अकोट तहसीलदारांना निवेदन सादर; सरकारच्या आश्वासनाची आठवण करून दिली
अकोट (प्रतिनिधी)
अकोट तालुक्यातील शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी, या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार गट)
यांच्यावतीने तालुकाधिकारी कार्यालयात निवेदन सादर करण्यात आले. पक्षाचे तालुकाध्यक्ष
Related News
गुरुग्राममधील टेनिसपटू राधिका यादव हत्येप्रकरणी नवे धक्कादायक तपशील समोर आले आहेत.
वडील दीपक यादव यांनी राधिकेवर ५ गोळ्या झाडल्या, त्यापैकी ४ गोळ्या लागून तिचा ज...
Continue reading
राज्यातील प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतापर्यंत रस्ता पोहोचावा यासाठी महाराष्ट्र सरकार समन्वित योजना राबवणार आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत घोषणा केली की, विविध विभाग...
Continue reading
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) प्रदेशाध्यक्षपदावरून जयंत पाटील यांनी राजीनामा दिला असून,
शशिकांत शिंदे यांची नावाची जोरदार चर्चा सुरु आहे. १५ जुलै रोजी नवा प...
Continue reading
शेतकऱ्यांच्या हक्कासाठी लढा देणाऱ्या प्रहार जनशक्ती पक्षासाठी अकोला जिल्ह्यातून धक्कादायक बातमी समोर आली आहे.
अकोट कृषी उत्पन्न बाजार समितीतील हमीभावाने झालेल्या ज्वारी खरेदीत मोठ...
Continue reading
बुलढाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात एका महिला रुग्णाच्या नातेवाईकांमध्ये तुफान हाणामारी
झाल्याची घटना घडली असून, याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
ही घटना वार्ड क्रमांक ...
Continue reading
नागपूरच्या खदान पोलिस स्टेशनच्या हद्दीतील कौलखेड परिसरात एका ३२ वर्षीय युवकावर चार मारेकऱ्यांनी
चाकू आणि लोखंडी पाइपने प्राणघातक हल्ला केला. ही धक्कादायक घटना गुरुवारी रात्री घडल...
Continue reading
आज 12 जुलै 2025 रोजी अकोला जिल्ह्यात एक विस्मयकारक नैसर्गिक घटना पाहायला मिळाली.
दुपारी 12 ते 12:15 दरम्यान आकाशात सूर्याभोवती इंद्रधनुष्यसारखे वलय,
म्हणजेच सूर्य प्रभामंडल (Sun ...
Continue reading
गुरुवारी विधानसभेत जन सुरक्षा विधेयक मंजूर करण्यात आलं .
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत जन सुरक्षा विधेयक सादर केलं त्यानंतर त्यावर चर्चा झाली
आणि नंतर आवाजी मतद...
Continue reading
संग्रामपूर प्रतिनिधी-
वारी हनुमान येथील डोहात बुडून एका युवकाचा मृत्यू झाल्याची घटना आज 11 जुलै रोजी दुपारी 2.30
वाजताचे सुमारास घडली. मृतक युवकाचे नाव अक्षय सिध्दार्थ भोजने रा. ...
Continue reading
अकोल्याच्या डाबकी रोड पोलीस स्टेशन अंतर्गत
गोवंश कारवाई करून एका बैल जोडीला जीवनदान दिले आहे.
ही कारवाई बजरंग दलच्या कार्यकर्त्यांच्या मदतीने करण्यात आली.
दरम्यान, गायगाव ...
Continue reading
शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात आले आहेत.
कॅन्टीनमधील कर्मचाऱ्याला मारहाण केल्याच्या प्रकरणी त्यांच्या विरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे...
Continue reading
राज्यभरात शहरांच्या नामांतराची लाट सुरू असताना, पिंपरी-चिंचवड शहराचे नामकरण
‘राजमाता जिजाऊनगर’ करावे, अशी ठाम मागणी भाजपच्या आमदार उमा खापरे यांनी विधानसभेत केली आहे.
त्यांनी जिज...
Continue reading
श्रीयश चौधरी यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन देण्यात आले असून शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यात आले.
निवडणुकीत आश्वासने, प्रत्यक्षात शून्य कर्जमाफी!
नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये सत्ताधारी पक्षांनी शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफीचे आश्वासन दिले होते.
मात्र, निवडणुका जिंकल्यानंतर हे आश्वासन हवेत विरले असून प्रत्यक्षात कोणतीही ठोस कारवाई झाली नाही,
अशी टीका निवेदनात करण्यात आली आहे.
तसेच मार्च महिन्याच्या अखेरीस बँकांकडून कर्जफेडीचा दबाव टाकण्यात येत
असल्यामुळे शेतकरी अजूनच अडचणीत सापडले आहेत, असेही नमूद करण्यात आले.
नुकसानीने गांजलेला शेतकरी आत्महत्या करण्याच्या उंबरठ्यावर
निरंतर नापिकी, शेतमालाला मिळणारा कवडीमोल दर, वाढते उत्पादन खर्च आणि बँकांचे दडपण यामुळे
शेतकऱ्यांच्या आर्थिक अडचणी दिवसेंदिवस वाढत आहेत. यामुळे कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या
अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्येसारखे टोकाचे निर्णय घेतले आहेत.
“शेतकरी आत्महत्येस सरकार जबाबदार असून, अशा प्रकरणांमध्ये खुनाचे गुन्हे दाखल करावेत,”
अशी मागणीही निवेदनात करण्यात आली आहे.
शेतकऱ्यांसाठी कायद्याने सरसकट कर्जमाफीची अंमलबजावणी करा – राष्ट्रवादी काँग्रेस
शेतकरी विरोधी धोरणांमुळे ग्रामीण भागात आर्थिक व सामाजिक असंतुलन निर्माण झाले आहे.
त्यामुळे शासनाने तातडीने सरसकट कर्जमाफी जाहीर करून दिलेल्या निवडणुकीतील आश्वासनांची पूर्तता करावी,
अशी ठाम मागणी राष्ट्रवादी काँग्रेसने केली आहे.
निवेदन सादर करताना उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्ते:
या निवेदनप्रसंगी जिल्हा बुथ कमिटी प्रमुख कैलास गोंडचर, तालुकाध्यक्ष श्रीयश चौधरी, सिकंदर मर्दाने,
माजी नगरसेवक विवेक बोचे, कृ.उ.बा.सं. संचालक धीरज हिंगणकर, तसेच अविनाश जायले,
अंकुश चौधरी, रोशन कंकाळे, आश्विन चौधरी, राम देशमुख, हनुमंत चौधरी, मंगळे, अब्रक शेख,
अजीत शेख, अलीम शहा, आकाश चव्हाण, योगेश इंगोले, प्रमोद लहाने, गजानन पडोळे,
कैलास कोटकर, नरेंद्र कोंडे यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.