मुर्तिजापूर, दि. १० (तालुका प्रतिनिधी):
तालुक्यातील रसुलपूर, विराहीत, कानडी या गावांतील शेतकऱ्यांनी नापिकी, शेतमालाला न मिळालेला आधारभूत भाव,
विमा व दुष्काळी मदतीचा अभाव यामुळे आत्महत्येचा मार्ग पत्करला.
Related News
गुरुग्राम हत्याकांड नवा खुलासा: वडिलांनी राधिकावर झाडल्या ५ गोळ्या; किचनमध्येच केला क्रूर अंत
शेतरस्त्यांसाठी समग्र योजना; मुख्यमंत्री फडणवीसांची मोठी घोषणा
जयंत पाटील यांचा राजीनामा; शशिकांत शिंदे नवे प्रदेशाध्यक्ष होण्याची शक्यता
ज्वारी खरेदीत घोटाळ्याचा आरोप; प्रहार पक्षाच्या जिल्हाध्यक्षांवर एसआयटी चौकशी
बुलढाणा जिल्हा रुग्णालयात नातेवाईकांमध्ये तुफान हाणामारी; सुरक्षेवर उठले प्रश्न
खदान परिसरात युवकावर चार जणांचा प्राणघातक हल्ला;
अकोल्यात आकाशात सूर्याभोवती इंद्रधनुष्य! नागरिकांनी घेतला अनोख्या दृश्याचा आनंद
जन सुरक्षा की भाजप सुरक्षा विधेयक उद्धव ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल
वारी हनुमान येथील डोहात युवकाचा बुडून मृत्यू
डाबकी रोड पोलिसांची गोवंश रक्षण कारवाई
आमदार संजय गायकवाड अडचणीत; कॅन्टीन कर्मचाऱ्याला मारहाणीप्रकरणी गुन्हा दाखल,
पिंपरी-चिंचवडचे नामकरण ‘राजमाता जिजाऊनगर’ करावे – विधानसभेत आमदार उमा खापरे यांची ठाम मागणी
या आत्महत्या ग्रस्त कुटुंबांतील निराधार बालकांना आधार देण्यासाठी जनमंच,
आंतरभारती व प्रगती शेतकरी मंडळ टीम मुर्तिजापूर यांच्या वतीने ‘
ओली संवेदना’ या ग्रुपवर मदतीचे आवाहन करण्यात आले होते.
सदर आवाहनाला केवळ दोन तासांतच उत्तम प्रतिसाद मिळत ३५ हजारांची मदत जमा झाली,
जी पुढे ७० हजारांपर्यंत वाढली. यामध्ये रसुलपूर येथील हरणे
कुटुंबातील बालकांसाठी ४५ हजार रुपयांची रक्कम शिक्षणासाठी देण्यात आली.
या मदतीचे वाटप माजी खासदार राजू शेट्टी यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी त्यांनी रसुलपूर येथील हरणे, विराहीत येथील व कानडी येथील गावंडे कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले.
कार्यक्रमास प्रगती शेतकरी मंडळाचे अध्यक्ष राजू साहेबराव वानखडे,
जनमंचचे प्रा. गौरखेडे, आंतरभारतीचे प्रमोद राजंदेकर, तसेच काळे, अभी पोळकट, नंदकिशोर बबानिया,
प्रफुल्ल मालधुरे, राजू काळे, सुभाष मोरे, गजानन मोरे, अरुण बोंडे, श्रीकांत वानखडे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
या उपक्रमातून समाजात संवेदनशीलता व एकोप्याची भावना जागृत झाल्याचे चित्र पहावयास मिळाले
असून, शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबांना दिलासा देणारा हा उपक्रम म्हणून त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.