पालघर : पालघर लोकसभा निवडणुकीसाठी तिकीट नाकारले हा माझ्या दृष्टीने अत्यंत धक्कादायक आणि स्वतःसाठी दुःखद निर्णय आहे, अशा भावना पालघरचे विद्यमान खासदार आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील राजेंद्र गावित यांनी व्यक्त केल्या आहेत. मात्र कार्यकर्त्यांमधील नाराजी दूर करुन महायुतीच्या उमेदवाराला विजयी करणार, असा विश्वासही गावितांनी बोलून दाखवला. शिवसेनेकडे असलेला पालघर लोकसभा मतदारसंघ भाजपने हिसकावून घेत हेमंत विष्णू सावरा यांना उमेदवारी जाहीर केली आहे.
राजेंद्र गावित काय म्हणाले?
पालघर लोकसभा निवडणुकीसाठी तिकीट नाकारले हा माझ्या दृष्टीने अत्यंत धक्कादायक आणि स्वतःसाठी दुःखद निर्णय आहे. हे खरे असले तरी माझ्या कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम आणि प्रचंड नाराजी निर्माण झाली आहे. कार्यकर्त्यांचा मला फोन येत असून वेगवेगळ्या प्रकारे प्रतिक्रिया देत आहेत.
माझे जरी तिकीट नाकारले गेले असले तरीसुद्धा महायुतीचे जे उमेदवार आहेत. त्या उमेदवाराबाबत कार्यकर्त्यांमध्ये असलेले नैराश्य आणि नाराजी दूर करण्याचा मी प्रयत्न करणार आहे, उमेदवाराला विजयी करण्यासाठी आपण प्रयत्न करूया असे आवाहन पालघरचे खासदार राजेंद्र गावित यांनी कार्यकर्त्यांना केले आहे.
Related News
तरुण-तरुणींना सरकारी कार्यालयं आणि खासगी कंपन्यांमधील
कामांचा अनुभव मिळावा आणि ते रोजगारक्षम व्हावेत यासाठी
एकनाथ शिंदे सरकारनं मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना सुरु केली.
मुंबई...
Continue reading
गेल्या काही दिवसांपासून धमक्यांचे प्रमाण वाढले आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची गाडी बॉम्बने उडवून देण्याची
धमकी देण्यात आल्याचे प्रकरण ताजे असतानाच आता
मंत्रालयातील मुख्यम...
Continue reading
छत्रपती संभाजीनगरमध्येच ठाकरे गटाचे पराभूत उमेदवार
सुरेश बनकर यांची भाजपमध्ये घरवापसी होऊन दहा दिवसही
लोटले नसताना, आता परदेशींनीही पुन्हा भाजपचा झेंडा हाती घेण्याचा निर्णय घेतल...
Continue reading
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या
हत्या प्रकरणात कुटुंबियांनी पोलिसांवर थेट आरोप केले आहेत.
आता मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठे भाष्य केले ...
Continue reading
शिवसेनेच्या नीलम गोरे यांच्यावर संजय राऊत
आणि उबाठा गटाने टीका केली. याचा समाचार घेताना
आता मंत्री संजय शिरसाट हे दिसले आहेत.
संजय शिरसाट यांनी उबाठा गटावर अनेक गंभीर आरोप केले....
Continue reading
अण्णा हजारे यांनी जी मागणी केली आहे त्याबद्दल आपले सरकार
ऐकून घेतील आणि त्यावर निर्णय करतील,
असे स्पष्टीकरण चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे.
बीडच्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष...
Continue reading
पुण्यात गजानन मारणेच्या गुंडांनी एका मिरवणुकीदरम्यान
भाजप कार्यकर्ता देवेंद्र जोगला मारहाण केली होती.
पुण्यात आल्यावर या कार्यकर्त्याची केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी भेट घे...
Continue reading
ठाकरे गटाचे माजी खासदार विनायक राऊत,
माजी आमदार वैभव नाईक यांचे अत्यंत विश्वासू साथीदार आणि
कट्टर शिवसैनिक रामदास उर्फ रामू विखाळे यांनी
पत्नी स्वरुपा विखाळे यांच्यासह भाजपचा झे...
Continue reading
मुख्यमंत्री वैद्यकीय साह्य निधी कक्षाच्या कार्यानंतर
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गरजू रुग्णांसाठी
उपमुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्षाची स्थापना केली आहे.
या माध्यमातून राज्याती...
Continue reading
राजन साळवी यांच्या पक्षप्रवेशाला सामंत बंधूंचा नकार होता.
त्यांना राजन साळवी नको होते. तरी शिंदेंनी साळवींना सेनेत घेतलं,
असा दावा विनायक राऊतांनी केला आहे
प्रसाद रानडे, रत्नागि...
Continue reading
संजय राऊत यांनी भाजपवर पुन्हा एकदा हल्ला चढवला आहे.
आज जे काही लोक आम्हाला सोडून जात आहेत,
ते फक्त ईडी आणि सीबीआयच्या कारवाईला घाबरून जात आहेत.
दुसरं काही नाही. आमच्या हातात फक्...
Continue reading
Raosaheb Danve BJP : भाजपचे रावसाहेब दानवे म्हणजे एकदम रांगडी व्यक्तिमत्व.
जे मनात आले ते कोणताही मुलाहिजा न ठेवता बोलून मोकळं व्हायचं, असा त्यांचा स्वभाव,
पण याचमुळे ते अनेक...
Continue reading
माजी मंत्री विष्णू सावरा यांचे चिरंजीव हेमंत सावरा यांना पालघर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देत असल्याचे भाजपने गुरुवारी रात्री जाहीर केले. पाचव्या टप्प्यातील मतदानासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अवघ्या एक दिवस, किंबहुना जेमतेम काही तास आधी भाजपने तिकीट जाहीर केले. त्यामुळे विद्यमान खासदार राजेंद्र गावित यांना मोठा धक्का मानला जात आहे. गावितांना दुःख झाले असले, तरी कुठलाही निर्णय घेण्यासाठी पक्षाने त्यांच्याकडे अवधीच दिला नाही.
विशेष म्हणजे राजेंद्र गावित हे पूर्वी भाजपवासी होते. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना युतीत लढले. मात्र पालघरची जागा शिवसेनेला सुटल्याने गावितांनी भाजप सोडून शिवसेनेत प्रवेश केला आणि निवडणूक लढली, ते विजयीही झाले. राजकीय दृष्ट्या ही एक प्रकारची अॅडजस्टमेंट मानली जात होती.
यंदा हा मतदारसंघ परत मिळवण्यासाठी भाजप आग्रही होतं. परंतु गावितांना पुन्हा संधी मिळणं फिक्स मानलं जात असल्यामुळे त्यांची घरवापसी होऊन ते भाजपच्या तिकिटावर आता रिंगणात उतरतील, अशी अटकळ बांधली जात असतानाच महायुतीत भाकरी फिरवण्यात आली.