अकोट तहसीलदारांना निवेदन सादर; सरकारच्या आश्वासनाची आठवण करून दिली
अकोट (प्रतिनिधी)
अकोट तालुक्यातील शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी, या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार गट)
यांच्यावतीने तालुकाधिकारी कार्यालयात निवेदन सादर करण्यात आले. पक्षाचे तालुकाध्यक्ष
Related News
'ऑपरेशन सिंदूर'नंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आदमपूर येथील हवाई तळावर जाऊन
भारतीय जवानांना उद्देशून ठाम आणि प्रेरणादायी संदेश दिला. या कारवाईनंतर पंतप्रधानांनी थेट सीमेवर
क...
Continue reading
नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाचे नवे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेणारे भूषण गवई यांच्याबाबत संपूर्ण देशात अभिमानाची लाट आहे.
अमरावतीच्या मातीतून आलेल्या गवई यांच्या मातोश्री कमलाताई ...
Continue reading
महाराष्ट्र बोर्डाच्या २०२५ च्या दहावी परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून,
यंदाही विद्यार्थ्यांची यशाची टक्केवारी उंचावलेली दिसून येते. मात्र जे विद्यार्थी या परीक्षेत अपयशी ठर...
Continue reading
महाराष्ट्रात अवकाळी पावसाचा थेट परिणाम आता जनतेच्या खिशावर दिसून येतोय.
भाजीपाल्याचे दर गगनाला भिडले असून, फरसबी, गवार, मटार यांसारख्या भाज्यांनी शंभरी पार केली आहे.
यामुळे रोजच्...
Continue reading
पाकिस्तानी कलाकारांनी भारताविरोधात अपमानास्पद वक्तव्य केल्यानंतर, त्याला आता चोख प्रतिसाद दिला जात आहे.
फवाद खान आणि माहिरा खान यांच्यावरील कारवाईचा फटका आता प्रत्यक्ष त्यांच्या क...
Continue reading
किन्हीराजा | प्रतिनिधी
किन्हीराजा येथील शेतकरी आणि माजी सरपंच वैजनाथ आप्पा वसंत गोंडाळ यांच्या
शेतात घडलेल्या दुर्दैवी अपघातात ३ जनावरांचा विजेच्या शॉकने मृत्यू झाला आहे.
गोंडाळ...
Continue reading
रात्रभर मचानावर बसून निसर्गप्रेमींनी घेतली प्राण्यांची नोंद.
शेलुबाजार वार्ता :- श्याम अपूर्वा .१३
बौद्ध पौर्णिमेच्या लख्ख चंद्रप्रकाशात वाशीम-अकोला जिल्ह्याच्या सीमेलगत असल...
Continue reading
पुणे | १३ मे २०२५
सातत्याने आभाळाकडे डोळे लावून बसलेल्या शेतकरी आणि नागरिकांसाठी एक आनंदाची बातमी आहे.
मान्सून अंदमानात दाखल झाला असून पुढील काही दिवसांत
महाराष्ट्रातही (६ जून र...
Continue reading
श्रीनगर | १३ मे २०२५
जम्मू-काश्मीरच्या शोपियां जिल्ह्यातील शुकरू-केलर परिसरात आज पहाटेपासून सुरक्षा दल आणि
अतिरेक्यांमध्ये भीषण चकमक झाली. या कारवाईत सुरक्षा दलांनी तीन पाकिस्ता...
Continue reading
नवी दिल्ली | १३ मे २०२५
"ऑपरेशन सिंदूर"द्वारे पाकिस्तान आणि तिथे आश्रय घेतलेल्या दहशतवाद्यांना जोरदार चपराक दिल्यानंतर
आज सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आदमपूर एअरबेसला भेट द...
Continue reading
नवी दिल्ली | १३ मे २०२५केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाकडून (CBSE) इयत्ता बारावीचा निकाल आज अधिकृतरित्या जाहीर करण्यात आला आहे.
यंदा 88.39% विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, हा निकाल ग...
Continue reading
mahahsscboard.in वर दुपारी 1 वाजता लिंक सक्रिय"
मुंबई | १३ मे २०२५
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या फेब्रुवारी-मार्च 2025 मध्ये झालेल्या
इयत्ता दहावी...
Continue reading
श्रीयश चौधरी यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन देण्यात आले असून शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यात आले.
निवडणुकीत आश्वासने, प्रत्यक्षात शून्य कर्जमाफी!
नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये सत्ताधारी पक्षांनी शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफीचे आश्वासन दिले होते.
मात्र, निवडणुका जिंकल्यानंतर हे आश्वासन हवेत विरले असून प्रत्यक्षात कोणतीही ठोस कारवाई झाली नाही,
अशी टीका निवेदनात करण्यात आली आहे.
तसेच मार्च महिन्याच्या अखेरीस बँकांकडून कर्जफेडीचा दबाव टाकण्यात येत
असल्यामुळे शेतकरी अजूनच अडचणीत सापडले आहेत, असेही नमूद करण्यात आले.
नुकसानीने गांजलेला शेतकरी आत्महत्या करण्याच्या उंबरठ्यावर
निरंतर नापिकी, शेतमालाला मिळणारा कवडीमोल दर, वाढते उत्पादन खर्च आणि बँकांचे दडपण यामुळे
शेतकऱ्यांच्या आर्थिक अडचणी दिवसेंदिवस वाढत आहेत. यामुळे कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या
अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्येसारखे टोकाचे निर्णय घेतले आहेत.
“शेतकरी आत्महत्येस सरकार जबाबदार असून, अशा प्रकरणांमध्ये खुनाचे गुन्हे दाखल करावेत,”
अशी मागणीही निवेदनात करण्यात आली आहे.
शेतकऱ्यांसाठी कायद्याने सरसकट कर्जमाफीची अंमलबजावणी करा – राष्ट्रवादी काँग्रेस
शेतकरी विरोधी धोरणांमुळे ग्रामीण भागात आर्थिक व सामाजिक असंतुलन निर्माण झाले आहे.
त्यामुळे शासनाने तातडीने सरसकट कर्जमाफी जाहीर करून दिलेल्या निवडणुकीतील आश्वासनांची पूर्तता करावी,
अशी ठाम मागणी राष्ट्रवादी काँग्रेसने केली आहे.
निवेदन सादर करताना उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्ते:
या निवेदनप्रसंगी जिल्हा बुथ कमिटी प्रमुख कैलास गोंडचर, तालुकाध्यक्ष श्रीयश चौधरी, सिकंदर मर्दाने,
माजी नगरसेवक विवेक बोचे, कृ.उ.बा.सं. संचालक धीरज हिंगणकर, तसेच अविनाश जायले,
अंकुश चौधरी, रोशन कंकाळे, आश्विन चौधरी, राम देशमुख, हनुमंत चौधरी, मंगळे, अब्रक शेख,
अजीत शेख, अलीम शहा, आकाश चव्हाण, योगेश इंगोले, प्रमोद लहाने, गजानन पडोळे,
कैलास कोटकर, नरेंद्र कोंडे यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.