कर्तव्य बजावण्याचे सरकारचे आवाहन
महाराष्ट्र शासनाने २० नोव्हेंबर रोजी होणाऱ्या मतदानानिमित्त
राज्यात सुट्टी जाहीर करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यात
Related News
अकोला शहरातील गुंटेवारी लेआउटचे काम लवकरच सुरू होणार; म.न.पा आयुक्तांचा विश्वास
बोरगाव मंजू येथे दोन गटात तुफान हाणामारी; तक्रार घेताना पोलिसांची एकतर्फी भूमिका?
बाळापूर ब्रेकिंग: मनारखेड दरोडा प्रकरणातील टोळी उखडली; उरळ पोलिसांची मोठी कारवाई
चित्र नगरी कोल्हापूरच्या राज्य सदस्य पदी निलेश जळमकर यांची नियुक्ती झाल्याबद्दल सत्कार
अकोला जिल्ह्यात पुन्हा अतिवृष्टीचा इशारा; 4 जुलैपर्यंत हवामान खात्याचा अलर्ट, प्रशासन सतर्क
हिंदी सक्तीचा निर्णय उद्धव ठाकरेंचा, आंदोलनात राज ठाकरेंची उडी – प्रतापराव जाधव यांची टीका
महामार्गावर भीषण अपघात, भला मोठा कंटेनर पलटी; अफवांमुळे लुटीचा प्रयत्न, परिसरात एकच खळबळ!
एलपीजी दरात कपात: कमर्शियल सिलेंडर ५८.५० रुपयांनी स्वस्त
भोपाल कोर्टमधून चित्रपटात शोभेल अशी घटना! शिक्षा ऐकताच आरोपी कोर्टातून पळाला
अकोल्यात सिटी कोतवाली पोलिसांची कारवाई; २४ तासांत दुचाकी चोरटे जेरबंद
मन नदीत आढळला अज्ञात व्यक्तीचा मृतदेह; बाळापूर शहरात खळबळ
मतदार यादी अचूकतेसाठी अकोट तहसील कार्यालयात बीएलओ व पर्यवेक्षकांना प्रशिक्षण
विधानसभा निवडणुकीसाठी २० तारखेला मतदान होणार आहे.
तर २३ तारखेला मतमोजणी करून निकाल जाहीर होणार आहे.
दरम्यान नुकत्याच झालेल्या निर्णयानुसार राज्यात मतदानाच्या
दिवशी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
विधानसभा निवडणुकीत राज्यातील नागरिकांना मतदान करता
यावे यासाठी महाराष्ट्र शासनाने अधिसूचना काढून २० नोव्हेंबर
२०२४ साठी सुट्टी जाहीर केली आहे. सर्व विधानसभा मतदारसंघात
ही सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. राज्य आणि केंद्र शासनाची
कार्यालये, निमशासकीय कार्यालये, महामंडळे, मंडळे, सार्वजनिक
उपक्रम आणि बँक या ठिकाणी ही सार्वजनिक सुट्टी लागू असणार
आहे. राज्यात विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे.
राज्यात राजकीय घडामोडी वेगाने घडत असताना महाराष्ट्र
शासनाने मोठा निर्णय जाहीर केला आहे. शासनाने २० तारखेला
मतदानाची सुट्टी जाहीर केली आहे. राज्यातील सर्व मतदारांना
मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी राज्य सरकारने हा निर्णय
घेतला आहे. सर्वांनी मतदानाचा हक्क बजावावा असे आवाहन
शासनाने केले आहे. राज्यात केंद्रीय निवडणूक आयोगाने
विधानसभा निवडणुकीची घोषणा केली आहे. तसेच ज्यांना पूर्ण
दिवस सुट्टी देणे शक्य नसेल त्यांनी अर्ध्या दिवसाची सुट्टी जाहीर
करावी असे आवाहन महाराष्ट्र शासनाने केले आहे. दरम्यान
भाजपने आपल्या पहिल्या यादीतून ९९ उमेदवारांची घोषणा केली
आहे. शिवसेनेने ४५ तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने ३८ उमेदवार
जाहीर केले आहेत. तसेच दुसरीकडे महाविकास आघाडीकडून
ठाकरे गटाने ६५ उमेदवार जाहीर केले आहेत. वंचित बहुजन
आघाडी आणि परिवर्तन महाशक्ती आघाडीने देखील आपले
उमेदवार जाहीर केले आहेत.
Read also: https://ajinkyabharat.com/november-6-hearing-regarding-nationalist-party-symbol/