विमान कंपन्यांना बॉम्बच्या धमकीचे सत्र सुरूच आहे. शनिवारी
अजून एकदा अशा प्रकारची धमकी येऊन धडकली. 10
Related News
कुणाल किशोर कमलाकर प्रकरणात काका वर खुनाचा गुन्हा दाखल.
बोरगाव मंजू येथे गोवंशाला जीवनदान.
उन्हाळी क्रिकेट शिबिराचा समारोप.
अकोट शहरात एकास ट्रकने चिरडले, घटनास्थळावरच दुर्दैवी मृत्यू
बांगलादेश यांची भारतातून रवानगी…
डीडीए रिक्वायरमेंट 2005 दिल्ली विकास प्राधिकरण मध्ये सरकारी नोकरी…
अकोल्यात ऑफ्रोह संघटनेचे धरणे आंदोलन;
बोर्डी येथील घोगा नाल्यावरील संरक्षण भिंतीचे काम अर्धवट
अकोट शहरात अकोला नाक्यावरील रेल्वे ब्रिजवर पथदिवे लागणार
अकोला जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक संदर्भात पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न
पावसाचा तब्ब्बल ३ हजार ७६ हेक्टरवरील पिकांना फटका बसला असून, २२ घराचे अंशतः नुकसान
अकोला शहरातील नऊ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश नुकतेच जारी करण्यात आले
वेगवेगळ्या फ्लाईट्समध्ये बॉम्ब असल्याची धमकी देण्यात
आली. इंडिगो आणि अकासा एअरलाईन्सच्या प्रत्येकी पाच
विमानांसाठी हा धमकीचा कॉल आला होता. त्यानंतर सुरक्षा
यंत्रणा अलर्ट झाल्या. यंत्रणांनी याप्रकरणी तपास सुरू केला आहे.
मुंबईतून इस्तांबूलकडे रवाना होत असलेल्या फ्लाईट 6E 17
मध्ये बॉम्ब असल्याची धमकी आली. प्रवाशांची सुरक्षा आणि
चालक दलाची सुरक्षा महत्त्वाची असल्याचे ते म्हणाले. सुरक्षा
यंत्रणेसोबत काम करत आहोत आणि सावधगिरीने पावलं टाकत
असल्याची माहिती इंडिगोने दिली आहे. या सोमवारपासून
आतापर्यंत भारतीय विमान कंपन्यांना जवळपास 70 वेळा बॉम्बने
उडवण्याची धमकी आलेली आहे. या सर्व धमक्या अखेर फोल
ठरल्या आहेत. या धमक्यामुळे सुरक्षेसाठी मार्ग बदलण्यात आला.
अथवा त्यांच्या उड्डाण वेळेत बदल करण्यात आला आहे. नागरी
विमान वाहतूक मंत्रालयाने या धमक्याविषयी मोठा निर्णय
घेण्यासाठी पावलं टाकली आहे. अशा धमकी देणाऱ्या नागरिकांना
भविष्यात विमानाने प्रवास करता येणार नाही यासाठी एक खास
सूची तयार करण्यात येत असल्याचे मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.
त्यांना नो-फ्लाई सूचीत, यादीत टाकण्याची भूमिका त्यांनी घेतली.
त्यात असा त्रास देणाऱ्या प्रवाशांचा आणि नागरिकांचा समावेश
करण्यात येणार आहे. त्यामुळे त्यांना आयुष्यात विमानाने प्रवास
करता येणार नाही.
Read also: https://ajinkyabharat.com/india-dominates-manufacturing-sector-in-textile-industry/