[stock-market-ticker symbols="AAPL;MSFT;GOOG;HPQ;^SPX;^DJI;LSE:BAG" stockExchange="NYSENasdaq" width="100%" palette="financial-light"]
वेळ ठरली, वर्षही ठरले, हा मुस्लिम देश ठरणार तिसर्‍या महायुद्धाचे कारण! बाबा वेंगाची काय भविष्यवाणी

वेळ ठरली, वर्षही ठरले, हा मुस्लिम देश ठरणार तिसर्‍या महायुद्धाचे कारण! बाबा वेंगाची काय भविष्यवाणी

Baba Vanga Prediction 2025 : बाबा वेंगाची भविष्यवाणीने जगभरात खळबळ उडवली आहे. सध्याचे राजकीय समीकरणं वेगळे संकेत देत असले तरी तिने तिसर्‍या महायुद्धाचे भाकीत केलेले आहे. यापूर्वी...

Continue reading

‘…हा सरकारचा खोटानाटा खेळ’, जयकुमार गोरे प्रकरणावरून सुप्रिया सुळेंचा घणाघात

‘…हा सरकारचा खोटानाटा खेळ’, जयकुमार गोरे प्रकरणावरून सुप्रिया सुळेंचा घणाघात

जयकुमार गोरे यांच्यावर आरोप करणाऱ्या महिलेला सातारा पोलिसांकडून अटक करण्यात आली असून तब्बल 1 कोटी रुपयांची खंडणी स्वीकारताना पोलिसांनी या महिलेला ताब्यात घेतल्याची माहिती समोर य...

Continue reading

नागपूरच्या राड्याला जबाबदार कोण?; विकी कौशल आणि नितेश राणेंचं नाव घेत अभिनेत्याने केलेले ट्वीट चर्चेत

नागपूरच्या राड्याला जबाबदार कोण?; विकी कौशल आणि नितेश राणेंचं नाव घेत अभिनेत्याने केलेले ट्वीट चर्चेत

सध्या सोशल मीडियावर एका अभिनेत्याची पोस्ट चर्चेत आहे. त्याने या पोस्टमध्ये नागपूरमध्ये झालेल्या राड्याला कोण जबाबदार आहे याविषयी वक्तव्य केले आहे.महाराष्ट्रात औरंगजेबाच्या कबरीवरु...

Continue reading

दिशा सालियनचा मृत्यू कसा झाला? एक्स बॉयफ्रेंड रोहन रॉयचा काय होता ‘तो’ धक्कादायक खुलासा?

दिशा सालियनचा मृत्यू कसा झाला? एक्स बॉयफ्रेंड रोहन रॉयचा काय होता ‘तो’ धक्कादायक खुलासा?

Disha Salian Fiance Rohan Rai Opened Up: 'दिशाच्या मृत्यूनंतर घाबरलो, पोलिसांनी माझे कपडे काढले आणि...', दिशा सालियनच्या मृत्यूनंतर एक्स बॉयफ्रेंड रोहन रॉयचा 'तो' धक्कादायक खुलासा...

Continue reading

आताची मोठी बातमी, औरंगजेबाच्या कबरीचा वाद, NIA पथक छत्रपती संभाजीनगरात, अपडेट काय?

आताची मोठी बातमी, औरंगजेबाच्या कबरीचा वाद, NIA पथक छत्रपती संभाजीनगरात, अपडेट काय?

NIA team in Chhatrapati Sambhajinagar : औरंगजेबाच्या कबरीवरून राज्यात वातावरण तापले आहे. त्यातच नागपूरमध्ये हिंसाचार उफळल्याने आता सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. मराठवाड्यातील...

Continue reading

शिवसेना शिंदे पक्षाच्या माजी उपसरपंचाच्या हत्येनं जळगाव हादरलं

शिवसेना शिंदे पक्षाच्या माजी उपसरपंचाच्या हत्येनं जळगाव हादरलं

जळगाव तालुक्यातील कानसवाडा गावाचे माजी उपसरपंचाचा निर्घृण खून ! चाकू आणि चॉपरने त्यांच्यावर वार चढवल्याने ते जागीच कोसळले अशी माहिती समोर आली आहे. बीडच्या मस्साजोग येथील सरपंच सं...

Continue reading

Yashwant Verma : दिल्ली उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीच्या घरात आग लागताच अग्नीशमन यंत्रणा पोहोचली, पण घरातला नोटांचा 'खजिना' पाहून डोळे विस्फारण्याची वेळ!

Yashwant Verma : दिल्ली उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीच्या घरात आग लागताच अग्नीशमन यंत्रणा पोहोचली, पण घरातला नोटांचा ‘खजिना’ पाहून डोळे विस्फारण्याची वेळ!

Yashwant Verma : या प्रकरणाची माहिती मिळाल्यानंतर, CJI संजीव खन्ना यांच्या नेतृत्वाखाली सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमने त्यांची पुन्हा अलाहाबाद उच्च न्यायालयात बदली करण्याचा न...

Continue reading

Hingoli News : लग्नाच्या 2 दिवस आधी तरुणाचा अपघाती मृत्यू, कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर

लग्नाच्या 2 दिवस आधी तरुणाचा अपघाती मृत्यू, कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर

Hingoli Accident News : गणेश दुचाकीवरून जात असताना अज्ञात वाहनाने त्याच्या दुचाकीला धडक दिली. यात गणेश तनपुरे याचा जागीच मृत्यू झाला. Hingoli News : लग्नाच्या 2 दिवस आधी तरुणाचा...

Continue reading

छत्तीसगडमध्ये पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, 22 नक्षलवादी ठार

छत्तीसगडमध्ये पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, 22 नक्षलवादी ठार

Bijapur Naxalites Encounter: बिजापूर आणि दंतेवाडाच्या सीमेवरील थाना गंगलूर भागातील आंद्री येथे नक्षलवाद्यांच्या उपस्थितीची माहिती पोलिसांना मिळाली होती. Bijapur Naxalites Encounte...

