गावालगतच्या शिवाजी नगर शेतशिवारातील गोठ्यावर काल रात्री अचानक झालेल्या
हल्ल्यात तीन बकर्या व दोन वासरांचा मृत्यू झाला. ही घटना विजय रघुनाथ निमकर्डे व रवी रघुनाथ
निमकर्डे यांच्या गुरांच्या गोठ्यात घडली. मृत बकर्यांच्या शरीराचे अवशेष
Related News
अविश्वसनीय! 6 धक्कादायक माहिती समोर – कोल टॉमस अॅलन कोण आहे?
“जग हादरलं! ट्रम्पवर हल्ला आणि सोशल मीडियावर कटाच्या 7 थिअरीज”
भारतभरातील 5 खास आंब्याच्या लोणच्यांच्या रेसिपी जाणून घ्या
लहान की मोठा? जास्त पाणी असलेला नारळ कसा ओळखाल
घरीच बनवा थंडगार Mango Ice Cream , सोपी रेसिपी जाणून घ्या
10 मिनिटांत तयार करा हेल्दी Sprouts Bhel : चाट खाण्याची इच्छा पूर्ण करणारा पौष्टिक पर्याय
ITR Filing FY27: सुपर सीनियर सिटीझन्सना खरंच सूट आहे का?
RBI चा मोठा निर्णय: Paytm Payments Bank परवाना रद्द
फाडलेले व अर्धवट खाल्लेले दिसून आल्याने परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.
हल्ल्याची भीषणता:
गोठ्यात बांधलेल्या जनावरांवर रात्री हल्ला झाल्याची बाब आज सकाळी निमकर्डे बंधूंना आढळली.
त्यांनी तात्काळ वनविभागाला कळविल्यानंतर वनरक्षक अतिफ हुसेन यांनी घटनास्थळी भेट दिली.
तपासणीनंतर हा हल्ला जंगली जनावरांचा नसून कुत्र्यांचा असल्याचा प्राथमिक अंदाज वनविभागाने व्यक्त केला आहे.
गावकऱ्यांचा आक्षेप:
मात्र गावकऱ्यांनी व निमकर्डे बंधूंनी या मताला विरोध केला असून, हल्ल्याची तीव्रता व पद्धत पाहता
तो निश्चितच जंगली जनावरांचा असल्याचा दावा त्यांनी केला आहे. यासंदर्भात त्यांनी वनविभागाकडे
ऑनलाईन तक्रार दाखल करून नुकसानभरपाईची मागणी केली आहे.
पशुवैद्यकीय तपासणी:
पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. अबोली कथे यांनी मृत जनावरांचे शवविच्छेदन केले असून, अहवाल वनविभागाकडे सादर केला जाईल.
सुरक्षा आणि सतर्कता:
ही घटना समोर आल्यानंतर संपूर्ण गावात भीतीचं वातावरण पसरलं आहे.
वनविभागाने या भागात नजीकच्या काळात गस्त वाढवावी आणि जंगली जनावरांची उपस्थिती
असेल तर त्वरित उपाययोजना करावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
Read Also : https://ajinkyabharat.com/rajbhrat-coronache-sick/
