प्रतिनिधी, मुंबई
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप घडवणारी घडामोड समोर आली आहे.
म.न.से अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट)
Related News
मनभा परिसरात संततधार पावसामुळे दुबार पेरणीचे संकट; शेतकऱ्यांचे मोठे नुकसान
हिंदी जीआरवर सरकारची माघार; ठाकरेबंधूंच्या एकतेमुळे मराठी ताकद उभी – संजय राऊतांचा दावा
हिंदी सक्तीवरून राज ठाकरे आक्रमक; “जाधव येऊ देत की कोणीतरी… आम्ही खपवून घेणार नाही!”
अकोला जिल्ह्यात व्यवसाय शिक्षण अधिकाऱ्यांचे जल्लोषात स्वागत
शिक्षण राज्यमंत्री यांच्या हस्ते श्री शिवाजी विद्यालयाच्या गौरी व वैभवीचा सत्कार
बोर्डी ग्राम पंचायत थकित गौण खनिज दंड वसुली प्रकरण गुलदस्त्यात
कुंडामधून गरम पाण्याचा झरा : अद्भुत घटना
पिंजर पोलिसाकडून अमली पदार्थ मिशन उडान दिनानिमित्त विविध विद्यालयातील विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन
जागतिक अंमली पदार्थविरोधी दिनानिमित्त ‘मिशन उडान’ अंतर्गत अकोला पोलिसांकडून भव्य जनजागृती उपक्रम
राजेश्वर मंदिराच्या विकासावरून आरोप-प्रत्यारोप; भाजपाची आमदार पठाण यांच्यावर टीका
दानापुर येथे राजर्षी शाहु महाराज जयंती उत्सव संपन्न
रशियात खासगी दौऱ्यावर गेलेले शशि थरूर; मॉस्कोमध्ये रशियाच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट
प्रमुख उद्धव ठाकरे यांना थेट युतीचा प्रस्ताव दिला आहे.
विशेष म्हणजे या प्रस्तावावर उद्धव ठाकरे यांनीही सकारात्मक संकेत दिले आहेत.
राज ठाकरे यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले की, “आमच्यातील भांडण हे क्षुल्लक होते,
ते मागे टाकून महाराष्ट्रासाठी एकत्र येणं आवश्यक आहे.“
यावर उद्धव ठाकरे यांनीही प्रतिक्रिया देताना म्हटलं की, “आपल्यातील किरकोळ भांडणं बाजूला ठेवायला मी तयार आहे.“
ठाकरे बंधू पुन्हा एकत्र येणार का?
राज ठाकरे यांनी काही वर्षांपूर्वी शिवसेनेपासून फारकत घेऊन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केली होती.
त्यानंतर दोघांचे राजकीय मार्ग वेगवेगळे झाले. गेल्या काही वर्षांपासून दोघांत थेट संवाद नव्हता.
मात्र आता पुन्हा एकत्र येण्याच्या चर्चेला जोर चढला आहे.
गेल्याच काही महिन्यांपूर्वी बॉलिवूड अभिनेता आमिर खानने दोघे बंधू एकत्र यावेत अशी इच्छा व्यक्त केली होती.
आता घडत असलेल्या या राजकीय हालचालीमुळे महाराष्ट्रातील जनतेच्या नजरा पुन्हा ‘ठाकरे बंधूं’कडे वळलेल्या आहेत.
राजकारणात नवा समीकरणाचा प्रारंभ?
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले, तर आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांमध्ये
नवे समीकरण तयार होण्याची शक्यता आहे. युतीच्या चर्चांमुळे राज्याच्या राजकारणात नवे वळण येणार का?,
हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे.
ठाकरे बंधूंच्या संभाव्य एकत्र येण्यामुळे महाराष्ट्रातील राजकीय वातावरण अधिकच तापण्याची चिन्हे आहेत.
आगामी काही दिवसांत यावर अधिक स्पष्टता येईल, अशी अपेक्षा आहे.
Read Also : https://ajinkyabharat.com/temperature-vadimula-poultry-business/