Continue reading

सध्या डिजिटल इंडियानंतर एआय इंडिया असंच पाहायला मिळत आहे. कृत्रिम बुद्धीमत्ता (AI) म्हणजेच एआयचा वापर सर्वच क्षेत्रात करण्यासाठीची धडपड दिसून येत आहे. त्यामुळे, शासनाने देखील एआयसाठी धोरण आखायला सुरुवात केली असून महाराष्ट्राची एआय पॉलिसी एप्रिल महिन्यात येईल, अशी घोषणाच माहिती व तंत्रज्ञानमंत्री आशिष शेलार यांनी विधानपरिषद सभागृहात आज केली. भाजप आमदार श्रीकांत भारतीय यांच्याकडून आर्टिफिशियल इंटिलिजन्स संदर्भात प्रश्न मांडण्यात आला होता. त्यावर मंत्री शेलार यांनी उत्तर दिले. दरम्यान, यावेळी शेलार (Ashish shelar) यांनी एआयचा मजेशीर किस्साही सांगितला. त्यावरुन, आमदार अनिल परब आणि आशिष शेलार यांच्यात चांगलीच मिश्कीलपणे जुबलबंदी रंगली. केरळ आयरस अशी एक एआय टिचर निर्माण करण्यात आली आहे. तंत्रज्ञान आलं त्यानंतर पाठ राहिले नाहीत, आर्टिफिशिअल संदर्भातले नवे आव्हान आपल्यासमोर आहे. चांगल्या दृष्टीने शिक्षणात हे येणे क्रांती ठरेल, आपण यासंदर्भात एक समग्र धोरण आणावं, असा प्रश्न श्रीकांत भारतीय यांनी उपस्थित केला होता. त्यावर, आता आशिष शेलार यांनी सभागृहात उत्तर दिले. एआय ही उद्याची भाषा जी जगाने ठरवली आहे, दीड दोन आठवड्यात एकच चर्चा लावली आहे. जगातील नवीन संधी आणि आव्हानांचे स्वरुप एआयच्या रुपाने आलेलं आहे. संशोधन, रोजगार निर्मिती ज्ञान मिळवण्याची व्यवस्था आपण इंटरनेट आल्यानंतर बघितली. एआयच्या सहाय्याने सर्वत्रच मूलभूत क्षेत्रात बदल करण्याचा प्रयत्न सुरू आहे. मग हे आव्हान आहे की अडचण आहे, असा प्रश्न उपस्थित होतो. सन 2024 ला नीती आयोग, केंद्रातील विभाग, तज्ज्ञांकडून भारतीय एआय धोरण लाँच केलं गेलं. आता, आपण यासंदर्भात टास्क फोर्स बनवला आहे, एआयचा उपयोग होणार असेल तर नेमकं होणार काय? असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. त्यामुळे, राज्याची एआय पॉलिसी एप्रिल महिन्यात येईल, अशी माहिती माहिती व तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार यांनी दिली. शिक्षणात पूरक व्यवस्था निर्माण करण्यासाठी नियम धोरण बनवावे लागेल, त्यासाठी समिती नेमू. शिक्षण तज्ज्ञ, पालक आणि शिक्षक हे सर्व त्या समितीमध्ये असतील,असेही शेलार यांनी यावेळी, सांगितले. एआय पालकमंत्रीवरुन जुगलबंदी राज्याच्या एआय धोरणाबाबत विधानपरिषदेत चर्चा सुरू असताना एआयचे परिणाम आणि दुष्परिणामावर चर्चा सुरू होती. त्यावेळी पालकमंत्रीपदाबाबत आपण प्रश्न विचारला होता, कोणत्या जिल्ह्याला कोण पालकमंत्री मिळणार असा प्रश्न मी एआयला विचारलं होता, असे मंत्री आशिष शेलार यांनी म्हटले. तेव्हा एआयने सांगितल्यानुसार महाराष्ट्रातील 80 टक्के जिल्ह्यांचे पालकमंत्री नेमले गेल्याचे उदाहरण आशिष शेलार यांनी सभागृहात दिले. शेलार यांच्या या उदाहरणावर अनिल परब यांनी मिश्लिल टोला लगावला. नाशिक आणि रायगडचे पालकमंत्री देखील एआयला निवडायला सांगा, असे परब यांनी म्हणताच विधानपरिषदेत एकच हशा पिकला. तर, एआय तो तिढा सोडवू शकणार नाही, असं आशिष शेलार यांनीही गमतीत म्हटलं. त्यावर तिथे एआय नाही तर आय-माय आहे असे अनिल परब यांनी म्हटले. तर आय माय नाही "आयना का बायना" आहे, असे उत्तर पुन्हा आशिष शेलार यांनी दिले. त्यामुळे, एआय आणि पालकमंत्री पदावरुन विधानपरिषदेत चांगलीच मिश्कील जुगलबंदी पाहायला मिळाली. दरम्यान, यावेळी शिवसेना उबाठा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे देखील सभागृहात उपस्थित होते

एप्रिल महिन्यात राज्याची AI पॉलिसी, मंत्री शेलार यांची घोषणा; पालकमंत्रीपदाचाही मजेशीर किस्सा सांगितला

केरळ आयरस अशी एक एआय टिचर निर्माण करण्यात आली आहे. तंत्रज्ञान आलं त्यानंतर पाठ राहिले नाहीत, आर्टिफिशिअल संदर्भातले नवे आव्हान आपल्यासमोर आहे. सध्या डिजिटल इंडियानंतर एआय इंडिया ...

Continue reading