विमान कंपन्यांना बॉम्बच्या धमकीचे सत्र सुरूच आहे. शनिवारी
अजून एकदा अशा प्रकारची धमकी येऊन धडकली. 10
Related News
गुरुग्राम हत्याकांड नवा खुलासा: वडिलांनी राधिकावर झाडल्या ५ गोळ्या; किचनमध्येच केला क्रूर अंत
शेतरस्त्यांसाठी समग्र योजना; मुख्यमंत्री फडणवीसांची मोठी घोषणा
जयंत पाटील यांचा राजीनामा; शशिकांत शिंदे नवे प्रदेशाध्यक्ष होण्याची शक्यता
ज्वारी खरेदीत घोटाळ्याचा आरोप; प्रहार पक्षाच्या जिल्हाध्यक्षांवर एसआयटी चौकशी
बुलढाणा जिल्हा रुग्णालयात नातेवाईकांमध्ये तुफान हाणामारी; सुरक्षेवर उठले प्रश्न
खदान परिसरात युवकावर चार जणांचा प्राणघातक हल्ला;
अकोल्यात आकाशात सूर्याभोवती इंद्रधनुष्य! नागरिकांनी घेतला अनोख्या दृश्याचा आनंद
जन सुरक्षा की भाजप सुरक्षा विधेयक उद्धव ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल
वारी हनुमान येथील डोहात युवकाचा बुडून मृत्यू
डाबकी रोड पोलिसांची गोवंश रक्षण कारवाई
आमदार संजय गायकवाड अडचणीत; कॅन्टीन कर्मचाऱ्याला मारहाणीप्रकरणी गुन्हा दाखल,
पिंपरी-चिंचवडचे नामकरण ‘राजमाता जिजाऊनगर’ करावे – विधानसभेत आमदार उमा खापरे यांची ठाम मागणी
वेगवेगळ्या फ्लाईट्समध्ये बॉम्ब असल्याची धमकी देण्यात
आली. इंडिगो आणि अकासा एअरलाईन्सच्या प्रत्येकी पाच
विमानांसाठी हा धमकीचा कॉल आला होता. त्यानंतर सुरक्षा
यंत्रणा अलर्ट झाल्या. यंत्रणांनी याप्रकरणी तपास सुरू केला आहे.
मुंबईतून इस्तांबूलकडे रवाना होत असलेल्या फ्लाईट 6E 17
मध्ये बॉम्ब असल्याची धमकी आली. प्रवाशांची सुरक्षा आणि
चालक दलाची सुरक्षा महत्त्वाची असल्याचे ते म्हणाले. सुरक्षा
यंत्रणेसोबत काम करत आहोत आणि सावधगिरीने पावलं टाकत
असल्याची माहिती इंडिगोने दिली आहे. या सोमवारपासून
आतापर्यंत भारतीय विमान कंपन्यांना जवळपास 70 वेळा बॉम्बने
उडवण्याची धमकी आलेली आहे. या सर्व धमक्या अखेर फोल
ठरल्या आहेत. या धमक्यामुळे सुरक्षेसाठी मार्ग बदलण्यात आला.
अथवा त्यांच्या उड्डाण वेळेत बदल करण्यात आला आहे. नागरी
विमान वाहतूक मंत्रालयाने या धमक्याविषयी मोठा निर्णय
घेण्यासाठी पावलं टाकली आहे. अशा धमकी देणाऱ्या नागरिकांना
भविष्यात विमानाने प्रवास करता येणार नाही यासाठी एक खास
सूची तयार करण्यात येत असल्याचे मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.
त्यांना नो-फ्लाई सूचीत, यादीत टाकण्याची भूमिका त्यांनी घेतली.
त्यात असा त्रास देणाऱ्या प्रवाशांचा आणि नागरिकांचा समावेश
करण्यात येणार आहे. त्यामुळे त्यांना आयुष्यात विमानाने प्रवास
करता येणार नाही.
Read also: https://ajinkyabharat.com/india-dominates-manufacturing-sector-in-textile-industry/