विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जागा वाटपाची चर्चा
विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने राजकीय हालचालींना
वेग येणे सुरू झाले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,
Related News
सानंदांच्या निष्ठावान कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी ( अजित पवार ) मध्ये प्रवेश
आसाममध्ये उंदरांचा कहर :
इतिहासात १६ एप्रिल : भारतीय रेल्वेचा पहिला प्रवास,
तेल्हाऱ्यात शिवसेनेची आढावा बैठक संपन्न –
अलीगडमध्ये देवी-देवतांच्या चित्र असलेल्या नैपकिनवरून वाद; हॉटेल मालक अटकेत
निसर्गाचा अद्भुत चमत्कार
दिल्ली मेट्रोमध्ये महिलांचे भजन कीर्तन; CISF जवानांकडून फटकार,
गुरुग्राममधील खासगी रुग्णालयात वेंटिलेटरवर असलेल्या एअर होस्टेसवर बलात्कार; पोलीस तपास सुरु
“उर्दू कोणत्याही धर्माची भाषा नाही”; पातूर पालिकेवरील उर्दू फलकाला सर्वोच्च न्यायालयाची मान्यता
चालत्या ट्रेनमध्ये एटीएमची सुविधा! ‘फास्ट कॅश एक्सप्रेस’द्वारे प्रवाशांना नवे बँकिंग स्वातंत्र्य
मुंबई-अमरावती विमानसेवा सुरू; विदर्भवासीयांसाठी वेगवान प्रवासाचा नवा पर्याय
अकोला शहरात आता ५ दिवसाआड पाणीपुरवठा
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार
यांनी गुरुवारी रात्री उशिरा वर्षा बंगल्यावर एक तास चर्चा केली.
चर्चेचा तपशील अधिकृतपणे सांगण्यात आला नसला
तरी विधानसभा निवडणुकीचे जागावाटप हा महत्त्वाचा मुद्दा चर्चेत होता,
असे सूत्रांनी सांगितले. लोकसभा निवडणुकीच्या वेळी
जागावाटपाचा बराच घोळ महायुतीमध्ये झाला होता,
तसा विधानसभेला होऊ नये यासाठी लगेच जागा वाटपाची
चर्चा सुरू करावी, असे ठरल्याचे समजते.
तिन्ही पक्षांकडून जागावाटपाबाबत प्राथमिक चर्चा सुरू करायला
कोण-कोण नेते असतील, याची नावेही या बैठकीत निश्चित करण्यात आली.
जागावाटपाचे सूत्र लवकर निश्चित झाले नाही तर आपल्या आमदारांची
किवा तगड्या उमेदवारांची पळवापळवी होऊ शकते, अशी शंका महायुतीला आहे.
महाविकास आघाडीतील काही आमदार महायुतीकडून लढू शकतात.
महायुतीचे जागा वाटप लवकर ठरले तर त्यांना ‘शब्द’ देणे सोपे जाईल, असाही विचार पुढे आला आहे.
Read also: https://ajinkyabharat.com/iphone-becomes-cheaper/