading
जालना: एका महिन्याच्या चिमुरड्या मुलीला विहिरीत फेकणाऱ्या आई-वडिलांना अटक
जालना जिल्ह्यातील चंदनझिरा येथे माणुसकीला काळिमा फासणारी धक्कादायक घटना समोर आली आहे.
अवघ्या एका महिन्या...
Continue reading
उत्तराखंडातील ऋषिकेशमध्ये राफ्टिंगदरम्यान एक हृदयद्रावक घटना घडली असून,
एका युवकाचा गंगा नदीत बुडून मृत्यू झाला आहे.
सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत अ...
Continue reading
आज जय श्री राम ग्रुप ने परस गौ रक्षण केंद्र में गौसेवा का एक सराहनीय कार्य किया।
ग्रुप के सदस्यों ने मिलकर गौमाताओं को गर्मी से राहत देने हेतु 500 किलो तरबूज खिलाए।
गर्मी के ...
Continue reading
अकोला:
शहरासह अकोला जिल्ह्याच्या विविध भागांमध्ये शुक्रवारी ख्रिश्चन धर्मियांचा पवित्र सण
गुडफ्रायडे मोठ्या भक्तीभावाने साजरा करण्यात आला.
शहरातील आठ प्रार्थनास्थळांमध्ये ...
Continue reading
असं संजय राऊत म्हणाले.“महाराष्ट्रात कालपासून दोन विषय चर्चेत आहेत. अस्वस्थ करणारे आहेत.
पहिला विषय भाजपचे आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नेते भय्याजी जोशी हे काल मुंबईत आले.
त्यांनी जाहीर केलं की, मुंबईची भाषा मराठी नाही. हा अत्यंत गंभीर विषय आहे.
मराठी मीडियाने कसं दुर्लक्ष केलं याकडे? तुमच्यावर कोणाचा दबाव आहे का?
भाजपचे प्रमुख नेते मुंबईत येऊन सांगतात, मुंबईची भाषा मराठी नाही,
राज्याच्या मुख्यमंत्र्याने हे सहन करावं” अशी टीका संजय राऊत यांनी केली.
“भय्याजी जोशी अस म्हणतात की, मुंबईत येऊन कोणी कोणतीही भाषा बोलू शकतो.
कारण मुंबईला कोणतीच भाषा नाही. त्यांचं म्हणण आहे की, घाटकोपरची भाषा गुजराती आहे.
ते तामिळनाडूत जाऊन चेन्नईत असं बोलू शकतात का?. बंगळुरु, लुधियानाला, पाटण्याला, लखनऊला जाऊन हे बोलू शकतात का?
महाराष्ट्राच्या राजधानीत येऊन सांगतात मुंबईची भाषा मराठी नाही, ती गुजराती आहे अन्य आहे. मराठी येण्याची गरज नाही,
मराठी आमची राजभाषा आहे. राजभाषा असेल तर अशा प्रकारच वक्तव्य म्हणजे राजद्रोह आहे” असं संजय राऊत म्हणाले.
हे ऐकण्यासाठी 106 हुतात्म्यांनी बलिदान दिलं का?
“106 हुतात्म्यांनी महाराष्ट्रासाठी, मुंबईसाठी मराठी भाषेसाठी बलिदान दिलं,
ते हे ऐकण्यासाठी का?” असा सवाल संजय राऊत यांनी विचारला.
“सध्याच्या सरकारला थोडा जरी स्वाभिमान, मराठी भाषेचा अभिमान आहे का?
राज्य गौरव गीत गाता, त्याचा शो करता. तुम्ही मराठी भाषा गौरव दिवस साजरा करता,
तिथे भाषण करता आणि या मुंबईत येऊन तुमच्या
पक्षाचे प्रमुख नेते, विचारधारा वाहक
मुंबईची भाषा मराठी नाही सांगतात हा अपमान नाही का?” असा सवाल संजय राऊत यांनी विचारला.
‘हे औरंगजेबापेक्षाही भयंकर कृत्य’
“भय्याजी जोशी यांच्या वक्तव्याचा निषेध केला पाहिजे. ठराव मजूर केला पाहिजे.
माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचे वारसदार म्हणवणारे मिधें सत्तेत बसले आहेत, कुठे आहेत ते?
. माननीय बाळासाहेबांनी मराठी माणसासाठी, भाषेसाठी आपलं आयुष्य पणाला लावलं.
जे आज विचारवाहक बसले आहेत, त्यांनी हिम्मत असेल तर भय्याची जोशी यांच्या वक्तव्याचा निषेध करावा” असं संजय राऊत म्हणाले.
…नाही तर तुम्ही मराठी आईच दूध प्यालेले नाहीत
“भय्याजी जोशींसंदर्भात महाराष्ट्र विधानसभेत राज्य सरकारने निंदा ठराव आणून धिक्कार करावा,
नाही तर तुम्ही मराठी आईच दूध प्यालेले नाहीत. तुमच्या दूधात भेसळ आहे. तुमच्या जन्मात भेसळ आहे.
उद्धव ठाकरेंची शिवसेना हे सहन करणार नाही. कालपासून आमचं रक्त खवळलय” अशा शब्दात संजय राऊत यांनी टीका केली.
Read more news here : https://ajinkyabharat.com/dhananjay-munde-yancha-rajinamyacha-developed-chief-minister/