पातूर, तालुका प्रतिनिधी
आज सायंकाळी अचानक आलेल्या वादळी वाऱ्याने पातूर तालुक्यातील विविध गावांमध्ये मोठे नुकसान केले आहे.
विजेच्या कडकडाटासह आलेल्या या वादळामुळे पशुधनाचे मोठे नुकसान झाले असून,
Related News
मोठा खुलासा! क्रॅश झालेल्या विमानात आधीच होती बिघाडाची लक्षणं;
वादळीवारासह घराचे तीन पत्रे उडाले जखमींना तात्काळ निंबा येथे दवाखान्यात दाखल
मोठा खुलासा! अहमदाबाद विमान अपघातामागे पक्ष्यांची धडक; दोन्ही इंजिन बंद, 100 हून अधिकांचा मृत्यू
दहीहांडा येथे झालेल्या अवकाळी पावसामुळे राहत्या घरांचे मोठे नुकसान
अजित पवार यांचे भाषण अर्धवट थांबले; वादळी वाऱ्यामुळे घेतली कार्यकर्त्यांची रजा
गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रूपाणी हेही प्रवासी म्हणून उपस्थित
बोर्डी,रामापूर,शिवपूर,परिसरात वादळी वाऱ्यासह,गारपीट
अन्नत्याग आंदोलनाला पाठिंबा – नंदगाव पेठ टोलनाक्याजवळ टायर जाळून शेतकऱ्यांचा तीव्र निषेध
खामगाव येथे मा. उपमुख्यमंत्री ना. अजित पवार यांचे उपस्थिती
राज ठाकरे – फडणवीस भेटीवर अजित पवारांचा संतुलित प्रतिसाद; “हीच महाराष्ट्राची संस्कृती”
अहमदाबादमध्ये एअर इंडिया विमान अपघात; २३८ प्रवासी होते सवार
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज अकोला दौऱ्यावर आहेत.
शिरला, गोळेगाव आणि चोंढी या गावांमध्ये वेगवेगळ्या दुर्घटना घडल्या.
शिर्ला येथील घटना:
शिरला गावात वादळामुळे बाभळीचे झाड अचानक कोसळून एका म्हशीच्या अंगावर पडले.
ही दुर्घटना इतकी तीव्र होती की म्हैस जागीच दगावली. विठ्ठल भाकरे यांच्या मालकीची ही म्हैस होती.
या घटनेमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून, तात्काळ पंचनामा करून नुकसान भरपाई देण्याची मागणी करण्यात येत आहे.
गोळेगाव येथे विज पडून गाय दगावली:
मौजे गोळेगाव येथे विज पडण्याचा प्रकार घडला असून, विजेच्या जोरदार स्फोटात एक गाय जागीच मृत पावली.
या घटनेमुळे गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
विज पडण्याच्या घटनांमध्ये नागरिकांनी सुरक्षिततेच्या उपाययोजना कराव्यात, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
चोंढीमध्ये बैलाचा मृत्यू:
चोंढी गावात वादळी वाऱ्यामुळे शेडवर झाड कोसळले आणि त्याखाली दबून एक बैल मृत्युमुखी पडला.
ही प्राथमिक माहिती असून, प्रशासनाकडून पंचनामा प्रक्रिया सुरु असल्याचे समजते. शेडचेही मोठे नुकसान झाले आहे.
वादळामुळे संभाव्य नुकसान:
पशुधन हानी: म्हैस, गाय व बैल दगावले.
झाडांची कोसळणं: बाभळीचे झाडे व शेडवरील नुकसान.
गोळेगाव येथे विज पडली मोठा धक्का.
शेतकऱ्यांची मागणी:
पशुधन हानी झालेल्या शेतकऱ्यांनी तातडीने नुकसान भरपाईची मागणी केली आहे.
शासनाने त्वरित पंचनामे करून योग्य आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.
प्रशासन आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाने या घटनेची गंभीर दखल घेऊन तात्काळ उपाययोजना कराव्यात,
अशी मागणी तालुक्यातून होत आहे.
धोक्याचा इशारा लक्षात घेता, पुढील काही दिवस वादळी हवामानाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
नागरिकांनी सतर्क राहावे आणि शक्यतो सुरक्षित स्थळीच राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
Read Also :https://ajinkyabharat.com/rajya-deputy-chief-minister-ajit-pawar-o-today-akola-dahyawar-ahet/