दिल्ली –
जम्मू-कश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण देश हादरला असून,
या हल्ल्यामध्ये 27 निष्पाप पर्यटकांचा मृत्यू झाला. पुलवामा हल्ल्यानंतरचा हा सर्वात मोठा दहशतवादी
Related News
वैष्णवी हगवणेप्रमाणेच तिची जाऊ आणि हगवणे कुटुंबाची मोठी सून मयुरी जगताप हगवणे
हिला देखील गंभीर अत्याचारांना सामोरं जावं लागल्याचं समोर आलं आहे.
मयुरीच्या आईने नोव्हेंबर 2024 मध्य...
Continue reading
सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी आयजी जालिंदर सुपेकर
यांच्यावर गंभीर स्वरूपाचे आरोप केले आहेत.
पत्रकार परिषदेत त्यांनी एक कथित ऑडिओ क्लिप माध्यमांसमोर सादर केली असून,
त्...
Continue reading
देशातील 7 कोटींपेक्षा अधिक कर्मचारी भविष्य निधी (EPFO)
सदस्यांसाठी मोठी आनंददायक बातमी आहे. केंद्र सरकारने वित्तीय
वर्ष 2024-25 साठी पीएफवरील व्याजदर 8.25 टक्के कायम ठेवण्याचा ...
Continue reading
बॉलीवूड अभिनेत्री आलिया भट्ट हिने कान फिल्म फेस्टिव्हल 2025
च्या समारोप सोहळ्यातील आपल्या काही अद्भुत छायाचित्रांचा सोशल मीडियावर खुलासा केला आहे.
आपल्या कान डेब्यूदरम्यान तिने फ...
Continue reading
पुणे: शहरातील खराडी परिसरात सुरू असलेल्या एका बनावट कॉल
सेंटरवर पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने मोठी छापेमारी करत कारवाई केली आहे.
प्राईड आयकॉन इमारतीत सुरू असलेल्या या कॉल सेंटर...
Continue reading
दिल्लीत शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली नीति
आयोगाच्या शासी परिषदेची 10वी बैठक पार पडली.
या बैठकीचं विषयवस्तू होती – ‘2047 मध्ये विकसित भारतासाठी विकसित राज...
Continue reading
विशाल आग्रे | अकोट प्रतिनिधी
अकोट : आगामी पावसाळा आणि संभाव्य पूरस्थिती लक्षात घेता केंद्र व राज्य
शासनाने राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेत (NFSA) अंतर्भूत लाभार्थ्यांसाठी महत्त्वाच...
Continue reading
आज खामगाव येथे नगरसेवक देवेंद्र देशमुख यांच्या घरी सांत्वनपर
भेट देण्यासाठी आले असता पत्रकारांनी त्यांना गाठले.
यावेळी सध्याच्या राज्यातील राजकीय परिस्थिती,
सामाजिक तणाव आणि प्र...
Continue reading
मान्सून ने दी दस्तक – केरल से शुरुआत
केरलमध्ये दक्षिण-पश्चिम मान्सूनची अधिकृत एंट्री झाली आहे.
यामुळे दक्षिण भारत, पश्चिम भारतातील हवामान बदलणार.
बंगालच्या उपस...
Continue reading
ठाणे जिल्ह्यात कोरोनामुळे पहिल्याचवेळी मृत्यूची नोंद झाली असून,
दुर्दैवाने हा बळी अवघ्या 21 वर्षीय तरुणाचा आहे. यामुळे प्रशासन,
आरोग्य विभाग आणि नागरिकांमध्ये चिंता निर्माण झाली ...
Continue reading
24 मे रोजी मान्सूनची ‘सरप्राईज एंट्री’
भारतीय हवामान खात्याने जाहीर केल्याप्रमाणे, नैऋत्य मोसमी पावसाने आज
(24 मे) केरळमध्ये 8 दिवस आधीच एंट्री घेतली आहे. यावर्षी मान्सूनचे आगमन ...
Continue reading
अकोला, दि. २४ : राज्य बियाणे महामंडळाच्या पैलपाडा येथील संशोधन केंद्र,
तसेच सेंटर ऑफ एक्सलन्स येथे संशोधित झालेल्या संकरित बीटी कपाशी
महाबीज 124 चे सहविपणन अंतर्गत संकरित बीट...
Continue reading
हल्ला मानला जात असून, या हल्ल्यामागे असलेला मास्टरमाईंड सैफुल्लाह खालिद उर्फ
सैफुल्लाह कसुरी हा TRF (The Resistance Front) या दहशतवादी संघटनेचा प्रमुख असल्याची माहिती समोर आली आहे.
हाफिज सईदचा निकटवर्तीय आणि लष्करचा उपप्रमुख
सैफुल्लाह खालिदचा संबंध थेट लष्कर-ए-तैयबा या दहशतवादी संघटनेशी असून,
तो हाफिज सईदचा निकटवर्तीय समजला जातो. तो TRF आणि पीपल्स अँटी-फॅसिस्ट फोर्स (PAFF) या
संघटनांमधून जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी कारवाया चालवत असल्याचे उघड झाले आहे.
त्याने 2000 च्या दशकात पाकिस्तानातील मुरीदके येथील लष्कर कॅम्पमध्ये प्रशिक्षण घेतले होते.
दहशतवादी हल्ल्यांचे सूत्रधार
सैफुल्लाह खालिद सैफुल्लाह साजिद जट, अली, हबीबुल्ला आणि नौमान या नावांनीही ओळखला जातो.
तो गेल्या 20 वर्षांपासून काश्मीरमध्ये सक्रिय असून, पूंछ-राजौरी भागामध्ये लष्करच्या कारवायांचे तो प्रमुख सूत्रधार आहे.
पाकव्याप्त काश्मीरमधील कोटली जिल्ह्यातील खुईरट्टा दातेस भागातून तो भारतात दहशतवाद्यांना पाठवत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
TRFच्या स्थापनेमागे खालिद
TRF आणि PAFF या संघटनांची स्थापना सैफुल्लाह खालिदनेच केली.
हल्ल्यांची थेट जबाबदारी टाळण्यासाठी, या संघटना ‘जैश-ए-मोहम्मद’सारख्या अन्य गटांच्या नावाखाली काम करतात.
TRF ही लष्कर-ए-तैयबाच्या छुप्या कारवायांची ‘फ्रंट ऑर्गनायझेशन’ मानली जाते.
पहलगाम हल्ल्यात थेट सहभाग
गुप्तचर संस्थांच्या माहितीनुसार, सैफुल्लाह खालिदने पहलगाम हल्ल्याच्या
पार्श्वभूमीवर पाकिस्तानातून पाच ते सहा दहशतवाद्यांना भारतात पाठवले होते.
काही दिवसांपूर्वीच तो भारतात घुसल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
या हल्ल्यामुळे संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली असून, खालिद सध्या NIA व इतर सुरक्षा यंत्रणांच्या रडारवर आहे.
काश्मीर ताब्यात घेण्याची वल्गना
फेब्रुवारी 2025 मध्ये खैबर पख्तुनख्वा येथे झालेल्या एका बैठकीत सैफुल्लाह खालिदने भारताविरुद्ध भडकावू भाषण दिले होते.
“आज 2 फेब्रुवारी 2025 आहे. आम्ही 2 फेब्रुवारी 2026 पर्यंत काश्मीर ताब्यात घेऊ,” अशी वल्गना त्याने केली होती.
त्याच्या या वक्तव्यांमुळे भारतातील सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत.
Read Also : https://ajinkyabharat.com/dhargad-these-veteran-mahilas-fatal-mahaan/